शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

हद्दवाढीविरोधात गुरुवारपासून उपोषण

By admin | Updated: August 20, 2016 00:11 IST

कृती समितीच्या बैठकीत घोषणा : अठरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होणार; दबावाला हक्काने उत्तर देऊ : नरके

कोल्हापूर : हद्दवाढविरोधात समर्थक व विरोधक यांच्यात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. यामध्ये अठरा गावांतील ग्रामस्थांचे गुरुवार(दि. २५)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीने शुक्रवारी केली. समर्थकांकडून सरकारवर आणल्या जाणाऱ्या दबावाला न्याय्य हक्काने आंदोलनाच्या माध्यमातून योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला.शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष संपतराव पवार-पाटील होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, समितीचे प्रवक्ते नाथाजीराव पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव पाटील, अजित नरके, पै. संभाजी पाटील उपस्थित होते.गुरुवारपासून हद्दवाढ विरोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. याला अठरा गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थांनी हात उंचावून पाठिंबा दिला.आमदार नरके म्हणाले, आता विकासाचे राजकारण बाजूला पडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. काही ठरावीकच लोक हद्दवाढ होण्यासाठी उपोषणाचा घाट घालून सरकारवर दबाव आणत आहेत; परंतु त्यांचा दबाव तेथील जनतेचा नसून काही नेत्यांपुरताच मर्यादित आहे. याउलट आमची लढाई ही हक्कांसाठी असून, ती कोणावरही दबावासाठी नाही. दबावाला ग्रामीण भागातील जनता आपल्या हक्कांसाठी उपोषण करून योग्य उत्तर देईल.संपतराव पवार-पाटील म्हणाले, या आंदोलनामध्ये अठरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होतील. हा एक ऐतिहासिक लढा असून, ग्रामीण जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राज्य शासन आमच्या न्याय्य मागणीची दखल घेऊन हद्दवाढीची अधिसूचना काढणार नाही, असा विश्वास आहे.ढपलेवाल्यांना विचारणारेच कोणी नाही?ग्रामीण भागात एखादा अपहार झाल्याची चर्चा झाल्यास ग्रामसभेत याचा जाब विचारला जातो; पण शहरात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतात; त्यामुळे वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरतात; परंतु त्यांना जाब विचारणारे कोणीच नाही, अशी टीका समितीच्या एका कार्यकर्त्याने केली. शहराची गटारगंगा कोणी केली हे सर्वश्रुतग्रामीण भागातील नेत्यांमुळे शहराची गटारगंगा झाली, अशी वक्तव्ये हद्दवाढसमर्थक नेत्यांकडून केली जात आहेत. परंतु, ती नेमकी कुणामुळे झाली हे सर्वश्रुत आहे. ज्या ग्रामीण नेत्यांनी विश्वासाने पालिकेची सूत्रे ज्यांच्या हातात दिली, त्यांनीच ही गटारगंगा केली, असा टोला आमदार नरके यांनी नामोल्लेख टाळून महापालिका पदाधिकाऱ्यांना लगावला.आकसबुद्धीचे राजकारणनगरसेवकाला एखाद्या भागात मतदान मिळाले नसेल तर त्या भागातील कामे करायचीच नाहीत, असे अप्रत्यक्ष आदेशच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. एखाद्याने कामाविषयी संबंधित कर्मचाऱ्याला विचारल्यास त्या कर्मचाऱ्याकडून ‘संबंधित नगरसेवकाची परवानगी घ्या,’ असे उत्तर दिले जाते, ही परिस्थिती समितीच्या कार्यकर्त्याने यावेळी मांडली.