शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीबाबत मार्ग काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

कोल्हापूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा १३३७ कोटी रुपयांचा निधी तांत्रिक कारणामुळे खर्च करता येत नसल्याच्या ...

कोल्हापूर : राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा १३३७ कोटी रुपयांचा निधी तांत्रिक कारणामुळे खर्च करता येत नसल्याच्या रविवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. उद्या, मुंबईत ग्रामविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. आधीच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या खर्चाचे सर्व लेख अद्यावत केल्याशिवाय हा निधी वापरता येत नाही आणि दुसरीकडे राज्यातील असे पाच वर्षांचे लेख अद्ययावत करणे बाकी आहे, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने मांडली. केवळ तांत्रिक अडचणीमुळे गेले काही महिने हा निधी पडून आहे. कोरोना स्थिती आणि पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्याचे वास्तव चित्र मांडण्यात आले होते.

याची दखल घेत मंत्री मुश्रीफ यांनी रविवारी सकाळीच जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना बोलावून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली आणि लवकरच निर्णय घेत असल्याचे सांगितले.

कोट

केंद्र शासनाच्या काही तांत्रिक अटींमुळे हा निधी खर्च करता येत नसल्याचे ‘लोकमत’च्या बातमीद्वारे मला समजले. याबाबत मी प्राथमिक चर्चा केली आहे. उद्या मुंबईत गेल्यानंतर ग्रामविकास आणि आवश्यकता भासल्यास वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढला जाईल.

हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री