शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच

By admin | Updated: June 7, 2017 00:28 IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच

लोकमत न्यूज नेटवर्कआजरा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांची कर्जमाफी तर करणारच आहेत. त्यासोबत शेतकऱ्याला भविष्यात मदतीसाठी कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत, यादृष्टीने ‘भाजप’ सरकार प्रयत्नशील आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांच्या प्रवेशाने आजरा तालुक्यासह जिल्ह्यात भाजपा मजबूत झाली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.खेडे येथे अण्णा-भाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन व अशोक चराटी यांच्या भाजप प्रवेशप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सूतगिरणीचे उद्घाटन झाले. कार्यकारी संचालक चंद्रशेखर फडणीस यांनी प्रास्ताविकात सूतगिरणीच्या वाटचालीचा आढावा घेतला.अण्णा-भाऊ संस्था समूहाला सर्व प्रकारचे सहकार्य राहील, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात येत आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला त्यांच्या उत्पादन खर्चात शासनाची भागीदारी व आलेल्या उत्पादनाला भाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी संपन्न होणार नाही.सहकारमंत्री देशमुख म्हणाले, सरकारकडून सूतगिरण्यांना दिला जाणारा पैसा हा सर्वसामान्यांचा पैसा आहे. मागील पंधरा वर्षांत भरमसाट सूतगिरण्यांना मान्यता देऊन सूतगिरणी उभी करणारे कार्यकर्ते पैशासाठी सत्तेसमोर झुलत राहिले पाहिजेत, अशी यंत्रणा राबविली गेली. १७०० कोटी रुपये शासनाने सूतगिरण्यांना दिले, पण किती सूतगिरण्या सुरू झाल्या हा संशोधनाचा विषय आहे. आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, भाजपच्या झंझावातामुळे अनेक राजकीय पक्षांची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर असून कोणी संघर्ष यात्रा तर कोणी आत्मक्लेश यात्रा काढत आहे. शेतकऱ्यांमध्ये केवळ संभ्रमावस्था निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.चराटी म्हणाले, १९८९ ला नोंदणी झालेली सूतगिरणी खडतर प्रवासातून उभी राहिली. आजपर्यंत आपणाला कोणी जवळ केले नाही. परंतु, भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे आपण भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आजरा नगरपंचायतीसह तालुक्यातील विविध प्रकल्प मार्गी लावणे, कारखान्यात डिस्टीलरी प्रकल्प उभा करणे यासाठी पाठपुरावा सुरू आहे.सरपंच वंदना कांबळे, भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, रवींद्र आपटे, गोपाळराव पाटील, बाबा देसाई, भरमूअण्णा पाटील, प्रकाश चव्हाण, डी. सी. काणे, समरजितसिंह घाटगे, अरुण देसाई, राहुल देसाई, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सुधीर मुंज, मलिककुमार बुरूड, संजयबाबा घाटगे, दीपक सातोस्कर, अजित चराटी, विजयकुमार पाटील, शामली वाघ, सूतगिरणीसह अण्णा-भाऊ संस्था समूहाचे पदाधिकारी व अधिकारी, संचालक, सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. संचालक शंकर टोपले यांनी आभार मानले.‘आजरा रोल मॉडेल’आजरा सूतगिरणी हे या क्षेत्रात रोल मॉडेल असून या सूतगिरणीसाठी सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही देतानाच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी चराटींनी भाजपात प्रवेश केला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते, असे सहकारमंत्री देशमुख यांनी नमूद केले. जिल्ह्यातील प्रमुख मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात आत भाजपव्यतिरिक्त काही शिल्लक असावे असे वाटत नाही, अशी टिप्पणीही सहकारमंत्री देशमुख यांनी केली. ३० सरपंच भाजपात !चराटी यांच्यासह ३० गावचे सरपंच, जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष संभाजी बापट, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक नारायण सावंत यांच्यासह अण्णा-भाऊ संस्था समूहातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, केवळ या समूहाच्या महत्त्वूपर्ण योगदानामुळे आमदारकी भूषविणारे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शुभेच्छा देऊन तेथून निघून जाणे पसंद केले. त्याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती.