शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सरकारकडून शेतकऱ्यांचे वाटोळे - : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:59 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या

ठळक मुद्देजयसिंगपूर येथे शेतकरी मेळावा, १ जुलैला महावितरणवर मोर्चा

जयसिंगपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणार आहे. माझा पराभव झाला म्हणून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. मी चळवळीतील लढणारा कार्यकर्ता आहे.

भविष्यात शेतकºयांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागणार असून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही चळवळ टिकली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व ताकदीने संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार शेट्टी बोलत होते.वाढीव वीज बिल व वीज जोडणी या मागणीसाठी येत्या १ जुलै रोजी कृषी दिनी कोल्हापूर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रारंभी स्वागत आदिनाथ हेमगिरे यांनी केले.

यावेळी वाशिम जिल्ह्यातून ५४० किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या अ‍ॅड. भागवत नरवाडे यांच्यासह मनोज शिरभाऊ व विशाल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.शेट्टी पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. जनावरांना चारा व शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाणी प्रश्नावर सरकार बोलत नाही. निर्ढावलेल्या सरकारी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकार पाण्याचे राजकारण करीत आहे. त्याची बारामतीपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात गावागावांतील संघटन मजबूत करून पाण्यासाठी तीव्र लढा उभा करावा लागणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रा. जालिंदर पाटील, सयाजी मोरे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, आण्णासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास सावकार मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, सचिन शिंदे, सुरेश कांबळे, राम शिंदे, महावीर अक्कोळे, डॉ. श्रीवर्धन पाटील, सागर संभूशेटे, सागर चिपरगे, शैलेश चौगुले, वसंतराव पाटील, पद्माराणी पाटील, मिलिंद साखरपे, विठ्ठल मोरे, सुभाष शेट्टी यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.एफआरपी थकविणारे भाजपचेच कारखानेमी साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसतो, असा आरोप केला जात आहे. राज्यात भाजपच्याच साखर कारखान्यांनी एफआरपी थकविलेली आहे. राज्यात एकूण १४५६ कोटी रुपयांची एफआरपी आजअखेर थकीत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा विचार केल्यास पंधरा कारखान्यांचे २४४ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दहा साखर कारखाने शिवेसना व भाजप कार्यकर्त्यांची आहेत. त्यांच्याकडून १८९ कोटी रुपये एफआरपी थकविलेली आहे. मग यांची मांडी गेली कुठे ! सत्तेला चिकटावे तसे काही कारखानदार भाजपच्या गळाला लागले आहेत, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी