शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

‘सर्किट बेंच’साठी चार दिवसांत फाईल

By admin | Updated: August 23, 2015 17:53 IST

संकलनाचे काम सुरू : कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र चव्हाण यांची माहिती

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्णांसाठी कोल्हापूर येथे स्थापन करावे, या खंडपीठ कृती समितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायाधीश शहा यांनी सहा जिल्ह्णांचे ठराव व संस्थानकाळातील कोल्हापुरातील खंडपीठाची माहिती मागविली आहे. ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून येत्या चार दिवसांत माहितीची फाईल मुख्य न्यायाधीश शहा यांच्याकडे सादर केली जाईल, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि. २१) गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या इमारतीमध्ये कृती समितीबरोबर मुख्य न्यायाधीश शहा यांची बैठक झाली. यावेळी कोल्हापूर कार्यक्षेत्रातील प्रलंबित खटले, प्रस्तावित सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्णांचे कोल्हापूरपासून अंतर किती आहे, पक्षकारांना कोल्हापुरात येण्यासाठी कशा पद्धतीने सोय आहे याची माहिती घेतली. यावेळी अ‍ॅड. संभाजीराव मोहिते (कराड), श्रीकांत जाधव (सांगली), राजेंद्र चव्हाण, संतोष शहा, महादेवराव आडगुळे, माणिक मुळीक, प्रशांत चिटणीस, विवेक घाटगे आदींनी कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यामागचे महत्त्व पटवून दिले होते. त्यानुसार शहा यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीचे सहा जिल्ह्णांच्या ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली. कृती समिती निमंत्रक अ‍ॅड. चव्हाण, सुस्मित कामत, मिलिंद जोशी, विजय ताटे, धनश्री चव्हाण आदी सदस्य माहिती एकत्रित करण्याचे काम करत आहेत. रमेश कुलकर्णी यांच्याकडून १९३१ च्या संस्थानकाळात कोल्हापुरात उच्च न्यायालय, सुप्रीम न्यायालय सुरू असल्याचे पुराव्याचे पुस्तक त्यांनी घेतले आहे. तसेच सहा जिल्ह्णांतील प्रत्येक तालुक्यांचे ठराव गोळा करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व एकत्रित माहिती जमा करून चार दिवसांच्या आत शहा यांना सादर केली जाणार असल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी) तीन तालुक्यांशी चर्चा करणार सोलापूर जिल्ह्णांतील अकरापैकी आठ तालुक्यांनी कोल्हापुरात ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याचे ठराव दिले आहेत परंतु सोलापूर शहर, अक्कलकोट व कर्माळा या तिन्ही तालुक्यांनी अद्याप ठराव दिलेले नाहीत. या तिन्ही तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करून ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.