शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

इचलकरंजीत घरकुल मिळण्यासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 00:03 IST

नगरपालिकेसमोर उपोषण : आठवडाभरात घरकुले वितरित करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन

इचलकरंजी : येथील जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी पुनर्वसन योजनेंतर्गत बांधण्यात आलेली ४४४ घरकुले वितरित करावीत, या मागणीसाठी झोपडपट्टीतील बारा नागरिकांनी सोमवारपासून नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केले. या प्रश्नाबाबत नगरपालिकेत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये मक्तेदाराचा १ कोटी ४ लाखांचा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, घरकुलांच्या वितरणाबाबत नगरपालिकेकडून वारंवार आश्वासने देऊन ती पाळली जात नाहीत, याच्या निषेधार्थ नागरिकांनी उपोषण सुरूच ठेवले.केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम गेले चार वर्षे सुरू आहे. ही घरकुले तयार असूनही लाभार्थींना घरे मिळत नसल्याबद्दल झोपडपट्टीवासीयांमध्ये संताप आहे. घरकुले ताबडतोब द्यावीत यासाठी झोपडपट्टी- वासीयांकडून गेले सहा महिनेहून अधिक काळ नगरपालिकेकडे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. मात्र, नगरपालिका प्रशासन त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. म्हणून सोमवारी झोपडपट्टीतील अकरा नागरिकांनी नगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा बिरंजे यांच्या कार्यालयात मुख्याधिकारी डॉ. रसाळ, उपनगराध्यक्ष महावीर जैन, नगरसेवक सुनील पाटील, अजित जाधव, विठ्ठल चोपडे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, आदींबरोबर लाभार्थींच्या- वतीने नाना पारडे, सतीश टेकाळे, संजय गवळी, संजय निकाळजे, आदींनी चर्चा केली. चर्चेवेळी नगरपालिका वारंवार आश्वासन देऊन ते पूर्ण करत नसल्याबद्दल शिष्टमंडळातील सदस्यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ व नगर अभियंता चौधरी यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, नंतर परिस्थिती निवळली.तयार असलेल्या घरकुलांना नळ पाणीपुरवठा जोडणी, वीज जोडणी, भुयारी गटार योजनेबरोबर जोडणी, आदी अंतिम टप्प्यातील कामे ताबडतोब करून द्यावीत आणि लाभार्थींना घरकुलांचे वाटप करावे; अन्यथा आता लाभार्थ्यांचा संयम तुटत चालला असून, ते इमारतींचा घुसून ताबा घेतील, असा इशारा या चर्चेमध्ये आंदोलकांनी दिला. यावर मक्तेदारास धनादेश देण्याची त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले. तसेच घरकुलांच्या अंतिम टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले. शेवटी या प्रश्नाबाबत शुक्रवारी (२३ सप्टेंबर) मक्तेदाराबरोबर सर्वांची बैठक घेण्याचा आणि २६ सप्टेंबरला लाभार्थींची यादी निश्चित करून घरांना क्रमांक देण्याचे ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)मक्तेदाराच्या दुर्लक्षामुळे घरकुल पडूनकेंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना अपार्टमेंट पद्धतीच्या इमारतीमध्ये घरकुले बांधून देण्याचे काम गेले चार वर्षे सुरू आहे. यापैकी १४४ घरकुलांच्या इमारती बांधून पूर्णत्वास आल्या आहेत. मात्र, मक्तेदाराचे बिल दिले नसल्यामुळे त्याने इमारतींची अंतिम कामे केलेली नाहीत.