शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास टक्के शिवार पाण्यापासून वंचित

By admin | Updated: April 8, 2017 00:46 IST

लाभक्षेत्रात कमतरता : तळवडे बांधाऱ्याचे बरगे सहा वर्षांपासून गायब

आर. एस. लाड ल्ल आंबाकडवी नदीवर आंबा ते मलकापूर दरम्यान तळवडे, हुंबवली, घोळलवडे, जावली, वाघमळा, खोतवाडी, सुतारवाडी, निळे, मलकापूर, कोपार्डे, शिरगाव येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांद्वारे पाणी अडवून लाभ क्षेत्रात सिंचन केले जात आहे. ‘हेड टू टेल’ या तत्त्वावर पाणीसाठा करणारे धोरण पाटबंधारे विभागाचे असले तरी नदीतील गाळ, झाडे-झुडुपे, तीव्र उन्हाळा तसेच शेतकऱ्यांची पाणी देणारी बेफिकिरी यामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शिवार शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे. बंधाऱ्यांची गळती, गवताने आच्छादलेले पात्र यामुळे पाण्याचा साठा कमी होतो. तळवडे येथील बंधाऱ्याचे बरगे तर गेल्या सहा वर्षांपासून गायब आहेत.या नदीक्षेत्रातील मानोली, चांदोली, कासार्डे, पालेश्वर धरणात व कडवी मध्यम प्रकल्पात अडीच टीएमसी पाणीसाठा आहे. कडवी धरणावर दोन वर्षांपासून वीजनिर्मिती सुरू असल्याने येथील सिंचनासाठी पाणी कमी पडताना दिसते. मानोली धरणांतर्गत ६४0५ हेक्टर क्षेत्रापैकी ३३७३ हेक्टर, चांदोली धरणाखाली ४६८ हेक्टर पैकी २७२ हेक्टर, तर कासार्डे धरणाखालील ८४७ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ९0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. पालेश्वर धरणाच्या ६१६0 हेक्टर क्षेत्रापौकी २४७३ हेक्टर क्षेत्र भिजते. उर्वरित ७६७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणायचे असेल, तर नदीचे अस्तित्व जपणे आवश्यक आहे. नदीचे अस्तित्व जपताना पावसाचे पाणी साठविण्याची, जिरविण्याची गरज घोळसवडे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कांबळे यांनी स्पष्ट केली. जेणेकरून धरण, नदी व बंधाऱ्यातील जिवंत झरे सातत्याने पाझरतील नि पाण्याची उपलब्धता होईल. कंपन्यांच्या रॉयल्टीच्या उत्पनातून विकासकडवी नदीचे धोकादायक चित्र समोर असताना सामाजिक विकासावरील खर्च कोठे होतो ? याचा जाब विचारणारी भूमिका शासनाने घेण्याची गरज आहे. बॉक्साईट उत्खननातील व गॅस कपंनीची कोट्यवधीची रॉयल्टी शासनाकडे जमा होते. त्या रॉयल्टीमधून नदीची स्वच्छता, गाळ काढणी व प्रदूषणमुक्तीची जागृती यावर निधी खर्चास प्राधान्याची गरज आहे.