शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

कृषी विद्यापीठांतील भरतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

राज्यपालांचा हिरवा कंदील : प्रक्रियेला गती येणार

शिवाजी गोरे -दापोली --राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या हिताचे परिनियम रखडल्याने गेले चार वर्षे भरती प्रक्रिया ठप्प होती. या भरती प्रक्रियेचा मार्ग राज्याचे नवनियुक्त राज्यपाल विद्यासागर राव यांनी मोकळा केला असून, सुधारित परिनियमाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या कृषी धोरणाला गती देण्यासाठी चार कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठांतील सर्व नोकर भरतीचे अधिकार निवड मंडळाने आपल्याकडे राखून ठेवले होते. या निवड मंडळाचे अध्यक्ष राज्याचे कृषिमंत्री असावेत, असाही कायदा करण्यात आला होता; मात्र या निवड मंडळावरच चारही कृषी विद्यापीठांनी आक्षेप घेतला. निवड मंडळाने काही शिक्षकेतर पदे भरण्यासाठी जाहिरातही काढली होती; परंतु या भरतीला न्यायालयानेच स्थगिती दिली. राज्यपाल विद्यासागर राव यांनी चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे म्हणणे ऐकून घेतले गेले.कृषी विद्यापीठांची स्वाय्यता कमी करण्यात येऊ नये, अधिकारच नसेल तर कुलगुरूपद रद्द करा. अशी भूमिका चारही कृषी विद्यापीठातील कुलगुरूंनी घेतली. त्याची दखल घेत राज्यपालांनी विद्यापीठाची स्वायतता टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला.परिनियमात बदल करून प्राध्यापक व त्यावरील पदे निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला . वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४ ही सर्व पदे विद्यापीठ स्तरांवर निवड समितीमार्फत भरण्याचा निर्णय झाला. कृषी विद्यापीठांना सहाव्या वेतन आयोगाच्या अटीनुसार शैक्षणिक पात्रता असावी असे निश्चित करण्यात आले.पदे भरतीतील मुख्य अडसर दूर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, या चारही कृषी विद्यापीठांत शिक्षकवर्गीय ४० टक्केपदे रिक्त होती. ही पदे भरण्यातील मुख्य अडसर दूर झाल्याने लवकरच या पदाची भरती प्रक्रिया सुरू होईल.४चार वर्षे भरती प्रक्रिया रखडल्याने शिक्षण, संशोधन, विस्तार या कामांत अडसर निर्माण झाली होती. तसेच पदोन्नती न झाल्यानेसुद्धा अनेकांचे नुकसान झाले आहे आणि कुलगुरू पदासाठी लागणारा एकही पात्र उमेदवार राज्यातील विद्यापीठांत नाही. त्यामुळे चार वर्षांत राज्याचेही नुकसान झाले आहे.