शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे

By admin | Updated: August 8, 2014 00:44 IST

कृषीविषयक मार्गदर्शनही हवे

फलटण : ‘पूर्वी शेती पंचागावर केली जात असे अलीकडे ते शास्त्र निरुपयोगी ठरत असून, मान्सूनच्या लहरीपणाचा परिणाम शेती उत्पादनावर होत असताना हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील कृषी महाविद्यालय आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या कृषी हवामान वेधशाळेचे उद्घाटन व त्यानंतर आयोजित कार्यक्रमात रामराजे बोलत होते. यावेळी कृषी हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी पुणे) विभागाचे डॉ. एन. चट्टोपाध्याय, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषीतज्ज्ञ आर. व्ही. निंबाळकर उपस्थित होते.सध्या केंद्र शासनाचे धोरण वातावरण बदलाच्या होणाऱ्या परिणामांबाबत गांभीर्याने विचार करणारे असून, शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील हवामानाची दररोज माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत त्यासाठी सध्या २५ संस्था संयुक्तपणे कार्यरत असल्याचे डेप्यु. डायरेक्टर डॉ. एन. चटोपाध्याय यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी प्राचार्य डॉ. एस.बी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. गीतांजली नेवसे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी डोईफोडे, वसंतलाल शहा (पाचवडकर), राधाकृष्ण तेली, जे.एच. गरवालीया, मिस्त्री, हेमंत रानडे, भोजराज नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती दत्तात्रय गुंजवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)कृषीविषयक मार्गदर्शनही हवेशेती उत्पादन वाढीसाठी दीर्घमुदतीचा हवामान विषयक अंदाज उपयुक्त ठरत नाही, त्यासाठी त्या-त्या परिसरातील हवामानविषयक दैनंदिन अंदाज व माहिती शेतकऱ्याला हवामानविषयक अंदाजाबरोबरच कृषी खात्याने कोणती पिके घ्यावीत, त्यासाठी घ्यावयाची विशेष दक्षता याबाबतही हवामान अंदाजाचा विचार करून योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.