शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पंधरा दिवसानंतर नागरीकांनी अनुभवला गारवा, फॅनी चक्रीवादळाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 16:00 IST

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने किनारपट्टीवरील जनजीवन हादरले असताना कोल्हापुरात मात्र कमालीचा गारवा जाणवत असून गार वाऱ्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे. तीन दिवसापुर्वी ४२ अंश सेल्सीअसच्या पुढे गेलेले तापमान अचानक ३५अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले आहे. दोन दिवसात तापमान ७ अंश सेल्सीअसनी घट झाल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडाभर असेच कमी तापमान राहणार आहे.

ठळक मुद्दे उन्हाच्या झळा कमी, गारवा वाढलाफॅनी चक्रीवादळाचा परिणाम

कोल्हापूर: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फॅनी चक्रीवादळाच्या तीव्रतेने किनारपट्टीवरील जनजीवन हादरले असताना कोल्हापुरात मात्र कमालीचा गारवा जाणवत असून गार वाऱ्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता कमी झाली आहे.

तीन दिवसापुर्वी ४२ अंश सेल्सीअसच्या पुढे गेलेले तापमान अचानक ३५अंश सेल्सीअसपर्यंत खाली आले आहे. दोन दिवसात तापमान ७ अंश सेल्सीअसनी घट झाल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडाभर असेच कमी तापमान राहणार आहे.उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापूर कमालीचे तापले होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच तापमानाचा पारा ४0 अंशाच्या पुढे गेला होता. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक उष्ण महिना म्हणून एप्रिलची नोंद झाली.

तप्त झळांनी जनजीवन पूर्णपणे होरपळून गेले होते. मागील आठवडाभर तर तापमान ४३ अंशाकडे वेगाने झेपावू लागल्याने दुपारी घराबाहेर पडणेही मुश्लिक झाले होते.

तीव्र झळांनी जीव कासावीस होत असतानाच बुधवारपासून अचानक वातावरणात बदल जाणवू लागला. सकाळबरोबर दुपारीही गार वारे वाहत असल्याने उन्हाची तीव्रता जाणवत नाही. उन्हाची प्रखरताही कमी झाली आहे.

रात्रीचे तापमानही २२ अंश सेल्सीअसपर्यंत कमी झाल्याने पहाटे थंडी जाणवत आहे. गेल्या महिन्याभरात अत्यूच्च तापमानाचा आणि असह्य उन्हाच्या झळा सोसलेल्या कोल्हापुरकरांना दोन दिवसापासून आल्हादायक वातावरणाचा सुखद अनुभव येत आहे.

 

 

टॅग्स :Temperatureतापमानkolhapurकोल्हापूर