शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम दीड महिन्यांत पूर्ण करा :फरास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 18:11 IST

कोल्हापूर येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, त्याचवेळी समाधी परिसरातील अन्य सिव्हील कामेही पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी शिल्पकार तसेच ठेकेदार यांना दिल्या.

ठळक मुद्देशाहू समाधिस्थळावरील मेघडंबरीच्या कामाचा महापौर फरास यांनी घेतला आढावा शिल्पकार तसेच ठेकेदार यांना अन्य कामेही पूर्ण करण्याच्या सूचना मेघडंबरीचे क्ले मॉडेल तयार काम पूर्ण व्हायला किमान तीन महिने : शिल्पकार किशोर पुरेकर

कोल्हापूर : येथील नर्सरी बागेत बांधण्यात येत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम येत्या दीड महिन्यांत पूर्ण करण्यात यावे, त्याचवेळी समाधी परिसरातील अन्य सिव्हील कामेही पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी शिल्पकार तसेच ठेकेदार यांना दिल्या.

महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्यासमवेत जाऊन समाधिस्थळावरील मेघडंबरीचे काम केले जात असलेल्या कार्यशाळेत जाऊन कामाचा आढावा घेतला.

यावेळी गटनेते सत्यजित कदम, राजसिंह शेळके, माजी नगरसेवक आदिल फरास, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक. ठेकेदार अभिजित जाधव, शिल्पकार किशोर पुरेकर आदी उपस्थित होते.

सिद्धार्थनगराला लागून असलेल्या नर्सरी बागेत छत्रपती शाहू महाराजांची समाधी बांधण्यात येत आहे. आधीच्या नियोजनाप्रमाणे समाधिस्थळावर दगडी मेघडंबरी तयार करायची होती; परंतु नंतर ती पंचधातूची करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्याचे डिझाईन करण्यात आले आहे.

गेल्या सहा महिन्यांत या मेघडंबरीचे क्ले मॉडेल तयार झाले आहे. प्रत्यक्ष जागेवर ही मेघडंबरी बसवून पाहिली जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे दि. १ आॅक्टोबरला जागेवर प्रात्यक्षिक होईल. सर्व बाजूने ती जर व्यवस्थित उभी राहिली तर मग त्याचे कास्टिंगचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे दि. ४ किंवा ५ आॅक्टोबरनंतर कास्टिंगचे काम सुरू होईल.

मेघडंबरीचे काम पूर्ण व्हायला किमान तीन महिने लागतील, असे शिल्पकार किशोर पुरेकर यांनी यावेळी सांगितले. तथापि महापौर फरास यांनी जादा मजूर घ्या, रात्रं-दिवस काम करा पण दि. १५ नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करावे, अशी सूचना केली. मेघडंबरीचे काम सुरू असताना समाधिस्थळ परिसरात करावयाची अन्य विकासकामेही तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना महापौरांनी शहर अभियंत्यांना केली.