शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे

By admin | Updated: August 8, 2014 00:44 IST

कृषीविषयक मार्गदर्शनही हवे

फलटण : ‘पूर्वी शेती पंचागावर केली जात असे अलीकडे ते शास्त्र निरुपयोगी ठरत असून, मान्सूनच्या लहरीपणाचा परिणाम शेती उत्पादनावर होत असताना हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील कृषी महाविद्यालय आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या कृषी हवामान वेधशाळेचे उद्घाटन व त्यानंतर आयोजित कार्यक्रमात रामराजे बोलत होते. यावेळी कृषी हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी पुणे) विभागाचे डॉ. एन. चट्टोपाध्याय, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषीतज्ज्ञ आर. व्ही. निंबाळकर उपस्थित होते.सध्या केंद्र शासनाचे धोरण वातावरण बदलाच्या होणाऱ्या परिणामांबाबत गांभीर्याने विचार करणारे असून, शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील हवामानाची दररोज माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत त्यासाठी सध्या २५ संस्था संयुक्तपणे कार्यरत असल्याचे डेप्यु. डायरेक्टर डॉ. एन. चटोपाध्याय यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी प्राचार्य डॉ. एस.बी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. गीतांजली नेवसे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी डोईफोडे, वसंतलाल शहा (पाचवडकर), राधाकृष्ण तेली, जे.एच. गरवालीया, मिस्त्री, हेमंत रानडे, भोजराज नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती दत्तात्रय गुंजवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)कृषीविषयक मार्गदर्शनही हवेशेती उत्पादन वाढीसाठी दीर्घमुदतीचा हवामान विषयक अंदाज उपयुक्त ठरत नाही, त्यासाठी त्या-त्या परिसरातील हवामानविषयक दैनंदिन अंदाज व माहिती शेतकऱ्याला हवामानविषयक अंदाजाबरोबरच कृषी खात्याने कोणती पिके घ्यावीत, त्यासाठी घ्यावयाची विशेष दक्षता याबाबतही हवामान अंदाजाचा विचार करून योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.