शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

संचमान्यतेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: August 18, 2015 23:05 IST

कक्ष अधिकाऱ्यांचे पत्र : उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश उठवला

टेंभ्ये : शैक्षणिक वर्ष २०१३-१४पासून प्रलंबित असणाऱ्या संचमान्यतेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने याबाबतचा स्थगिती आदेश उठवला असून, १३ डिसेंबर २०१३च्या शासन निर्णयाप्रमाणे संचमान्यता करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांना नुकतेच दिल्याचे समजते.राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदे रिक्त होणार आहेत की अतिरिक्त ठरणार आहेत हे निश्चित होणार आहे. यामुळे शिक्षक भरतीचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. गेले अनेक दिवस हा विषय प्रलंबित होता. आता प्रश्न निकाली निघाला आहे.या याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने १२ आॅगस्ट रोजी आदेश दिला आहे. या आदेशानुसार १३ डिसेंबर २०१४ रोजी संचमान्यता जैसे थे ठेवण्याचा आदेश उठवण्यात आला आहे. यामुळे सन २०१३-१४ व सन २०१४-१५ची संचमान्यता १३ डिसेंबर २०१३च्या शासन निर्णयाप्रमाणे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शासन आदेशानुसार प्राथमिक स्तरावरील शिक्षक निश्चित करण्याबाबतचे निकष करण्यात आले आहेत. पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, तर सहावी ते आठवीच्या वर्गासाठी ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक निश्चित करण्यात आला आहे. तुकड्यांचा विचार न करता प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर विद्यार्थी संख्येवर शिक्षक निश्चित करण्यात येणार आहेत. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार ही रचना निश्चित केली असल्याचे सांगण्यात येत आहे.दि. १३ एप्रिल २०१३च्या शासन निर्णयापूर्वी प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील संचमान्यता तुकडीच्या निकषावर करण्यात येत होती. आता यामध्ये शासनाने बदल केला आहे.यापूर्वी प्रत्येक तुकडीसाठी १.२० शिक्षक मंजूर केला जात असे. नवीन धोरणानुसार प्रत्येक तुकडीमागे ०.२० शिक्षक कमी करण्यात येणार आहे. यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण अधिक असेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. संघटना स्तरावरून मात्र दि. १३ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयाऐवजी जुन्या पद्धतीनेच संचमान्यता करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकवर्गातून केली जात आहे. (वार्ताहर)तंतोतंत पालन करणारशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कोकणासाठी स्वतंत्र निकष वापरुन संचमान्यता करणे आवश्यक आहे. २०१३-१४ व २०१४-१५च्या संचमान्यतेला उच्च न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. पण, शैक्षणिक वर्ष २०१३-१४मध्ये काही शिक्षणसेवकांना अतिरिक्त ठरवून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. अशा शिक्षकांना तत्काळ सेवेत घेण्यात यावे, तसेच अतिरिक्त समायोजन निकषाप्रमाणेच केले जावे.- भारत घुले,जिल्हाध्यक्ष, माध्यमिक अध्यापक संघसंचमान्यता करण्यासंदर्भातील आदेश उच्च स्तरावरून मिळताच जिल्ह्यात संचमान्यता शिबिराचे आयोजन करण्यात येईल. मात्र अद्याप याबाबतचे आदेश आलेले नाहीत. यासंदर्भात शासनाने दिलेल्या निकषांचे तंतोतंत पालन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून केले जाणार आहे.- किरण लोहारशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, रत्नागिरी.