शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती

By admin | Updated: August 13, 2015 00:12 IST

सायझिंग संपाबाबत समन्वयाची गरज : लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता

घन:शाम कुंभार- यड्राव -सायझिंग कामगारांच्या बेमुदत संपामुळे वस्त्रनगरीचे अर्थचक्र मंदगतीने सुरू आहे. त्यावर अवलंबून असलेल्या यंत्रमागधारकांसह सर्व घटक हवालदिल झाले आहेत. याबाबत समन्वयाने लवकर तोडगा काढण्यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.सुधारित किमान वेतन अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांनी संपाचे हत्यार उचलले आहे. याकडे सायझिंग मालकांनी पाठ फिरवली आहे. या संपामुळे वीस-बावीस दिवसांपासून यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे मिळणे बंद होत आले असल्याने यंत्रमाग कारखाने बिमाअभावी बंद आहेत. त्याचा विपरित परिणाम यंत्रमाग कामगारांसह इतर अवलंबून असणाऱ्या घटकांवर होत आहे.सायझिंग कामगार किमान वेतनाबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयामध्ये जो निर्णय होईल तो सर्वमान्य असेल. परंतु सद्य:स्थितीत सायझिंगची चाके फिरल्यास वस्त्रोद्योगास गती मिळू शकते, अशी भावना यंत्रमागधारकांमध्ये आहे. यंत्रमाग कारखाने बिमांअभावी बंद आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेले यंत्रमागधारक पुन्हा आर्थिक अडचणीत ढकलला जात आहे. यंत्रमाग बंद असल्याने परप्रांतीय कामगारांना आपापल्या प्रांताकडे जाण्याचे वेध लागले आहेत. तर स्थानिक कामगारांना उचल देऊन त्यांना सांभाळण्याची जबाबदारी यंत्रमागधारकांवर आली आहे.सण, उत्सव समोर आल्यामुळे परप्रांतीय कामगार आपल्या भागाकडे गेल्यास तो सर्व सण, उत्सव, दीपावली करून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कामगारांअभावी यंत्रमाग व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे यंत्रमागधारकांवरील आर्थिक बोजा वाढत जाणार आहे.इचलकरंजीतील उत्पादित होणारे केंब्रिक, पॉपलीन, मलमल, आदी कापड या संपामुळे बंद राहिल्यास त्याचा व्यापार भिवंडी, मालेगाव, राजस्थान, पाली आदीकडे जाऊ शकतो. हे संभाव्य धोके हा संप लांबल्यास निर्माण होऊ शकतात. यामुळे या संपात सायझिंग मालक व कामगार यांच्यामध्ये समन्वय होणे आवश्यक आहे.कारण सायझिंग म्हणजे वस्त्रोद्योगाचे उगमस्थान आहे. सायझिंग सुरू राहिल्यास वस्त्रोद्योगास पूरक ठरते, यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती निर्माण झाली आहे...इचलकरंजी वगळता मागणी नाहीवस्त्रोद्योग महाराष्ट्रामधील मालेगाव, भिवंडी, विटा, सोलापूर, माधवनगर या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. तेथील सायझिंग व यंत्रमाग व्यवसाय विनातक्रार सुरू आहेत. सायझिंग किमान वेतनासाठी इचलकरंजी वगळता कोठेही मागणी नसल्याची चर्चा यंत्रमागधारकांत आहे. इचलकरंजी शहरालगत असलेले यड्राव, तारदाळ, खोतवाडी, पार्वती औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सुमारे सहाशे यंत्रमाग कारखाने असून, वीस हजार यंत्रमाग आहेत.