शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

बहुजनांनी शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी लढा द्यावा

By admin | Updated: October 30, 2016 23:59 IST

बी. जी. कोळसे-पाटील : शामराव देसाई जीवन आणि कार्य ग्रंथाचे प्रकाशन

 कोल्हापूर : सध्याची शिक्षण व्यवस्था अशीच सुरू राहिली, तर त्यामुळे बहुजन समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी बहुजन समाजाने लढा द्यावा, असे प्रतिपादन निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी येथे केले. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. बेळगावमधील ज्योती महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी इतिहास प्रबोधिनीचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. डी. आर. मोरे, महापौर सरिता पाटील, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील प्रमुख उपस्थित होते. निवृत्त न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, बालवाडी ते पदव्युत्तरपर्यंतचे सर्व शिक्षण मोफत आणि दर्जेदार देण्याची जबाबदारी शासनाची असावयास हवी; पण विद्यमान सरकारने भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे संबंधित जबाबदारी झटकली आहे. सध्या जी शिक्षण व्यवस्था आहे, ती अशीच सुरू राहिल्यास त्यामुळे बहुजन समाजाचे मोठे नुकसान नजीकच्या काळामध्ये होणार आहे. ते टाळण्यासाठी बहुजन समाजाने लढा देण्यास सिद्ध व्हावे. सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रांतील कार्याद्वारे देसाई यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. डॉ. पवार म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या सामाजिक सुधारणांना पुढे नेण्याचे काम शामराव देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळामध्ये केले. त्यामुळेच या परिसराचे परिवर्तन होऊ शकले. कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शामराव देसाई यांचे विचार समाजाला आजही उपयुक्त ठरणारे आहेत. हे विचार स्वीकारणे गरजेचे आहे. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन व कार्य’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी माजी खासदार निवेदिता माने, दीपक दळवी, पी. जी. मंडोळकर, प्रकाश मरगाळे, आदी उपस्थित होते. इतिहास प्रबोधिनीच्या संचालिका डॉ. मंजुश्री पवार यांनी स्वागत केले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी सूत्रसंचालन केले. राजाभाऊ पाटील यांनी आभार मानले. देसाई यांच्या नावाने पुरस्कार राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण चिरंतन ठेवण्यासाठी त्यांच्या नावाने परिवर्तन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यास दरवर्षी ५१ हजार रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पवार यांनी यावेळी केली. ते म्हणाले, हा पुरस्कार कायम सुरू राहण्यासाठी किमान दहा लाख रुपयांचा निधी उभारण्यात यावा. यासाठी कोल्हापूरकरांतर्फे एक लाख रुपये दिले जातील.