शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकरी ताकद दाखवून देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:54 IST

चंदगड : देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करणाºया २०४ संघटनांना एकत्र करून त्यांच्या जोरावर संसदेत शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व ...

चंदगड : देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करणाºया २०४ संघटनांना एकत्र करून त्यांच्या जोरावर संसदेत शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होवू नये, यासाठी शेतमालाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, असे विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक मंजूर झाले नाही, तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपली ताकद दाखवून देतील, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकºयांच्या मेळाव्यात शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरंपच विष्णू गावडे होते.शेट्टी म्हणाले, गुजरात राज्यासारखी एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा विचार सरकारचा आहे, असे उद्गार सहकारमंत्र्यांनी काढून शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कायद्यानुसार एकरकमी रक्कम घेणार असून, जो कारखानदार सरकारची बाजू घेईल त्याला उसाचे दांडके दाखवू. देशातील व राज्यातील भाजपचे सरकार हे लबाड विद्वानांचे सरकार आहे. हिशोबात हे सरकार हुशार असल्याने ते शेतकºयांना हिशोबत फसवत आहेत. उसाच्या एफआरपीत २०० रूपये वाढ केली व त्यातील १८७ रूपये काढून घेतले. तोडणी वाहतूक हिशोबातील प्रतिटन ९७ रूपये शेतकºयांना तोट्यात घालण्याचे पापही या सरकारने केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर केला.राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, गतवर्षीच्या उसाचा दर आम्ही तुमच्याकडे येऊन मागण्यापूर्वी तुम्ही जाहीर केला आहे. त्यामुळे तो द्यावाच लागणार आहे. न देता पाताळात जरी जावून बसलात तरी शोधून तुम्हाला द्यायला भाग पाडणार आहे.भगवान काटे म्हणाले, उसाची कोंडी ही सोन्याची कांडी आहे हे सांगण्याचे काम संघटनेने केले आहे. संघटना पहिल्यांदा सावध करते, नाही तर बुडका हातात घेते. त्यामुळे दर निकालात निघल्याशिवाय कारखाने चालू करू नका.प्रा. दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात शेतकºयांच्या उसाचे थकीत पैसे मिळावेत व चालू हंगामातील एफआरपी ठरविण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले.यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच राजू पाटील, विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. २७ तारखेला जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेस प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.यावेळी बाळाराम फडके, राजू व्हटकर, बी. डी. पाटील, सतीश सबनीस, मारूती मेणसे, अरूण पाटील, सुस्मिता पाटील, टी. जी. पाटील, निगाप्पा मलखांबकर, सुरेश कुट्रे उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.हुमणी म्हणजे काय..?खासदार शेट्टी यांनी एका शेतकºयाने राज्याच्या प्रभारी कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे उसावर हुमणी पडल्याने काय तरी मदत करा, अशी मागणी केली. त्यावर कृषीमंत्र्यांनी हुमणी म्हणजे काय, असा सवाल केला. अख्ख्या महाराष्ट्रात हुमणीने धुमाकूळ घातला असताना कृषीमंत्र्यांना हुमणी म्हणजे काय, हे माहीत नाही, मग हे शेतीची धोरणे कसे ठरविणार, असा सवालही शेट्टींनी यावेळी केला.