शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

शेतकऱ्यांची उद्या सावर्डे येथून आत्मक्लेश पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या, गुरुवारी किसान ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या, गुरुवारी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा काढणार असल्याची माहिती सतीशचंद्र कांबळे व चंद्रकांत यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रकांत यादव म्हणाले, केंद्र सरकारचे कायदे हे शेतकरीविरोधी असून यामुळे शेतकरी उद‌्ध्वस्त होणार आहेत. त्यांना कडाडून विरोध होऊनही सरकार मागे हटण्यास तयार नाही. गेला महिना, सव्वा महिना लाखो शेतकरी दिल्लीमध्ये बसले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून शंभरहून अधिक शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला घाबरल्याने मध्यप्रदेशमध्ये आंदोलकांना रोखले जात आहे. दुसरा टप्पा म्हणून शेतकरी उद्या, गुरुवारी सकाळी नऊ वाजता सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथून आत्मक्लेश यात्रा सुरू करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता तीस किलोमीटरचे अंतर कापत यात्रा पापाची तिकटी येथे येणार आहे. येथे महात्मा गांधीजींच्या पायांशी यात्रा नतमस्तक हाेणार आहे. या यात्रेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सतीशचंद्र कांबळे व चंद्रकांत यादव यांनी केले आहे. यावेळी ‘शेकाप’चे चिटणीस बाबूराव कदम, दिलदार मुजावर उपस्थित होते.