शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पन्नास टक्क्यांपर्र्यंत आरक्षण हाच अडसर : ज्येष्ठ विधिज्ञांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:58 IST

कोल्हापूर : राज्यघटनेमध्ये ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा मुद्दाच आता मराठा आरक्षण देण्यामध्ये मुख्य अडसर ठरत आहे. घटनादुरुस्ती आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण आहे. त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करून न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचा सूर ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केला.कॉमन मॅन संघटना आणि ज्येष्ठ विधिज्ञ बांधवांच्या वतीने मंगळवारी ...

कोल्हापूर : राज्यघटनेमध्ये ५० टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा मुद्दाच आता मराठा आरक्षण देण्यामध्ये मुख्य अडसर ठरत आहे. घटनादुरुस्ती आणि राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणे कठीण आहे. त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करून न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचा सूर ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केला.कॉमन मॅन संघटना आणि ज्येष्ठ विधिज्ञ बांधवांच्या वतीने मंगळवारी ‘मराठा आरक्षण आणि राज्यघटनेतील तरतुदी व कायदेशीर उपाययोजना’ या विषयावर परिसंवादात विधिज्ञांनी मते प्रखरपणे मांडली. अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी प्रास्ताविक केले. राज्यघटनेतील कलम १४,१५,१६ यावर चर्चा झाली, मराठा वर्ग की जात या विषयावर विवीध विधिज्ञांनी मते मांडली.आयोगासमोर दिशाभूल : अ‍ॅड. महादेवराव आडगुळेसन १९८० पासून आतापर्यंत पाचवेळा वेगवेगळ्या आयोगांसमोर मराठा समाजाचे दिशाभूल करणारे चित्र ठेवून समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले गेले आहे. राणे समितीने शास्त्रोक्त पद्धतीने माहिती जमा केली नाही. आता मागासवर्गीय समितीचा अहवाल शास्त्रोक्त पद्धतीने मांडण्याबाबत दबाव आवश्यक आहे.राज्यघटनेत दुरुस्ती गरजेची :अ‍ॅड. शिवाजीराव राणेआरक्षणासाठी राजकीय इच्छाशक्तीसह ग्रामीण जनतेचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यघटनेपासून तळापर्यंत सर्व दुरुस्त्या करणे गरजेचे आहे.इतरांनी त्याग करावा : अ‍ॅड. प्रशांत चिटणीसराज्यघटना तयार झाली त्यावेळी मराठा समाजाची स्थिती वेगळी होती व आज मराठा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे इतर समाजाने काही त्याग करणे आवश्यक आहे. त्यासाठी ५० टक्क्यांच्या पुढे जाऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली आहे.राजकीय इच्छाशक्ती हवी : अ‍ॅड. विवेक घाटगेमराठा आरक्षणामध्ये सद्य:स्थितीत राज्य सरकार लक्ष घालेल असे वाटत नाही. ते न्यायव्यवस्थेकडे बोट दाखविण्याची शक्यता आहे. म्हणून राज्यघटनेत दुरुस्तीसाठी राजकीय इच्छाशक्ती आणि मोठ्या प्रमाणात उठाव होणे आवश्यक आहे.खंडपीठासमोर मागासलेपण यावे : अ‍ॅड. डी. डी. घाटगेराज्यघटनेची निर्मिती करताना ५० टक्के आरक्षणाचा मुद्दाच नव्हता; मात्र सर्वोच्च न्यायालयातीलविविध निवाड्यानंतर हा मुद्दा पुढे आला. तोच आज मराठा आरक्षणासाठी मुख्य अडसर ठरत आहे. त्यासाठी मराठा समाजाचा मागासलेपणा ११ खंडपीठांसमोर येणे आवश्यक आहे.