शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शेतकरी संघटनांचा आलेख ढासळतोय

By admin | Updated: July 19, 2015 23:38 IST

नेत्यांची लोकप्रियता घटली : जयंत पाटील यांच्यासह साखरसम्राटांची ताकद भक्कम

अशोक पाटील - इस्लामपूर -शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांच्या लोकप्रियतेचा आलेख ढासळू लागला आहे. सत्तेवर आल्यानंतर राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी काही करतील, या अपेक्षेतून जनतेने त्यांना निवडून दिले. पण यंदा कोणत्याही शेतकरी संघटनेने ऊस दरासाठी आक्रमक असे आंदोलन केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षाही कमी पैसे मिळाले आहेत. उलट पुढील हंगामात साखर कारखाने १२०० रुपयेही दर देऊ शकणार नसल्याचा स्फोट माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. एकाअर्थी हे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आव्हानच दिले आहे.शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाशी संबंधित असलेल्या बहुतांशी सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या आहेत. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थांवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत असून, ते मंत्रीपदाच्या लालसेपोटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला बगल देत असल्याचा आरोप साखरसम्राट करू लागले आहेत. यामध्ये तथ्यही असल्याने त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. एकूणच शेतकरी संघटनेच्या नेत्यांकडून जनतेचा अपेक्षाभंग झाला असल्याची तीव्र भावना परिसरात उमटत आहे.जयंत पाटील यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखरसम्राटांनीही एफआरपीपेक्षा कमी दर दिला आहे. खुद्द साखराळे हद्दीत असलेल्या राजारामबापू सह. साखर कारखान्यानेही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यावर साखराळे गावचे सुपुत्र व शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ब्र शब्दही काढण्यास तयार नाहीत. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत आणि रघुनाथदादा आता प्रसारमाध्यमांना मुलाखती देऊन केवळ प्रसिध्दी करून घेण्याचे काम करीत आहेत, अशी चर्चा ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.जयंतरावांची लोकप्रियता वाढली..!ंआमदार जयंत पाटील मंत्री असताना त्यांच्याभोवती नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असे. मात्र तेव्हा असलेल्या गर्दीपेक्षाही आता आमदार असतानाची गर्दी जास्त असल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात तेव्हा सुरक्षा पथक, प्रोटोकॉलच्या मर्यादाही होत्या. सध्या कार्यकर्त्यांसाठी जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील केंद्रबिंदू ठरत आहेत. काही ठिकाणी विरोधकांच्या हातात हात घालून त्यांनी निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळेच त्यांची लोकप्रियता वाढल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी सर्व विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.शेतकऱ्यांच्या भावनेचा बाजार करून काही काळ यशस्वी झालेले शेतकरी संघटनेचे हे नेते भाजपच्या दावणीला बांधले गेले आहेत. पक्षाने त्यांना दाखवलेल्या मंत्रिपदाच्या गाजराला भुलून ते शेतकऱ्यांनाच विसरले आहेत. पश्चिम महाराष्ट्राचा आर्थिक कणा असलेल्या ऊस दराच्या प्रश्नालाही या नेत्यांनी बगल दिली आहे. त्यामुळे काही कारखान्यांनी उसाचे पहिले बिलही दिलेले नाही. यामध्ये भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या शिवाजी केन व वारणा कारखान्याचाही समावेश आहे.- बी. जी. पाटील, संघटक, बळीराजा शेतकरी संघटना.