शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

सरकारकडून शेतकऱ्यांचे वाटोळे - : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 01:59 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या

ठळक मुद्देजयसिंगपूर येथे शेतकरी मेळावा, १ जुलैला महावितरणवर मोर्चा

जयसिंगपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सरकारने शेतकºयांचे वाटोळे केले असून सामुदायिक लढा उभा करण्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असल्यामुळे सरकारच्या छाताडावर बसून शेतकºयांच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणार आहे. माझा पराभव झाला म्हणून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. मी चळवळीतील लढणारा कार्यकर्ता आहे.

भविष्यात शेतकºयांना अनेक प्रश्नांचा सामना करावा लागणार असून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ही चळवळ टिकली पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व ताकदीने संघर्षाची तयारी ठेवावी, असे आवाहन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले.

येथील सांगली-कोल्हापूर महामार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी माजी खासदार शेट्टी बोलत होते.वाढीव वीज बिल व वीज जोडणी या मागणीसाठी येत्या १ जुलै रोजी कृषी दिनी कोल्हापूर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. प्रारंभी स्वागत आदिनाथ हेमगिरे यांनी केले.

यावेळी वाशिम जिल्ह्यातून ५४० किलोमीटर पायी प्रवास करून आलेल्या अ‍ॅड. भागवत नरवाडे यांच्यासह मनोज शिरभाऊ व विशाल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.शेट्टी पुढे म्हणाले, राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. जनावरांना चारा व शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाणी प्रश्नावर सरकार बोलत नाही. निर्ढावलेल्या सरकारी धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सरकार पाण्याचे राजकारण करीत आहे. त्याची बारामतीपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात गावागावांतील संघटन मजबूत करून पाण्यासाठी तीव्र लढा उभा करावा लागणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रा. जालिंदर पाटील, सयाजी मोरे, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, आण्णासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास सावकार मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, सचिन शिंदे, सुरेश कांबळे, राम शिंदे, महावीर अक्कोळे, डॉ. श्रीवर्धन पाटील, सागर संभूशेटे, सागर चिपरगे, शैलेश चौगुले, वसंतराव पाटील, पद्माराणी पाटील, मिलिंद साखरपे, विठ्ठल मोरे, सुभाष शेट्टी यांच्यासह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.एफआरपी थकविणारे भाजपचेच कारखानेमी साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसतो, असा आरोप केला जात आहे. राज्यात भाजपच्याच साखर कारखान्यांनी एफआरपी थकविलेली आहे. राज्यात एकूण १४५६ कोटी रुपयांची एफआरपी आजअखेर थकीत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा विचार केल्यास पंधरा कारखान्यांचे २४४ कोटी रुपये थकीत आहेत. यापैकी दहा साखर कारखाने शिवेसना व भाजप कार्यकर्त्यांची आहेत. त्यांच्याकडून १८९ कोटी रुपये एफआरपी थकविलेली आहे. मग यांची मांडी गेली कुठे ! सत्तेला चिकटावे तसे काही कारखानदार भाजपच्या गळाला लागले आहेत, असा आरोप शेट्टी यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी