शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीविरोधात गुरुवारपासून उपोषण

By admin | Updated: August 20, 2016 00:11 IST

कृती समितीच्या बैठकीत घोषणा : अठरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होणार; दबावाला हक्काने उत्तर देऊ : नरके

कोल्हापूर : हद्दवाढविरोधात समर्थक व विरोधक यांच्यात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. यामध्ये अठरा गावांतील ग्रामस्थांचे गुरुवार(दि. २५)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीने शुक्रवारी केली. समर्थकांकडून सरकारवर आणल्या जाणाऱ्या दबावाला न्याय्य हक्काने आंदोलनाच्या माध्यमातून योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला.शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष संपतराव पवार-पाटील होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, समितीचे प्रवक्ते नाथाजीराव पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव पाटील, अजित नरके, पै. संभाजी पाटील उपस्थित होते.गुरुवारपासून हद्दवाढ विरोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. याला अठरा गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थांनी हात उंचावून पाठिंबा दिला.आमदार नरके म्हणाले, आता विकासाचे राजकारण बाजूला पडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. काही ठरावीकच लोक हद्दवाढ होण्यासाठी उपोषणाचा घाट घालून सरकारवर दबाव आणत आहेत; परंतु त्यांचा दबाव तेथील जनतेचा नसून काही नेत्यांपुरताच मर्यादित आहे. याउलट आमची लढाई ही हक्कांसाठी असून, ती कोणावरही दबावासाठी नाही. दबावाला ग्रामीण भागातील जनता आपल्या हक्कांसाठी उपोषण करून योग्य उत्तर देईल.संपतराव पवार-पाटील म्हणाले, या आंदोलनामध्ये अठरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होतील. हा एक ऐतिहासिक लढा असून, ग्रामीण जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राज्य शासन आमच्या न्याय्य मागणीची दखल घेऊन हद्दवाढीची अधिसूचना काढणार नाही, असा विश्वास आहे.ढपलेवाल्यांना विचारणारेच कोणी नाही?ग्रामीण भागात एखादा अपहार झाल्याची चर्चा झाल्यास ग्रामसभेत याचा जाब विचारला जातो; पण शहरात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतात; त्यामुळे वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरतात; परंतु त्यांना जाब विचारणारे कोणीच नाही, अशी टीका समितीच्या एका कार्यकर्त्याने केली. शहराची गटारगंगा कोणी केली हे सर्वश्रुतग्रामीण भागातील नेत्यांमुळे शहराची गटारगंगा झाली, अशी वक्तव्ये हद्दवाढसमर्थक नेत्यांकडून केली जात आहेत. परंतु, ती नेमकी कुणामुळे झाली हे सर्वश्रुत आहे. ज्या ग्रामीण नेत्यांनी विश्वासाने पालिकेची सूत्रे ज्यांच्या हातात दिली, त्यांनीच ही गटारगंगा केली, असा टोला आमदार नरके यांनी नामोल्लेख टाळून महापालिका पदाधिकाऱ्यांना लगावला.आकसबुद्धीचे राजकारणनगरसेवकाला एखाद्या भागात मतदान मिळाले नसेल तर त्या भागातील कामे करायचीच नाहीत, असे अप्रत्यक्ष आदेशच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. एखाद्याने कामाविषयी संबंधित कर्मचाऱ्याला विचारल्यास त्या कर्मचाऱ्याकडून ‘संबंधित नगरसेवकाची परवानगी घ्या,’ असे उत्तर दिले जाते, ही परिस्थिती समितीच्या कार्यकर्त्याने यावेळी मांडली.