शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांची उद्या सावर्डे येथून आत्मक्लेश पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या, गुरुवारी किसान ...

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी उद्या, गुरुवारी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आत्मक्लेश पदयात्रा काढणार असल्याची माहिती सतीशचंद्र कांबळे व चंद्रकांत यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रकांत यादव म्हणाले, केंद्र सरकारचे कायदे हे शेतकरीविरोधी असून यामुळे शेतकरी उद‌्ध्वस्त होणार आहेत. त्यांना कडाडून विरोध होऊनही सरकार मागे हटण्यास तयार नाही. गेला महिना, सव्वा महिना लाखो शेतकरी दिल्लीमध्ये बसले आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पहिला टप्पा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून शंभरहून अधिक शेतकरी दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला घाबरल्याने मध्यप्रदेशमध्ये आंदोलकांना रोखले जात आहे. दुसरा टप्पा म्हणून शेतकरी उद्या, गुरुवारी सकाळी नऊ वाजता सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथून आत्मक्लेश यात्रा सुरू करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता तीस किलोमीटरचे अंतर कापत यात्रा पापाची तिकटी येथे येणार आहे. येथे महात्मा गांधीजींच्या पायांशी यात्रा नतमस्तक हाेणार आहे. या यात्रेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सतीशचंद्र कांबळे व चंद्रकांत यादव यांनी केले आहे. यावेळी ‘शेकाप’चे चिटणीस बाबूराव कदम, दिलदार मुजावर उपस्थित होते.