शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

इचलकरंजीत घरकुल मिळण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:03 IST

नगरपालिकेसमोर उपोषण : आठवडाभरात घरकुले वितरित करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

इचलकरंजी : येथील जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेली ४४४ घरकुले वितरित करावीत, या मागणीसाठी झोपडपट्टीतील बारा नागरिकांनी सोमवारपासून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले. या प्रश्नाबाबत नगरपालिकेत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये मक्तेदाराचा १ कोटी ४ लाखांचा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, घरकुलांच्या वितरणाबाबत नगरपालिकेकडून वारंवार आश्वासने देऊन ती पाळली जात नाहीत, याच्या निषेधार्थ नागरिकांनी उपोषण सुरूच ठेवले.केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम गेले चार वर्षे सुरू आहे. ही घरकुले तयार असूनही लाभार्थींना घरे मिळत नसल्याबद्दल झोपडपट्टीवासीयांमध्ये संताप आहे. घरकुले ताबडतोब द्यावीत यासाठी झोपडपट्टी- वासीयांकडून गेले सहा महिनेहून अधिक काळ नगरपालिकेकडे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नगरपालिका प्रशासन त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. म्हणून सोमवारी झोपडपट्टीतील अकरा नागरिकांनी नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा बिरंजे यांच्या कार्यालयात मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपनगराध्यक्ष महावीर जैन, नगरसेवक सुनील पाटील, अजित जाधव, विठ्ठल चोपडे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, आदींबरोबर लाभार्थींच्या- वतीने नाना पारडे, सतीश टेकाळे, संजय गवळी, संजय निकाळजे, आदींनी चर्चा केली. चर्चेवेळी नगरपालिका वारंवार आश्वासन देऊन ते पूर्ण करत नसल्याबद्दल शिष्टमंडळातील सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ व नगर अभियंता चौधरी यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, नंतर परिस्थिती निवळली.तयार असलेल्या घरकुलांना नळ पाणीपुरवठा जोडणी, वीज जोडणी, भुयारी गटार योजनेबरोबर जोडणी, आदी अंतिम टप्प्यातील कामे ताबडतोब करून द्यावीत आणि लाभार्थींना घरकुलांचे वाटप करावे; अन्यथा आता लाभार्थ्यांचा संयम तुटत चालला असून, ते इमारतींचा घुसून ताबा घेतील, असा इशारा या चर्चेमध्ये आंदोलकांनी दिला. यावर मक्तेदारास धनादेश देण्याची त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. तसेच घरकुलांच्या अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. शेवटी या प्रश्नाबाबत शुक्रवारी (२३ सप्टेंबर) मक्तेदाराबरोबर सर्वांची बैठक घेण्याचा आणि २६ सप्टेंबरला लाभार्थींची यादी निश्चित करून घरांना क्रमांक देण्याचे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)मक्तेदाराच्या दुर्लक्षामुळे घरकुल पडूनकेंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम गेले चार वर्षे सुरू आहे. यापैकी १४४ घरकुलांच्या इमारती बांधून पूर्णत्वास आल्या आहेत. मात्र, मक्तेदाराचे बिल दिले नसल्यामुळे त्याने इमारतींची अंतिम कामे केलेली नाहीत.