शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ताकद दाखवून देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:54 IST

चंदगड : देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करणाºया २०४ संघटनांना एकत्र करून त्यांच्या जोरावर संसदेत शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व ...

चंदगड : देशभरातील शेतकऱ्यांसाठी काम करणाºया २०४ संघटनांना एकत्र करून त्यांच्या जोरावर संसदेत शेतकºयांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे व पुन्हा शेतकरी कर्जबाजारी होवू नये, यासाठी शेतमालाला दीडपट हमीभाव मिळाला पाहिजे, असे विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक मंजूर झाले नाही, तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपली ताकद दाखवून देतील, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकºयांच्या मेळाव्यात शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरंपच विष्णू गावडे होते.शेट्टी म्हणाले, गुजरात राज्यासारखी एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा विचार सरकारचा आहे, असे उद्गार सहकारमंत्र्यांनी काढून शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. कायद्यानुसार एकरकमी रक्कम घेणार असून, जो कारखानदार सरकारची बाजू घेईल त्याला उसाचे दांडके दाखवू. देशातील व राज्यातील भाजपचे सरकार हे लबाड विद्वानांचे सरकार आहे. हिशोबात हे सरकार हुशार असल्याने ते शेतकºयांना हिशोबत फसवत आहेत. उसाच्या एफआरपीत २०० रूपये वाढ केली व त्यातील १८७ रूपये काढून घेतले. तोडणी वाहतूक हिशोबातील प्रतिटन ९७ रूपये शेतकºयांना तोट्यात घालण्याचे पापही या सरकारने केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी सरकारवर केला.राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, गतवर्षीच्या उसाचा दर आम्ही तुमच्याकडे येऊन मागण्यापूर्वी तुम्ही जाहीर केला आहे. त्यामुळे तो द्यावाच लागणार आहे. न देता पाताळात जरी जावून बसलात तरी शोधून तुम्हाला द्यायला भाग पाडणार आहे.भगवान काटे म्हणाले, उसाची कोंडी ही सोन्याची कांडी आहे हे सांगण्याचे काम संघटनेने केले आहे. संघटना पहिल्यांदा सावध करते, नाही तर बुडका हातात घेते. त्यामुळे दर निकालात निघल्याशिवाय कारखाने चालू करू नका.प्रा. दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात शेतकºयांच्या उसाचे थकीत पैसे मिळावेत व चालू हंगामातील एफआरपी ठरविण्यासाठी हा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले.यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, सरपंच राजू पाटील, विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. २७ तारखेला जयसिंगपूर येथे होणाºया ऊस परिषदेस प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.यावेळी बाळाराम फडके, राजू व्हटकर, बी. डी. पाटील, सतीश सबनीस, मारूती मेणसे, अरूण पाटील, सुस्मिता पाटील, टी. जी. पाटील, निगाप्पा मलखांबकर, सुरेश कुट्रे उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी आभार मानले.हुमणी म्हणजे काय..?खासदार शेट्टी यांनी एका शेतकºयाने राज्याच्या प्रभारी कृषीमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे उसावर हुमणी पडल्याने काय तरी मदत करा, अशी मागणी केली. त्यावर कृषीमंत्र्यांनी हुमणी म्हणजे काय, असा सवाल केला. अख्ख्या महाराष्ट्रात हुमणीने धुमाकूळ घातला असताना कृषीमंत्र्यांना हुमणी म्हणजे काय, हे माहीत नाही, मग हे शेतीची धोरणे कसे ठरविणार, असा सवालही शेट्टींनी यावेळी केला.