शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

पंचगंगा प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा -धैर्यशील माने यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:30 IST

कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे.

ठळक मुद्दे कुरुंदवाड येथे उपोषण; प्रदूषण नियंत्रण मंडळावर टीकास्त्र

कुरुंदवाड : कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीरणाचे पाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण गंभीर बनले आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पंचगंगा गटारगंगा बनली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण नियंत्रणाचे काम करीत नसून, तडजोडीचे काम करीत आहे. त्याचे पाप पंचगंगाकाठच्या नागरिकांना भोगावे लागत असून, नदी प्रदूषणमुक्त होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने यांनी केले.

पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने येथील नगरपालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी माने बोलत होते. प्रारंभ समितीचे पदाधिकारी व पंचगंगाकाठच्या नागरिकांनी तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर नदीपात्रात उतरून जलपर्णी घेऊन व मानवी विळखा घालून नदी प्रदूषण करणाºया घटकांचा व प्रशासनाचा निषेध कला. त्यानंतर येथील पालिका चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष जयराम पाटील, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, रामभाऊ मोहिते, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, आप्पासोबंडगर, विलास कांबळे, सतीशभंडारे, आदींनी आंदोलन यशस्वी होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.यावेळी कुरुंदवाड अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण आलासे, साधना मंडळाचे जयपाल बलवान, दीपक पोमाजे, सुनील कुरुंदवाडे, कृष्णा लोकरे, दीपक गायकवाड, अभिजित पाटील, मधुकर सासणे, विश्वास बालिघाटे, किरण आलासे यांच्यासह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.माणगाव बंद उद्यारुकडी माणगाव : पंचगंगा बचाव कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माणगाव (ता. हातकणंगले) येथे उद्या, रविवारी गावबंद व जागृती फेरीसह साखळी उपोषण करण्याचे येथील महादेव मंदिरात झालेला सर्वपक्षीय बैठकीत जाहीर करण्यात आले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच अश्विनी पाटील होत्या.पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी रुकडी येथे पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने दि. १ जूनपासून पुकारण्यात आलेल्या साखळी उपोषणाची दाहकता वाढत असून, हातकणगंले व शिरोळ तालुक्यांत या साखळी उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे. या उपोषणामध्ये माणगाववाडीचे ग्रामस्थही सहभागी होणार असल्याची माहिती झाकीर भालदार यांनी दिली.पंचगंगा नदी प्रदूषण विरोधी कृती समितीच्यावतीने तेरवाड येथील पंचगंगा नदीला मानवी विळखा घालताना जिल्हा परिषदेचे सदस्य धैर्यशील माने, विश्वास बालिघाटे, दादासो पाटील, प्रा. चंद्रकांत मोरे, विलास कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.