शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

पन्नास टक्के शिवार पाण्यापासून वंचित

By admin | Updated: April 8, 2017 00:46 IST

लाभक्षेत्रात कमतरता : तळवडे बांधाऱ्याचे बरगे सहा वर्षांपासून गायब

आर. एस. लाड ल्ल आंबाकडवी नदीवर आंबा ते मलकापूर दरम्यान तळवडे, हुंबवली, घोळलवडे, जावली, वाघमळा, खोतवाडी, सुतारवाडी, निळे, मलकापूर, कोपार्डे, शिरगाव येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांद्वारे पाणी अडवून लाभ क्षेत्रात सिंचन केले जात आहे. ‘हेड टू टेल’ या तत्त्वावर पाणीसाठा करणारे धोरण पाटबंधारे विभागाचे असले तरी नदीतील गाळ, झाडे-झुडुपे, तीव्र उन्हाळा तसेच शेतकऱ्यांची पाणी देणारी बेफिकिरी यामुळे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक शिवार शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे. बंधाऱ्यांची गळती, गवताने आच्छादलेले पात्र यामुळे पाण्याचा साठा कमी होतो. तळवडे येथील बंधाऱ्याचे बरगे तर गेल्या सहा वर्षांपासून गायब आहेत.या नदीक्षेत्रातील मानोली, चांदोली, कासार्डे, पालेश्वर धरणात व कडवी मध्यम प्रकल्पात अडीच टीएमसी पाणीसाठा आहे. कडवी धरणावर दोन वर्षांपासून वीजनिर्मिती सुरू असल्याने येथील सिंचनासाठी पाणी कमी पडताना दिसते. मानोली धरणांतर्गत ६४0५ हेक्टर क्षेत्रापैकी ३३७३ हेक्टर, चांदोली धरणाखाली ४६८ हेक्टर पैकी २७२ हेक्टर, तर कासार्डे धरणाखालील ८४७ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ ९0 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. पालेश्वर धरणाच्या ६१६0 हेक्टर क्षेत्रापौकी २४७३ हेक्टर क्षेत्र भिजते. उर्वरित ७६७२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणायचे असेल, तर नदीचे अस्तित्व जपणे आवश्यक आहे. नदीचे अस्तित्व जपताना पावसाचे पाणी साठविण्याची, जिरविण्याची गरज घोळसवडे ग्रामपंचायत सदस्य भास्कर कांबळे यांनी स्पष्ट केली. जेणेकरून धरण, नदी व बंधाऱ्यातील जिवंत झरे सातत्याने पाझरतील नि पाण्याची उपलब्धता होईल. कंपन्यांच्या रॉयल्टीच्या उत्पनातून विकासकडवी नदीचे धोकादायक चित्र समोर असताना सामाजिक विकासावरील खर्च कोठे होतो ? याचा जाब विचारणारी भूमिका शासनाने घेण्याची गरज आहे. बॉक्साईट उत्खननातील व गॅस कपंनीची कोट्यवधीची रॉयल्टी शासनाकडे जमा होते. त्या रॉयल्टीमधून नदीची स्वच्छता, गाळ काढणी व प्रदूषणमुक्तीची जागृती यावर निधी खर्चास प्राधान्याची गरज आहे.