शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

प्रोसेसर्सला आग; तीन कोटींचे नुकसान

By admin | Updated: June 10, 2015 00:26 IST

यड्राव मार्गावरील घटना : आठ तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात; सुमारे ४० बंब पाण्याचा मारा

इचलकरंजी : पंचगंगा फॅक्टरी-यड्राव मार्गावर असलेल्या राधा-कन्हैय्या टेक्स्टाईल प्रोसेसर्सला शॉर्टसर्किटने भीषण आग लागून सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले. आगीत प्रोसेसर्समधील मशिनरी, कापडाच्या गाठी, रसायन व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. सुमारे ४० बंब पाणी मारून अग्निशामक दलाच्या जवानांच्या आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गोरखनाथ डाके यांच्या मालकीचा राधा-कन्हैय्या नावाने कापडावर प्रक्रिया करणारा प्रोसेसर्स कारखाना आहे. सोमवारी सुटी असल्याने प्रोसेसर्स बंद होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास प्रोसेसर्सच्या छतातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. त्यांनी वॉचमनला ही माहिती दिली. वॉचमनने आत जाऊन पाहिले असता आग लागल्याचे दिसले. त्याने तत्काळ या घटनेची माहिती डाके यांना दिली. डाके यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.आगीची भीषणता वाढल्यानंतर लांबूनच आगीचे लोट दिसत होते. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे केमिकल व कापडाच्या गाठी मोठ्या प्रमाणात असल्याने कमी वेळेत आग मोठ्या प्रमाणात वाढली. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. आग विझवत असताना अचानक आगीच्या झळांमुळे प्रोसेसर्सचे छतही खाली कोसळले. त्यामुळे आग विझविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. नगरपालिकेच्या चारही बंबांचे पाणी मारून आग विझविण्याचे काम सुरू होते. मात्र, आग आटोक्यात न आल्याने परिसरातील दत्त साखर कारखाना आणि संजय घोडावत ग्रूपच्या अग्निशमन गाड्याही बोलाविण्यात आल्या. सर्वच गाड्या वारंवार फेऱ्या मारून परिसरातून पाणी भरून आणून त्याचा मारा आगीवर करीत होते. आग विझविण्यासाठी जवानांसह प्रोसेसर्समधील कर्मचारी, परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. सुमारे आठ तासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. या आगीत सुमारे सहा लाख मीटर कापडाचे तागे, प्रोसेसिंग केलेल्या कापडाच्या गाठी, ड्रायर, प्रिंटिंग, क्लोअरिंग मशीन, पिचिंग मशीन, केमिकल टेस्टिंग लॅब, त्यातील सर्व साहित्य जळाले. आगीची तीव्रता इतकी होती की, लोखंडी साहित्यही वितळत चालले होते. आगीमुळे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद कृष्णात भगवंत डाके यांनी दिली आहे. (वार्ताहर)