शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पंचगंगा प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा -धैर्यशील माने यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:30 IST

कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे.

ठळक मुद्दे कुरुंदवाड येथे उपोषण; प्रदूषण नियंत्रण मंडळावर टीकास्त्र

कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पंचगंगा गटारगंगा बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण नियंत्रणाचे काम करीत नसून, तडजोडीचे काम करीत आहे. त्याचे पाप पंचगंगाकाठच्या नागरिकांना भोगावे लागत असून, नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी केले.

पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने येथील नगरपालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी माने बोलत होते. प्रारंभ समितीचे पदाधिकारी व पंचगंगाकाठच्या नागरिकांनी तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर नदीपात्रात उतरून जलपर्णी घेऊन व मानवी विळखा घालून नदी प्रदूषण करणाºया घटकांचा व प्रशासनाचा निषेध कला. त्यानंतर येथील पालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, रामभाऊ मोहिते, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, आप्पासोबंडगर, विलास कांबळे, सतीशभंडारे, आदींनी आंदोलन यशस्वी होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.यावेळी कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, साधना मंडळाचे जयपाल बलवान, दीपक पोमाजे, सुनील कुरुंदवाडे, कृष्णा लोकरे, दीपक गायकवाड, अभिजित पाटील, मधुकर सासणे, विश्वास बालिघाटे, किरण आलासे यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.माणगाव बंद उद्यारुकडी माणगाव : पंचगंगा बचाव कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माणगाव (ता. हातकणंगले) येथे उद्या, रविवारी गावबंद व जागृती फेरीसह साखळी उपोषण करण्याचे येथील महादेव मंदिरात झालेला सर्वपक्षीय बैठकीत जाहीर करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी पाटील होत्या.पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी रुकडी येथे पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने दि. १ जूनपासून पुकारण्यात आलेल्या साखळी उपोषणाची दाहकता वाढत असून, हातकणगंले व शिरोळ तालुक्यांत या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे. या उपोषणामध्ये माणगाववाडीचे ग्रामस्थही सहभागी होणार असल्याची माहिती झाकीर भालदार यांनी दिली.पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने तेरवाड येथील पंचगंगा नदीला मानवी विळखा घालताना जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने, विश्वास बालिघाटे, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, विलास कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.