शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनांचा आलेख ढासळतोय

By admin | Updated: July 19, 2015 23:38 IST

नेत्यांची लोकप्रियता घटली : जयंत पाटील यांच्यासह साखरसम्राटांची ताकद भक्कम

अशोक पाटील - इस्लामपूर -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या लोकप्रियतेचा आलेख ढासळू लागला आहे. सत्तेवर आल्यानंतर राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी काही करतील, या अपेक्षेतून जनतेने त्यांना निवडून दिले. पण यंदा कोणत्याही शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी आक्रमक असे आंदोलन केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षाही कमी पैसे मिळाले आहेत. उलट पुढील हंगामात साखर कारखाने १२०० रुपयेही दर देऊ शकणार नसल्याचा स्फोट माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. एकाअर्थी हे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आव्हानच दिले आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाशी संबंधित असलेल्या बहुतांशी सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत असून, ते मंत्रीपदाच्या लालसेपोटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत असल्याचा आरोप साखरसम्राट करू लागले आहेत. यामध्ये तथ्यही असल्याने त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. एकूणच शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला असल्याची तीव्र भावना परिसरात उमटत आहे.जयंत पाटील यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखरसम्राटांनीही एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे. खुद्द साखराळे हद्दीत असलेल्या राजारामबापू सह. साखर कारखान्यानेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यावर साखराळे गावचे सुपुत्र व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ब्र शब्दही काढण्यास तयार नाहीत. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रघुनाथदादा आता प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन केवळ प्रसिध्दी करून घेण्याचे काम करीत आहेत, अशी चर्चा ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.जयंतरावांची लोकप्रियता वाढली..!ंआमदार जयंत पाटील मंत्री असताना त्यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असे. मात्र तेव्हा असलेल्या गर्दीपेक्षाही आता आमदार असतानाची गर्दी जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात तेव्हा सुरक्षा पथक, प्रोटोकॉलच्या मर्यादाही होत्या. सध्या कार्यकर्त्यांसाठी जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील केंद्रबिंदू ठरत आहेत. काही ठिकाणी विरोधकांच्या हातात हात घालून त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी सर्व विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.शेतकऱ्यांच्या भावनेचा बाजार करून काही काळ यशस्वी झालेले शेतकरी संघटनेचे हे नेते भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत. पक्षाने त्यांना दाखवलेल्या मंत्रिपदाच्या गाजराला भुलून ते शेतकऱ्यांनाच विसरले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेल्या ऊस दराच्या प्रश्नालाही या नेत्यांनी बगल दिली आहे. त्यामुळे काही कारखान्यांनी उसाचे पहिले बिलही दिलेले नाही. यामध्ये भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या शिवाजी केन व वारणा कारखान्याचाही समावेश आहे.- बी. जी. पाटील, संघटक, बळीराजा शेतकरी संघटना.