शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संप देशपातळीवर नेणार

By admin | Updated: June 5, 2017 00:38 IST

शेतकरी संप देशपातळीवर नेणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमुक्ती व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे हा केंद्र सरकारच्या पातळीवरील विषय आहे. केंद्रावर दबाव आणण्यासाठी शेतकरी संप देशपातळीवर नेणार आहे. त्यासाठी १६ जून रोजी दिल्लीत देशातील शेतकरी नेत्यांची बैठक आयोजित केली असून, तिथे आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी दिली. शेतकऱ्यांच्या आजच्या संपात ‘स्वाभिमानी’ पूर्ण ताकदीने उतरणार असून, समाजातील इतर घटकांनीही एक दिवस संपात सहभागी होऊन बळिराजाला ताकद द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्राच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे. उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी दिली, त्यांना केंद्राने मदत केली; मग महाराष्ट्राला का करत नाही, असा सवाल करत राजू शेट्टी म्हणाले, आंदोलनाचे लोण आता मध्यप्रदेश, कर्नाटकात सुरू झाले असून, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा विषय केंद्र सरकारच्या हातातील आहे. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी १६ जूनला गांधी फौंडेशन येथे देशातील प्रमुख शेतकरी नेत्यांची बैठक आयोजित करून त्यामध्ये देशभर चळवळ उभी करणार आहे. शेतकरी संपामध्ये तडजोड करण्यासाठी गेलेल्या तथाकथित शेतकरी नेत्यांचा चळवळीचा अभ्यास कमी असल्याने संप विस्कळीत झाला आहे. त्याला दिशा देण्यासाठी ८ जूनला नाशिक येथे संपातील नेत्यांची बैठक आयोजित केली असून, पुढील रणनीती ठरविली जाणार आहे. आजचा संप कडकडीत करण्यासाठी सर्वच घटकांनी सहभागी होऊन बळिराजा एकटा नसल्याचे सरकारला दाखवून देऊया. संप शांततेच्या मार्गाने करावा. शेतीमाल वाहतूक करणारी वाहने अडवून नासधूस करण्यापेक्षा तो माल गरिबांमध्ये वाटावा. हिंसक आंदोलन फार काळ टिकत नाही. शांततेने चाललेले आंदोलन मोडण्याची ताकद जगातील कोणत्याही शक्तीत नाही. संपातील नासधुशीबाबत सोशल मीडियामधून शेतकऱ्यांबद्दलची मते कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना दूध ओतलेले दिसते; पण अनेकांनी दूध, भाजीपाला गरिबांना वाटल्याचे दिसत नाही. यासाठी शेतकऱ्यांनी संयम ठेवावा, असे आवाहन शेट्टी यांनी केले. यावेळी भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, आदी उपस्थित होते. ३१ लाख थकबाकीदारांचा आकडा शंकास्पद मुख्यमंत्री ३१ लाख अल्पभूधारकांना कर्जमाफी करणार असल्याचे सांगत आहेत. अल्पभूधारक शेतकरी हे पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात अधिक असल्याचे २००८ च्या कर्जमाफीवेळी सिद्ध झाले आहे. येथील शेतकऱ्यांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण पाहिले तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आकडा शंकास्पद असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. कृषिमूल्य आयोग बाहुले!केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या धर्तीवर मुख्यमंत्री राज्य कृषिमूल्य आयोगाची स्थापना करत आहेत; पण केंद्रीय कृषिमूल्य आयोग हे राजकारण्यांच्या हातातील बाहुले आहे. पवार यांनी संपात राजकारण आणू नयेशरद पवार यांनी दहा वर्षे कृषिमंत्री म्हणून काम केले. ‘स्वामिनाथन’ हा विषय किती गुंतागुंतीचा आहे, हे त्यांना चांगले माहीत आहे; त्यामुळे त्यांनी राजकारण म्हणून पाहू नये.