शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

गवे शेतात....अधिकारी कार्यालयात

By admin | Updated: November 9, 2014 23:30 IST

पन्हाळा तालुका : पिकांचे नुकसान; अनेक उपाययोजना कुचकामी

राम करले - बाजारभोगाव -पन्हाळा तालुक्यातील शेती व्यवसाय गव्यांमुळे धोक्यात आला आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊनही कवडीमोल भरपाई देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा महाप्रताप वनखात्याने सुरू केला आहे. दिवसाढवळ्या शेतात येऊन नुकसान करणाऱ्या रेड्यांना आवरणार कोण? हा खरा प्रश्न आहे. परिणामी ‘गवे शेतात, वनखात्याचे अधिकारी कार्यालयात’ असा दुर्दैवी अनुभव शेतकऱ्यांना येऊ लागला आहे.पन्हाळा पश्चिम भागातील किसरूळ, काळजवडे, मानवाड, पाटपन्हाळा, वाशी, पडसाळी, मुगडेवाडी, बांद्रेवाडी, पोर्ले, बोरगाव, पोहाळवाडी, कळे, वाळकेवाडी, आतकिरवाडी, सुळे, पणोरे, आदी गाव परिसरात गव्यांनी शेतीपिकांमध्ये उच्छाद मांडला आहे. शेतात घुसलेले गवे हुसकावून लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. फटाके वाजवणे, कुत्री गव्यांच्या अंगावर सोडणे हे प्रकार गव्यांच्या सवयीचे झाले आहेत. त्यामुळे त्यांना हुसकावून लावण्यासाठी काय करायचे, हा प्रश्न आहे. शेतपिकांची गव्यांपासून राखण करण्यासाठी रात्रभर जागे राहण्याची वेळ बळिराजावर आली आहे. काबाडकष्ट करून रात्रीची झोप आवश्यक असताना जागरण होते. त्यामुळे शारीरिक व्याधींना आमंत्रण मिळत आहे. गव्यांपासून संरक्षणासाठी वनखात्याकडून कडक उपाययोजना आखल्या जात नाहीत. ‘गव्यांना आवरा, आमचा संसार सावरा’ अशी आर्त हाक अधिकाऱ्यांच्या कानी पडत नाही. शेतात शिरलेल्या गव्यांना हुसकावून लावण्यासाठी खात्याचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. गव्यांच्या बंदोबस्तासाठी काही ठिकाणी जंगलाभोवती चरीची कामे करण्यात आली आहेत. मात्र, शासनाच्या मार्गदर्शन तत्त्वाला तिलांजली देत अधिकाऱ्यांनी काही लाख रुपयांचा खर्च चरींमध्ये मुरविल्याची चर्चा आहे. त्यामुळे असून अडचण, नसून खोळंबा, अशी अवस्था चरींच्या कामाची झाली आहे.शेतात राखणीला गेलेल्या शेतकऱ्यांवर गव्यांकडून हल्ला झाल्याने मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. लक्ष्मण खोत - काऊरवाडी, दादू मोरे - मोताईवाडी या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनेक शेतकरी जखमी झाले असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना दोन लाख रुपये, तर मृतांना पाच लाख रुपये द्यावेत. मृत शेतकऱ्याच्या वारसांना खात्याच्या सेवेत सामील करून घ्यावे. जंगलाच्या भोवती सौरऊर्जेचे कुंपन घालावे. गव्यांना आवश्यक गरजा जंगल परिसरात उपलब्ध कराव्यात. जंगलापेक्षा परिसरात भटकणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे.- रामचंद्र बाबू कर्ले,अध्यक्ष, संयुक्त वन समिती, पिसात्री.