शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती

By admin | Updated: August 13, 2015 00:12 IST

सायझिंग संपाबाबत समन्वयाची गरज : लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता

घन:शाम कुंभार- यड्राव -सायझिंग कामगारांच्या बेमुदत संपामुळे वस्त्रनगरीचे अर्थचक्र मंदगतीने सुरू आहे. त्यावर अवलंबून असलेल्या यंत्रमागधारकांसह सर्व घटक हवालदिल झाले आहेत. याबाबत समन्वयाने लवकर तोडगा काढण्यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडकण्याची भीती निर्माण झाली आहे.सुधारित किमान वेतन अंमलबजावणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांनी संपाचे हत्यार उचलले आहे. याकडे सायझिंग मालकांनी पाठ फिरवली आहे. या संपामुळे वीस-बावीस दिवसांपासून यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे मिळणे बंद होत आले असल्याने यंत्रमाग कारखाने बिमाअभावी बंद आहेत. त्याचा विपरित परिणाम यंत्रमाग कामगारांसह इतर अवलंबून असणाऱ्या घटकांवर होत आहे.सायझिंग कामगार किमान वेतनाबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयामध्ये जो निर्णय होईल तो सर्वमान्य असेल. परंतु सद्य:स्थितीत सायझिंगची चाके फिरल्यास वस्त्रोद्योगास गती मिळू शकते, अशी भावना यंत्रमागधारकांमध्ये आहे. यंत्रमाग कारखाने बिमांअभावी बंद आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेले यंत्रमागधारक पुन्हा आर्थिक अडचणीत ढकलला जात आहे. यंत्रमाग बंद असल्याने परप्रांतीय कामगारांना आपापल्या प्रांताकडे जाण्याचे वेध लागले आहेत. तर स्थानिक कामगारांना उचल देऊन त्यांना सांभाळण्याची जबाबदारी यंत्रमागधारकांवर आली आहे.सण, उत्सव समोर आल्यामुळे परप्रांतीय कामगार आपल्या भागाकडे गेल्यास तो सर्व सण, उत्सव, दीपावली करून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कामगारांअभावी यंत्रमाग व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे यंत्रमागधारकांवरील आर्थिक बोजा वाढत जाणार आहे.इचलकरंजीतील उत्पादित होणारे केंब्रिक, पॉपलीन, मलमल, आदी कापड या संपामुळे बंद राहिल्यास त्याचा व्यापार भिवंडी, मालेगाव, राजस्थान, पाली आदीकडे जाऊ शकतो. हे संभाव्य धोके हा संप लांबल्यास निर्माण होऊ शकतात. यामुळे या संपात सायझिंग मालक व कामगार यांच्यामध्ये समन्वय होणे आवश्यक आहे.कारण सायझिंग म्हणजे वस्त्रोद्योगाचे उगमस्थान आहे. सायझिंग सुरू राहिल्यास वस्त्रोद्योगास पूरक ठरते, यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची आवश्यकता आहे; अन्यथा वस्त्रनगरीचे अर्थचक्र अडखळण्याची भीती निर्माण झाली आहे...इचलकरंजी वगळता मागणी नाहीवस्त्रोद्योग महाराष्ट्रामधील मालेगाव, भिवंडी, विटा, सोलापूर, माधवनगर या शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात आहे. तेथील सायझिंग व यंत्रमाग व्यवसाय विनातक्रार सुरू आहेत. सायझिंग किमान वेतनासाठी इचलकरंजी वगळता कोठेही मागणी नसल्याची चर्चा यंत्रमागधारकांत आहे. इचलकरंजी शहरालगत असलेले यड्राव, तारदाळ, खोतवाडी, पार्वती औद्योगिक वसाहत परिसरामध्ये सुमारे सहाशे यंत्रमाग कारखाने असून, वीस हजार यंत्रमाग आहेत.