शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

शेतकऱ्यांनी गुणवत्ता, मार्केटिंगचे तंत्र शिकावे

By admin | Updated: December 26, 2014 23:47 IST

बसवराज मास्तोळी : केंद्रीय वखार महामंडळाची कार्यशाळा

कोल्हापूर : केवळ शेतीमालाचे उत्पादन केले म्हणजे जबाबदारी संपली असे नाही. त्या मालाची गुणवत्ता राखत मार्केटिंगचे तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी यांनी केले.केंद्रीय वखार महामंडळ, शाखा कोल्हापूरच्या वतीने आयोजित शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी ‘पीक कापणीनंतर अन्नधान्याची शास्त्रोक्त साठवणूक’ या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मास्तोळी म्हणाले, बाजारात येणारा शेतीमाल हा किमान ९५ टक्के गुणवत्तापूर्ण पाहिजेच. शेतीमाल असल्याने त्यामध्ये काडी-कचरा, दुय्यम माल असतो; पण त्याचे प्रमाणे ३ ते ३.५ टक्क्यांपेक्षा अधिक राहता कामा नये. याचे प्रमाण थोडे जरी वाढले तरी तेच कारण पुढे करत व्यापारी दर पाडतात. त्यामुळे शेतीमाल बाजारात आणताना त्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे. आजपर्यंत डोळेझाकपणे आपण शेती केली; पण आता जागरूकतेने पुढे गेले पाहिजे. शेतीमालाची गुणवत्ता राखत असताना त्याची ग्रेडिंगनुसार विक्री गरजेची आहे. ग्रेडिंगबरोबर पॅकिंगही महत्त्वाचे आहे. विक्री व्यवस्थेत केवळ शेतकऱ्यांनाच आपल्या मालाची किंमत ठरवता येत नाही. उत्पादन व मागणी यावरच शेतीमालाचे दर अवलंबून असल्याने बाजार पाहूनच शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी बाहेर काढला पाहिजे, असेही मास्तोळी यांनी सांगितले. वखार महामंडळाचे शाखाप्रबंधक एम. एस. मेटील यांनी ‘पीक कापणीनंतरची साठवणूक’ याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुरेश मगदूम, एस. के. पोवार यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी उपस्थित होते. बाजार समित्या उद्देशापासून बाजूला!मार्केटमध्ये आणलेल्या मालाची चाळण व वाळवण्यासाठी आवश्यक साहित्य बाजार समितीने उपलब्ध करून द्यायचे आहे. मालाला योग्य भाव नाही मिळाला तर त्याची साठवणूक करण्यासाठी गोडावून व शेतकऱ्यांसाठी शेतकरी निवासाची सोय कायद्याने बंधनकारक आहे; पण तसे होताना दिसत नसल्याची टीका मास्तोळी यांनी केली. मालतारण कर्ज योजना मान्यताप्राप्त गोडावूनमध्ये माल ठेवल्यास त्यावर कोणतीही बॅँक ७ टक्के सरळ व्याजाने मालाच्या एकूण किमतीच्या ७० टक्के कर्ज देते. मान्यताप्राप्त नसलेल्या गोडावूनमधील मालावर१३ टक्के व्याजदराने ७० टक्क्यांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते.