शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लघुउद्योगात महिला बचत गटांची भरारी

By admin | Updated: January 9, 2017 00:23 IST

दोन वर्षांत उभारले दोन हजार उद्योग : ९९ टक्के कर्जाची परतफेड; आर्थिक सबलीकरण

इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूरएक महिला शिकली की फक्त आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर आपल्या बरोबरीच्या महिलांनाही प्रगतीचा मार्ग दाखविते, हे सिद्ध केलंय कोल्हापुरातील महिला बचत गटांनी. ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही म्हण खरी ठरवीत या गटांनी अवघ्या दोन वर्षांत २०१९ नवीन उद्योग उभारले आहेत. दुसरीकडे, या उद्योगांसाठी जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची सरासरी ९९ टक्के इतकी परतफेड केली आहे. महिला सबलीकरणाच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) अंतर्गत २००० सालापासून स्वयंसाहाय्यता महिला बचतगटांची सुरुवात करण्यात आली. किमान दहा महिला अशी अट असलेल्या या गटांद्वारे पहिले सहा महिने अंतर्गत कर्जपुरवठा केला जातो. त्यानंतर त्यांना जिल्हा बँकेकडून ५० हजार रुपये, त्याची परतफेड केल्यानंतर एक लाख आणि त्यानंतर दोन लाख रुपये असा कर्जपुरवठा केला जातो. बँकेचा व्याजदर वर्षाला साडेचौदा टक्के असतो. मात्र गटांतर्गत त्याचे व्याज दोन टक्के इतके असते. सुरुवातीला गटातील महिला स्वत:च्या कुटुंबाच्या गरजा, मुलांचा शैक्षणिक खर्च, आरोग्य अशा कारणांसाठी कर्जाची रक्कम वापरतात. त्यानंतर पुढे वाढत जाणाऱ्या कर्जाच्या रकमेपासून घरगुती पद्धतीने लघुउद्योगांना सुरुवात केली जाते. गटाच्या माध्यमातून एकत्रितरीत्या नवा व्यवसाय करण्याचे प्रमाण अधिक आहे. यात गारमेंट, ब्यूटी पार्लर, दुकान, शॉपीज, भाजी-फळांची विक्री, स्वस्त धान्य दुकान, दूध व दुग्धजन्य पदार्थ, भाडेतत्त्वावर शेती अशा विविध उद्योगांचा समावेश आहे. अशा रीतीने सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षात २०१९ नवीन उद्योगांची उभारणी या गटांनी केली आहे. बँकिंग व्यवहारात अग्रेसर जिल्हा बँकेच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरअखेर ३६ हजार ९७० महिला बचत गट स्थापन झाले असून, त्यांपैकी २९ हजार ८६९ गटांना ८६९२.१९ लाख इतके कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्ह्णातील जवळपास ५ लाख ३७ हजार ७४२ बचत गट महिला सदस्या बँकेचे व्यवहार करीत आहेत. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसला आहे. काही यशोगाथा बेलवळे येथील भावेश्वरी महिला बचत गटातर्फे खत, बी-बियाणेकेंद्र चालविले जाते. शेळेवाडी येथील जयलक्ष्मी महिला बचत गटाकडून सामुदायिक शेती, दूध संस्था, ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देणे, हे उद्योग केले जातात. शिरोली दुमाला येथील समृद्धी महिला बचतगट, सारथी महिला बचतगट, रोहिणी महिला बचत गट यांनी पुण्यातील मॉलमध्ये भाग घेतला होता. ‘नाबार्ड’अंतर्गत सर्व योजना बचत गटांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा बँक प्रयत्नशील असते.त्यांनी उभारलेल्या उद्योगांमुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. - स्नेहल करंडे, महिला विकास अधिकारी