शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

फेरीवाल्यांनी लढ्यासाठी सज्ज व्हाव

By admin | Updated: March 25, 2016 00:38 IST

सर्वपक्षीय बैठकीत आवाहन : दहा दिवसांत महामेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर : शहरातील कोणत्याही फेरीवाल्यांवर अन्याय होऊ नये, त्यांचा हक्क त्यांना प्राप्त व्हावा, सर्व घटकांतील फेरीवाल्यांना संरक्षण मिळावे याकरिता सर्व फेरीवाल्यांनी संघटितपणे लढाईसाठी सज्ज राहण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी शहरातील सर्व फेरीवाल्यांचा एक महामेळावा लवकरच घेण्याचा निर्णय झाला. मंगळवारी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्या बैठकीत महामेळावा घेण्यावर एकमत करण्यात आले. बैठकिच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर नंदकुमार वळंजू होते. कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे येत्या दोन-चार दिवसांत शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे संकेत मिळाल्यानंतर सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावतीने कम्युनिस्ट पक्षाच्या बिंदू चौकातील कार्यालयात बैठक घेण्यात आली.प्रास्ताविकपर भाषणात फेरीवाला कृती समितीचे अध्यक्ष आर. के. पोवार यांनी सर्व फेरीवाल्यांच्या योग्य पुनर्वसनाबाबत सविस्तर माहिती विशद करून फेरीवाला कृती समिती व महानगरपालिका प्रशासनाच्या बैठकीत वेळोवेळी आपण आपल्या निर्णयाशी ठाम असल्याने फेरीवाल्यांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.माजी नगरसेवक अशोकराव भंडारे यांनी, फेरीवाला समिती व महापालिका प्रशासनाच्या झालेल्या वळोवेळच्या बैठकीत कोणतेही गांभीर्य नसल्याचे सांगून प्रशासनाच्या निर्णयावर विसंबून अगर विश्वास न ठेवता आपला अधिकार हक्क प्राप्त करून घेण्यासाठी एक व्यापक लढा उभा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. समीर नदाफ यांनी, प्रभाग समितीच्या झालेल्या बैठकीत आणि प्रत्यक्षात प्रशासन करत असलेल्या कार्यवाहीबाबत आकडेवारीत तफावत असून, यामधून काय आणि कशा पद्धतीने पुनर्वसन होणार याबाबत फेरीवाल्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे सांगितले. महमंद शरीफ शेख यांनीही, पापाची तिकटी ते खाटिक चौक परिसरातील फेरीवाल्यांचा निर्णय प्रशासनाने घेतला नसल्याचे सांगून त्याच्या पुनर्वसनाबाबत अद्याप निर्णय होत नसल्याने येथील फेरीवाले चिंताग्रस्त झाले आहेत, असे सांगितले. सुरेश जरग यांनी, ज्यांच्याकडे बायोमेट्रिक कार्ड असतील त्यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी होणार असल्याने सर्व फेरीवाल्यांनी बायोमेट्रिक कार्ड घेण्यासाठी योग्य ते शुल्क भरण्यासाठी आग्रही राहावे, असे सांगितले. यावेळी भाऊसाहेब गणपुले, कॉ. दिलीप पवार, रमाकांत उरसाल, मारुती भागोजी, अरुण शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात माजी महापौर नंदकुमार वळंजू म्हणाले, फेरीवाला कृती समिती आणि प्रशासन यांच्यात पुनर्वसनाबाबत वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले, त्याबाबत आपण आशावादी असल्याचे सांगितले. महापालिकेच्या योग्य व न्याय कारवाईस सर्वपक्षीय फेरीवाला समिती त्यांच्यासोबत राहणार आहे तरीही फेरीवाल्यांनी गाफील न राहता महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन केले. बाबासाो मुल्ला, विजय नागवेकर, बाळासाहेब कागलकर, शांताबाई गुरव, सुलोचना यादव, दिलीप बावणे, विठ्ठल येडगे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पालिकेचे कारवाईचे संकेतमहापालिकेतर्फे शहरातील अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे संकेतसर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीच्यावतीने कम्युनिस्ट पक्षाच्या बिंदू चौकातील कार्यालयात बैठक