शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

जिल्ह्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे आर्थिक गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 14:49 IST

देशाची सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या माहिती संकलनात व विश्लेषणात सुलभता यावी म्हणून कोल्हापुरात मोबाईल अ‍ॅपद्वारे गणनेचे काम सुरू झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात आतापर्यंत २१ हजार आस्थापनांतील कुटुंबांची गणना पूर्ण झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात मोबाईल अ‍ॅपद्वारे आर्थिक गणनासातवी राष्ट्रीय गणना सुरू : फेब्रुवारीपर्यंत काम चालणार

कोल्हापूर : देशाची सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. या माहिती संकलनात व विश्लेषणात सुलभता यावी म्हणून कोल्हापुरात मोबाईल अ‍ॅपद्वारे गणनेचे काम सुरू झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात आतापर्यंत २१ हजार आस्थापनांतील कुटुंबांची गणना पूर्ण झाली आहे.रोजगारविषयक विश्वासार्ह आकडेवारीसाठी अत्यंत उपयुक्त ऐवज म्हणून या गणनेचा वापर केला जातो. निती आयोगाचे धोरण व नियंत्रणाखाली हे काम केले जाते. यापूर्वीची गणना २०१३ मध्ये झाली होती. आता २६ नोव्हेंबरपासून याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती केली गेली आहे.

प्र्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन माहिती घेण्याचे काम या महिनाअखेरपर्यंत, तर पूर्ण विश्लेषणासह अंतिम आकडेवारी फेब्रुवारीअखेरपर्यंत तयार करण्याच्या सूचना जिल्हा सांख्यिकी विभागाकडून देण्यात आल्या आहेत. या माहितीचे अधिक सुलभपणे संकलन व विश्लेषण करता यावे म्हणून स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

मोबाईलमधील या अ‍ॅपद्वारे आस्थापना व त्यांच्या संबंधित कुटुंबांकडून माहिती संकलित केली जात आहे. या गणनेच्या निमित्ताने केलेल्या माहिती संकलनातून राष्ट्रीय व्यवसाय नोंदवही तयार केली जाणार आहे. याद्वारे रोजगाराविषयी भविष्यातील नियोजन सोपे होणार आहे.कोणाची होणार गणना...सर्व बिगर कृषी आर्थिक कार्यालयांतील आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व कुटुंबे व आस्थापनाबारमाही, हंगामी, नैमित्तिक क्षेत्रांत काम करणारे कामगार.२०१३ मधील गणना दृष्टिक्षेपात

  • जिल्ह्यात ५.७१ लाख आस्थापनांची नोंद
  • रोजगाराच्या बाबतीत कोल्हापूर राज्यात चौथ्या स्थानी
  • महिला उद्योजकांचा वाटा १५.०७ टक्क्यांवर
  • हस्तव्यवसाय, हातमाग क्षेत्रात ११.३३ टक्के इतका वाटा
  • कृषिक्षेत्रावर आधारित उद्योगामध्ये २०.४८ टक्के लोक
  • पशुधनावर आधारित उद्योगात ३.१८ लाख लोक
  • बिगर कृषी क्षेत्र आस्थापनेत मुंबई, ठाणे, पुण्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक

एमएसएमई डेव्हलपमेंट अ‍ॅक्टअंतर्गत सर्व आस्थापनांची सर्वंकष माहिती गोळा करून तिचे जिओ टॅगिंगद्वारे गाव, तालुका, जिल्हा पातळीवर वर्गीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १११२ प्रगणक व ५८८ पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. अजूनही १११४ प्रगणकांची कमतरता जाणवत आहे. त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.- भूषण देशपांडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी

 

टॅग्स :MobileमोबाइलEconomyअर्थव्यवस्थाkolhapurकोल्हापूर