शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
5
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
6
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
7
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
8
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
9
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
11
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
12
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
14
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
15
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
17
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
18
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
19
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
20
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

गडहिंग्लज कारखान्याच्या चौकशीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 26, 2015 00:47 IST

‘स्वाभिमानी’चा पाठपुरावा : अपिलाला केराची टोेपली

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८८ प्रमाणे चौकशी करून आर्थिक नुकसानीच्या जबाबदारी निश्चितीचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी यापूर्वीच दिले आहेत. मात्र, याबाबत कारखान्याने सहकारमंत्र्यांकडे अपील करून स्थगिती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण स्थगितीबाबत कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने चौकशी कामकाज सुरू करीत असल्याचे पत्र चौकशी अधिकारी आर. बी. वाघ यांनी कारखान्याला पाठविले आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.कारखान्याची यापूर्वीच सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ नुसारची चौकशी पूर्ण होऊन २१ मार्च २०१४ रोजी अहवाल संबंधित कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर २ मे २०१५ रोजी कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चितीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिले. त्यामध्ये सवलतीची साखर, अतिरिक्त कर्मचारी, अवास्तव खर्च, रोजंदारी कर्मचारी खर्च, अशा मुद्द्यांचा समावेश होता. पण, त्यानंतर लगेचच १० जुलै २०१५ रोजी सुधारित आदेश देताना त्यामध्ये परिशिष्ट ‘ब’चा समावेश केला. कारखाना प्रशासनाने यावर सहकार मंत्रालयाकडे धाव घेत स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)परिशिष्ट ‘ब’मधील मुद्दे४कार्यालयीन कामासाठी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अ‍ॅडव्हान्सची रक्कम १९ लाख ८२ हजार. त्यापैकी सेवेत नसणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चार लाख ९९ हजार येणे आहे. या अ‍ॅडव्हान्सचा जमाखर्च एक महिन्यात होणे गरजेचे असताना १९९१ पासून ही रक्कम थकीत आहे.४स्टेट बँक आॅफ इंडियाच्या गडहिंग्लज शाखेकडून कारखान्याने तोडणी वाहतुकीसाठी आठ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी एक कोटी ५३ लाख रुपये संबंधितांना वाटून उर्वरित रक्कम अन्यत्र वापरली. त्यामुळे मंजूर कर्जाचा गैरविनियोग झाला असून, १०० टक्के परतफेडीची हमी कारखान्याने दिल्याने त्याची जबाबदारी संचालकांवर आहे.४युनियन बँकेकडूनही तीन कोटी रुपयांचे बेसल डोस कर्ज ऊस उत्पादक सभासदांना पूर्व मशागत, बी-बियाणे, खते यासाठी वाटप करणे आवश्यक असताना ही रक्कमही अन्यत्र वापरली आहे.४सन २०११-१२ मध्ये ‘एफआरपी’पेक्षा ६२४ रुपये प्रतिटन दर जास्त दिल्याने १४ कोटी ३९ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. याचीही जबाबदारी संचालकांवर आली आहे. 

कारखान्याच्या या आर्थिक अरिष्टाला गलथान कारभार करणारे संचालक मंडळच जबाबदार असल्याने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून रकमेची वसुली करावी. शिवाय शासकीय लेखापरीक्षकांनी सुद्धा गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करून केवळ दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारत राहिल्याने सर्वच सहकारी संस्थांची ही अवस्था झाली आहे. - राजेंद्र गड्यान्नावर, राज्य सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना