शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी गुणवत्ता, मार्केटिंगचे तंत्र शिकावे

By admin | Updated: December 26, 2014 23:47 IST

बसवराज मास्तोळी : केंद्रीय वखार महामंडळाची कार्यशाळा

कोल्हापूर : केवळ शेतीमालाचे उत्पादन केले म्हणजे जबाबदारी संपली असे नाही. त्या मालाची गुणवत्ता राखत मार्केटिंगचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांनी केले.केंद्रीय वखार महामंडळ, शाखा कोल्हापूरच्या वतीने आयोजित शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ‘पीक कापणीनंतर अन्नधान्याची शास्त्रोक्त साठवणूक’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मास्तोळी म्हणाले, बाजारात येणारा शेतीमाल हा किमान ९५ टक्के गुणवत्तापूर्ण पाहिजेच. शेतीमाल असल्याने त्यामध्ये काडी-कचरा, दुय्यम माल असतो; पण त्याचे प्रमाणे ३ ते ३.५ टक्क्यांपेक्षा अधिक राहता कामा नये. याचे प्रमाण थोडे जरी वाढले तरी तेच कारण पुढे करत व्यापारी दर पाडतात. त्यामुळे शेतीमाल बाजारात आणताना त्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे. आजपर्यंत डोळेझाकपणे आपण शेती केली; पण आता जागरूकतेने पुढे गेले पाहिजे. शेतीमालाची गुणवत्ता राखत असताना त्याची ग्रेडिंगनुसार विक्री गरजेची आहे. ग्रेडिंगबरोबर पॅकिंगही महत्त्वाचे आहे. विक्री व्यवस्थेत केवळ शेतकऱ्यांनाच आपल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. उत्पादन व मागणी यावरच शेतीमालाचे दर अवलंबून असल्याने बाजार पाहूनच शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी बाहेर काढला पाहिजे, असेही मास्तोळी यांनी सांगितले. वखार महामंडळाचे शाखाप्रबंधक एम. एस. मेटील यांनी ‘पीक कापणीनंतरची साठवणूक’ याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुरेश मगदूम, एस. के. पोवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते. बाजार समित्या उद्देशापासून बाजूला!मार्केटमध्ये आणलेल्या मालाची चाळण व वाळवण्यासाठी आवश्यक साहित्य बाजार समितीने उपलब्ध करून द्यायचे आहे. मालाला योग्य भाव नाही मिळाला तर त्याची साठवणूक करण्यासाठी गोडावून व शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची सोय कायद्याने बंधनकारक आहे; पण तसे होताना दिसत नसल्याची टीका मास्तोळी यांनी केली. मालतारण कर्ज योजना मान्यताप्राप्त गोडावूनमध्ये माल ठेवल्यास त्यावर कोणतीही बॅँक ७ टक्के सरळ व्याजाने मालाच्या एकूण किमतीच्या ७० टक्के कर्ज देते. मान्यताप्राप्त नसलेल्या गोडावूनमधील मालावर१३ टक्के व्याजदराने ७० टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते.