शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

गडहिंग्लज कारखान्याच्या चौकशीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: November 26, 2015 00:47 IST

‘स्वाभिमानी’चा पाठपुरावा : अपिलाला केराची टोेपली

गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८८ प्रमाणे चौकशी करून आर्थिक नुकसानीच्या जबाबदारी निश्चितीचे आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी यापूर्वीच दिले आहेत. मात्र, याबाबत कारखान्याने सहकारमंत्र्यांकडे अपील करून स्थगिती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण स्थगितीबाबत कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने चौकशी कामकाज सुरू करीत असल्याचे पत्र चौकशी अधिकारी आर. बी. वाघ यांनी कारखान्याला पाठविले आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.कारखान्याची यापूर्वीच सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८३ नुसारची चौकशी पूर्ण होऊन २१ मार्च २०१४ रोजी अहवाल संबंधित कार्यालयाला प्राप्त झाला आहे. त्यानंतर २ मे २०१५ रोजी कलम ८८ अन्वये जबाबदारी निश्चितीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिले. त्यामध्ये सवलतीची साखर, अतिरिक्त कर्मचारी, अवास्तव खर्च, रोजंदारी कर्मचारी खर्च, अशा मुद्द्यांचा समावेश होता. पण, त्यानंतर लगेचच १० जुलै २०१५ रोजी सुधारित आदेश देताना त्यामध्ये परिशिष्ट ‘ब’चा समावेश केला. कारखाना प्रशासनाने यावर सहकार मंत्रालयाकडे धाव घेत स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)परिशिष्ट ‘ब’मधील मुद्दे४कार्यालयीन कामासाठी कर्मचाऱ्यांना दिलेल्या अ‍ॅडव्हान्सची रक्कम १९ लाख ८२ हजार. त्यापैकी सेवेत नसणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून चार लाख ९९ हजार येणे आहे. या अ‍ॅडव्हान्सचा जमाखर्च एक महिन्यात होणे गरजेचे असताना १९९१ पासून ही रक्कम थकीत आहे.४स्टेट बँक आॅफ इंडियाच्या गडहिंग्लज शाखेकडून कारखान्याने तोडणी वाहतुकीसाठी आठ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापैकी एक कोटी ५३ लाख रुपये संबंधितांना वाटून उर्वरित रक्कम अन्यत्र वापरली. त्यामुळे मंजूर कर्जाचा गैरविनियोग झाला असून, १०० टक्के परतफेडीची हमी कारखान्याने दिल्याने त्याची जबाबदारी संचालकांवर आहे.४युनियन बँकेकडूनही तीन कोटी रुपयांचे बेसल डोस कर्ज ऊस उत्पादक सभासदांना पूर्व मशागत, बी-बियाणे, खते यासाठी वाटप करणे आवश्यक असताना ही रक्कमही अन्यत्र वापरली आहे.४सन २०११-१२ मध्ये ‘एफआरपी’पेक्षा ६२४ रुपये प्रतिटन दर जास्त दिल्याने १४ कोटी ३९ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. याचीही जबाबदारी संचालकांवर आली आहे. 

कारखान्याच्या या आर्थिक अरिष्टाला गलथान कारभार करणारे संचालक मंडळच जबाबदार असल्याने त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून रकमेची वसुली करावी. शिवाय शासकीय लेखापरीक्षकांनी सुद्धा गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करून केवळ दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारत राहिल्याने सर्वच सहकारी संस्थांची ही अवस्था झाली आहे. - राजेंद्र गड्यान्नावर, राज्य सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना