शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

हद्दवाढीविरोधात गुरुवारपासून उपोषण

By admin | Updated: August 20, 2016 00:11 IST

कृती समितीच्या बैठकीत घोषणा : अठरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होणार; दबावाला हक्काने उत्तर देऊ : नरके

कोल्हापूर : हद्दवाढविरोधात समर्थक व विरोधक यांच्यात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. यामध्ये अठरा गावांतील ग्रामस्थांचे गुरुवार(दि. २५)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीने शुक्रवारी केली. समर्थकांकडून सरकारवर आणल्या जाणाऱ्या दबावाला न्याय्य हक्काने आंदोलनाच्या माध्यमातून योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला.शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष संपतराव पवार-पाटील होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, समितीचे प्रवक्ते नाथाजीराव पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव पाटील, अजित नरके, पै. संभाजी पाटील उपस्थित होते.गुरुवारपासून हद्दवाढ विरोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. याला अठरा गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थांनी हात उंचावून पाठिंबा दिला.आमदार नरके म्हणाले, आता विकासाचे राजकारण बाजूला पडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. काही ठरावीकच लोक हद्दवाढ होण्यासाठी उपोषणाचा घाट घालून सरकारवर दबाव आणत आहेत; परंतु त्यांचा दबाव तेथील जनतेचा नसून काही नेत्यांपुरताच मर्यादित आहे. याउलट आमची लढाई ही हक्कांसाठी असून, ती कोणावरही दबावासाठी नाही. दबावाला ग्रामीण भागातील जनता आपल्या हक्कांसाठी उपोषण करून योग्य उत्तर देईल.संपतराव पवार-पाटील म्हणाले, या आंदोलनामध्ये अठरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होतील. हा एक ऐतिहासिक लढा असून, ग्रामीण जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राज्य शासन आमच्या न्याय्य मागणीची दखल घेऊन हद्दवाढीची अधिसूचना काढणार नाही, असा विश्वास आहे.ढपलेवाल्यांना विचारणारेच कोणी नाही?ग्रामीण भागात एखादा अपहार झाल्याची चर्चा झाल्यास ग्रामसभेत याचा जाब विचारला जातो; पण शहरात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतात; त्यामुळे वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरतात; परंतु त्यांना जाब विचारणारे कोणीच नाही, अशी टीका समितीच्या एका कार्यकर्त्याने केली. शहराची गटारगंगा कोणी केली हे सर्वश्रुतग्रामीण भागातील नेत्यांमुळे शहराची गटारगंगा झाली, अशी वक्तव्ये हद्दवाढसमर्थक नेत्यांकडून केली जात आहेत. परंतु, ती नेमकी कुणामुळे झाली हे सर्वश्रुत आहे. ज्या ग्रामीण नेत्यांनी विश्वासाने पालिकेची सूत्रे ज्यांच्या हातात दिली, त्यांनीच ही गटारगंगा केली, असा टोला आमदार नरके यांनी नामोल्लेख टाळून महापालिका पदाधिकाऱ्यांना लगावला.आकसबुद्धीचे राजकारणनगरसेवकाला एखाद्या भागात मतदान मिळाले नसेल तर त्या भागातील कामे करायचीच नाहीत, असे अप्रत्यक्ष आदेशच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. एखाद्याने कामाविषयी संबंधित कर्मचाऱ्याला विचारल्यास त्या कर्मचाऱ्याकडून ‘संबंधित नगरसेवकाची परवानगी घ्या,’ असे उत्तर दिले जाते, ही परिस्थिती समितीच्या कार्यकर्त्याने यावेळी मांडली.