शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

प्रत्येक तालुक्यात शेतीमाल प्रक्रिया उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:31 IST

कोल्हापूर : कृषी विभागाचा निधी परत जाणे ही अशोभनीय गोष्ट आहे. यापुढे निधीचा विनियोग योग्य प्रकारे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्या. स्वत:चे घर ज्या पद्धतीने एकाग्रतेने बांधता, त्याप्रमाणे कामही केले पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यंदा प्रत्येक तालुक्यात चार शेतमाल प्रक्रिया उद्योग (युनिट) उभारण्यात येणार असल्याचेही ...

कोल्हापूर : कृषी विभागाचा निधी परत जाणे ही अशोभनीय गोष्ट आहे. यापुढे निधीचा विनियोग योग्य प्रकारे होईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्या. स्वत:चे घर ज्या पद्धतीने एकाग्रतेने बांधता, त्याप्रमाणे कामही केले पाहिजे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यंदा प्रत्येक तालुक्यात चार शेतमाल प्रक्रिया उद्योग (युनिट) उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शासकीय विश्रामगृह येथे खरीप आढावा बैठक घेण्यात आली. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेताना मंत्री पाटील यांनी अगदी मार्मिक भाषेत अधिकाºयांना सूचना केल्या. खरिपासाठी बियाणे, खते पुरेशी उपलब्ध करून देत असताना २०२२ पर्यंत उत्पन्न दुप्पट करण्याचा मानस असून, त्यासाठी माती परीक्षण, पीकपद्धती, पाणी, खते यांची उपलब्धता करून देण्याबरोबरच त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणही देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात केवळ १६ हजार हेक्टरवर ‘ठिबक’ आहे; यामध्ये वाढ करण्याची गरज असून, एक लाख हेक्टरपेक्षा अधिक जमिनी ‘ठिबक’खाली आली पाहिजे. त्यासाठी साखर कारखान्यांना सक्ती करा. ‘शाहू’ कारखान्याला ‘सीएसआर’मधून निधी उपलब्ध करून दिला आहे, त्याप्रमाणे इतरांनाही देऊ. ऊस पिकविला; पण त्यावर प्रक्रिया करणारे साखर कारखाने उभे राहिले नसते तर? साखर कारखाने उभे राहिले म्हणून राज्यातील निम्म्या तालुक्यांचा आर्थिक विकास होऊ शकला. शेती नफ्यात येण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजेत. भुईमूग, भात, सोयाबीनवर प्रक्रिया युनिट झाली तर त्यांच्या दराचा प्रश्नच संपेल. यासाठी प्रत्येक तालुक्यात चार युनिट यावर्षी आपणाला उभी करावयाची आहेत. त्यासाठी अधिकाºयांनी नियोजन करावे, अशी सूचना मंत्री पाटील यांनी केल्या.कर्जमाफीने आनंदी होणार नाहीशेतकºयांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम अधिकारी करू शकतात. कर्जवाटप व कर्जमाफीने शेतकरी कधीच आनंदी होणार नाही. त्याने कमावलेल्या पैशातून आपल्या मुलीचे लग्न ज्यावेळी तो करील, त्यावेळी त्याला खरा आनंद होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.परीट यांच्या संकल्पनेला मंत्र्यांचे पाठबळगावपातळीवर सहायक कृषी अधिकाºयांचे काम कसे चालते याची माहिती मंत्री पाटील यांनी गगनबावड्याचे कृषी अधिकारी नामदेव परीट यांच्याकडून घेतली. परीट यांनी शासकीय योजना व तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता अपेक्षित यश मिळत नसल्याचे सांगितले. यावर तीन वर्षांचा विकास आराखडा करा, लागेल तेवढा निधी देतो, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.शेती प्रशिक्षणासाठी एजन्सी नेमणारप्रशिक्षण व अर्धवट माहितीचा फटका शेतकºयांना बसतो, यासाठी एजन्सीच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण द्यायचे. नांगरटीपासून रोज तो शेतकºयांला माहिती देत राहील. राज्यात दहा लाख शेतकºयांना असे प्रशिक्षण देण्याचा विचार मुख्यमंत्री करीत असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.५० हजार शेतकºयांच्या खात्यात त्रुटीजिल्ह्यात कर्जमाफीचा २.७५ लाखांपैकी १.७५ लाख शेतकºयांना ३५० कोटींचा लाभ झाला असून, अजून ३५ हजार शेतकºयांची नावे प्रक्रियेत आहेत. ५० हजार नावांमध्ये त्रुटी असून, त्यातीलही जास्तीत जास्त जणांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.