शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठांतील भरतीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 29, 2014 00:29 IST

राज्यपालांचा हिरवा कंदील : प्रक्रियेला गती येणार

शिवाजी गोरे -दापोली --राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या हिताचे परिनियम रखडल्याने गेले चार वर्षे भरती प्रक्रिया ठप्प होती. या भरती प्रक्रियेचा मार्ग राज्याचे नवनियुक्त राज्यपाल विद्यासागर राव यांनी मोकळा केला असून, सुधारित परिनियमाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या कृषी धोरणाला गती देण्यासाठी चार कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठांतील सर्व नोकर भरतीचे अधिकार निवड मंडळाने आपल्याकडे राखून ठेवले होते. या निवड मंडळाचे अध्यक्ष राज्याचे कृषिमंत्री असावेत, असाही कायदा करण्यात आला होता; मात्र या निवड मंडळावरच चारही कृषी विद्यापीठांनी आक्षेप घेतला. निवड मंडळाने काही शिक्षकेतर पदे भरण्यासाठी जाहिरातही काढली होती; परंतु या भरतीला न्यायालयानेच स्थगिती दिली. राज्यपाल विद्यासागर राव यांनी चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे म्हणणे ऐकून घेतले गेले.कृषी विद्यापीठांची स्वाय्यता कमी करण्यात येऊ नये, अधिकारच नसेल तर कुलगुरूपद रद्द करा. अशी भूमिका चारही कृषी विद्यापीठातील कुलगुरूंनी घेतली. त्याची दखल घेत राज्यपालांनी विद्यापीठाची स्वायतता टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला.परिनियमात बदल करून प्राध्यापक व त्यावरील पदे निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला . वर्ग २, वर्ग ३, वर्ग ४ ही सर्व पदे विद्यापीठ स्तरांवर निवड समितीमार्फत भरण्याचा निर्णय झाला. कृषी विद्यापीठांना सहाव्या वेतन आयोगाच्या अटीनुसार शैक्षणिक पात्रता असावी असे निश्चित करण्यात आले.पदे भरतीतील मुख्य अडसर दूर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, या चारही कृषी विद्यापीठांत शिक्षकवर्गीय ४० टक्केपदे रिक्त होती. ही पदे भरण्यातील मुख्य अडसर दूर झाल्याने लवकरच या पदाची भरती प्रक्रिया सुरू होईल.४चार वर्षे भरती प्रक्रिया रखडल्याने शिक्षण, संशोधन, विस्तार या कामांत अडसर निर्माण झाली होती. तसेच पदोन्नती न झाल्यानेसुद्धा अनेकांचे नुकसान झाले आहे आणि कुलगुरू पदासाठी लागणारा एकही पात्र उमेदवार राज्यातील विद्यापीठांत नाही. त्यामुळे चार वर्षांत राज्याचेही नुकसान झाले आहे.