शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक तालुक्यात शेतीमाल प्रक्रिया उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:31 IST

कोल्हापूर : कृषी विभागाचा निधी परत जाणे ही अशोभनीय गोष्ट आहे. यापुढे निधीचा विनियोग योग्य प्रकारे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्या. स्वत:चे घर ज्या पद्धतीने एकाग्रतेने बांधता, त्याप्रमाणे कामही केले पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यंदा प्रत्येक तालुक्यात चार शेतमाल प्रक्रिया उद्योग (युनिट) उभारण्यात येणार असल्याचेही ...

कोल्हापूर : कृषी विभागाचा निधी परत जाणे ही अशोभनीय गोष्ट आहे. यापुढे निधीचा विनियोग योग्य प्रकारे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्या. स्वत:चे घर ज्या पद्धतीने एकाग्रतेने बांधता, त्याप्रमाणे कामही केले पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यंदा प्रत्येक तालुक्यात चार शेतमाल प्रक्रिया उद्योग (युनिट) उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शासकीय विश्रामगृह येथे खरीप आढावा बैठक घेण्यात आली. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेताना मंत्री पाटील यांनी अगदी मार्मिक भाषेत अधिकाºयांना सूचना केल्या. खरिपासाठी बियाणे, खते पुरेशी उपलब्ध करून देत असताना २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस असून, त्यासाठी माती परीक्षण, पीकपद्धती, पाणी, खते यांची उपलब्धता करून देण्याबरोबरच त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणही देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात केवळ १६ हजार हेक्टरवर ‘ठिबक’ आहे; यामध्ये वाढ करण्याची गरज असून, एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनी ‘ठिबक’खाली आली पाहिजे. त्यासाठी साखर कारखान्यांना सक्ती करा. ‘शाहू’ कारखान्याला ‘सीएसआर’मधून निधी उपलब्ध करून दिला आहे, त्याप्रमाणे इतरांनाही देऊ. ऊस पिकविला; पण त्यावर प्रक्रिया करणारे साखर कारखाने उभे राहिले नसते तर? साखर कारखाने उभे राहिले म्हणून राज्यातील निम्म्या तालुक्यांचा आर्थिक विकास होऊ शकला. शेती नफ्यात येण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजेत. भुईमूग, भात, सोयाबीनवर प्रक्रिया युनिट झाली तर त्यांच्या दराचा प्रश्नच संपेल. यासाठी प्रत्येक तालुक्यात चार युनिट यावर्षी आपणाला उभी करावयाची आहेत. त्यासाठी अधिकाºयांनी नियोजन करावे, अशी सूचना मंत्री पाटील यांनी केल्या.कर्जमाफीने आनंदी होणार नाहीशेतकºयांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम अधिकारी करू शकतात. कर्जवाटप व कर्जमाफीने शेतकरी कधीच आनंदी होणार नाही. त्याने कमावलेल्या पैशातून आपल्या मुलीचे लग्न ज्यावेळी तो करील, त्यावेळी त्याला खरा आनंद होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.परीट यांच्या संकल्पनेला मंत्र्यांचे पाठबळगावपातळीवर सहायक कृषी अधिकाºयांचे काम कसे चालते याची माहिती मंत्री पाटील यांनी गगनबावड्याचे कृषी अधिकारी नामदेव परीट यांच्याकडून घेतली. परीट यांनी शासकीय योजना व तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता अपेक्षित यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर तीन वर्षांचा विकास आराखडा करा, लागेल तेवढा निधी देतो, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.शेती प्रशिक्षणासाठी एजन्सी नेमणारप्रशिक्षण व अर्धवट माहितीचा फटका शेतकºयांना बसतो, यासाठी एजन्सीच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण द्यायचे. नांगरटीपासून रोज तो शेतकºयांला माहिती देत राहील. राज्यात दहा लाख शेतकºयांना असे प्रशिक्षण देण्याचा विचार मुख्यमंत्री करीत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.५० हजार शेतकºयांच्या खात्यात त्रुटीजिल्ह्यात कर्जमाफीचा २.७५ लाखांपैकी १.७५ लाख शेतकºयांना ३५० कोटींचा लाभ झाला असून, अजून ३५ हजार शेतकºयांची नावे प्रक्रियेत आहेत. ५० हजार नावांमध्ये त्रुटी असून, त्यातीलही जास्तीत जास्त जणांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.