शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

सलग दुसऱ्या वर्षी जुलैचा पहिला पंधरवडा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:15 IST

कोल्हापूर : जुलै महिना तसा धो धो पाऊस कोसळणारा; पण गेल्या दोन वर्षांपासून या महिन्यातील पहिला पंधवडा काेरडाच जात ...

कोल्हापूर : जुलै महिना तसा धो धो पाऊस कोसळणारा; पण गेल्या दोन वर्षांपासून या महिन्यातील पहिला पंधवडा काेरडाच जात आहे. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती झाली असून मोठ्या पावसासाठी आभाळाकडे डोळे लागले आहेत. त्यानंतर मात्र अगदी महापूर येईपर्यंत पाऊस कोसळण्याचा मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता सर्वांच्या मनात आतापासून भीती दाटू लागली आहे.

जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांतील जून-जुलैमधील पावसाचा अंदाज घेतला तर या तीनही वर्षी माॅन्सूनने वेळेत आगमन केल्याचे दिसते. २०१९ मध्ये तर पावसाने जूनमध्येच सुरू केलेला रपाटा ऑगस्टअखेरपर्यंत सुरूच राहिला होता. या तुलनेत गेल्या वर्षी २०२० मध्ये जूनमध्ये पावसाने आगमन केले, पण त्यानंतर जी दडी मारली ती २५ जुलैपर्यंत पावसाने प्रतीक्षा करायला लावली. आता चालू वर्षीदेखील माॅन्सूनने जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच जोरदार बॅटिंग केली, त्यानंतर तो पाऊस गायब झाला आहे, तो अद्याप परतलेलाच नाही. अधेमधे एखादं दुसऱ्या किरकोळ सरी येतात, पण त्यात जोर नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा पिकांना लागली आहे.

पहिल्या पंधरवड्यात गेल्या दोन वर्षांत सरासरी केवळ ५० ते १०० मिलिमीटर असा किरकोळ पाऊस पडला आहे. त्यानंतर मात्र दुसऱ्या पंधरवड्यात सरासरीच्या दुप्पटीने पाऊस पडल्याचे दोन वर्षांचे आकडे सांगतात. गेल्या वर्षी २५ जुलैनंतर परतलेल्या पावसाने महिनाअखेरपर्यंत तब्बल ७७२ मिलिमीटर इतक्या तुफानी पावसाची नोंद झाली. हा पाऊस पुढे वाढतच गेल्याने २०१९ प्रमाणे ऑगस्टच्या पहिल्या आठड्यात महापूर आला. २०१९ मध्ये देखील असाच २० जुलैनंतर पाऊस सुरू झाला होता आणि अवघ्या दहा-बारा दिवसांच्या पावसात जिल्ह्यात महापूर आला होता. या वर्षीदेखील तशीच चिन्हे दिसत आहेत. कारण आता तरणा पाऊस असाच तुरळक जाणार असून, २० नंतर सुरू होणाऱ्या म्हाताऱ्या नक्षत्रापासून खऱ्या अर्थाने पावसाला जोर चढणार आहे.

जुलैच्या पहिल्या पंधवड्यापर्यंत पडलेला पाऊस

वर्ष पाऊस (मिलिमीटरमध्ये)

२०१९ ४३७

२०२० २००

२०२१ ४०६ (आतापर्यंत)

चौकट

पीक-पाणी उत्तम; पण भीती महापुराची

२०१९ मध्ये सातत्याने पाऊस पडल्याने पेरण्यांही अडकल्या होत्या. ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रातील पेरण्याच झाल्या नाहीत. ज्या झाल्या त्या महापुराच्या तडाख्यात कुजून गेल्या. यावर्षी आतापर्यंत ८० टक्केपर्यंत पेरण्या झाल्या असून पिकेही तरारली आहेत. फक्त आठ दिवसांपासून पाऊस नसल्याने त्याची वाढ खुंटली आहे. आता एकसारखा पाऊस सुरू झाला तर मात्र २०१९ सारखी पूरस्थिती निर्माण होऊन पीक धोक्यात येणार आहे.

चौकट

आता १५ पासून पाऊस जोर धरणार

पावसाने दीर्घकाळ दडी मारली असलीतरी उद्यापासून वादळाच्या स्वरूपात पाऊस पुनरागमन करेल आणि या महिनाअखेरपर्यंत मुक्काम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आता कोरडे वाटणारे शेतशिवार या महिनाअखेर पाण्याने तुडुंब होणार आहे. हा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सलग बरसणार आहे. त्यानंतर पुढे दहा-बारा दिवसांची विश्रांती घेऊन पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याचा असल्याने त्याअनुषंगाने शेतीकामाचे नियोजन करण्याची गरज आहे.

चौकट

दिवसभर पावसाची हुलकावणी

गुरुवारी किरकोळ स्वरूपात पाऊस पडेल असा अंदाज होता; पण दिवसभर ढगाळ वातावरण राहिले तरी पावसाने हुलकावणी दिली. दरम्यान, रात्री ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याचा असल्याने आज शुक्रवारी तहानलेल्या पिकांना थोडाफार दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.