शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सरकारकडून शेतकऱ्यांचे वाटोळे - : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:59 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या

ठळक मुद्देजयसिंगपूर येथे शेतकरी मेळावा, १ जुलैला महावितरणवर मोर्चा

जयसिंगपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणार आहे. माझा पराभव झाला म्हणून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. मी चळवळीतील लढणारा कार्यकर्ता आहे.

भविष्यात शेतकºयांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागणार असून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही चळवळ टिकली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व ताकदीने संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार शेट्टी बोलत होते.वाढीव वीज बिल व वीज जोडणी या मागणीसाठी येत्या १ जुलै रोजी कृषी दिनी कोल्हापूर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रारंभी स्वागत आदिनाथ हेमगिरे यांनी केले.

यावेळी वाशिम जिल्ह्यातून ५४० किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या अ‍ॅड. भागवत नरवाडे यांच्यासह मनोज शिरभाऊ व विशाल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.शेट्टी पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. जनावरांना चारा व शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाणी प्रश्नावर सरकार बोलत नाही. निर्ढावलेल्या सरकारी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकार पाण्याचे राजकारण करीत आहे. त्याची बारामतीपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात गावागावांतील संघटन मजबूत करून पाण्यासाठी तीव्र लढा उभा करावा लागणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रा. जालिंदर पाटील, सयाजी मोरे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, आण्णासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास सावकार मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, सचिन शिंदे, सुरेश कांबळे, राम शिंदे, महावीर अक्कोळे, डॉ. श्रीवर्धन पाटील, सागर संभूशेटे, सागर चिपरगे, शैलेश चौगुले, वसंतराव पाटील, पद्माराणी पाटील, मिलिंद साखरपे, विठ्ठल मोरे, सुभाष शेट्टी यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.एफआरपी थकविणारे भाजपचेच कारखानेमी साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसतो, असा आरोप केला जात आहे. राज्यात भाजपच्याच साखर कारखान्यांनी एफआरपी थकविलेली आहे. राज्यात एकूण १४५६ कोटी रुपयांची एफआरपी आजअखेर थकीत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा विचार केल्यास पंधरा कारखान्यांचे २४४ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दहा साखर कारखाने शिवेसना व भाजप कार्यकर्त्यांची आहेत. त्यांच्याकडून १८९ कोटी रुपये एफआरपी थकविलेली आहे. मग यांची मांडी गेली कुठे ! सत्तेला चिकटावे तसे काही कारखानदार भाजपच्या गळाला लागले आहेत, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी