शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणे गरजेचे

By admin | Updated: August 8, 2014 00:44 IST

कृषीविषयक मार्गदर्शनही हवे

फलटण : ‘पूर्वी शेती पंचागावर केली जात असे अलीकडे ते शास्त्र निरुपयोगी ठरत असून, मान्सूनच्या लहरीपणाचा परिणाम शेती उत्पादनावर होत असताना हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित येथील कृषी महाविद्यालय आणि श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या कृषी हवामान वेधशाळेचे उद्घाटन व त्यानंतर आयोजित कार्यक्रमात रामराजे बोलत होते. यावेळी कृषी हवामान शास्त्र विभागाचे (आयएमडी पुणे) विभागाचे डॉ. एन. चट्टोपाध्याय, आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषीतज्ज्ञ आर. व्ही. निंबाळकर उपस्थित होते.सध्या केंद्र शासनाचे धोरण वातावरण बदलाच्या होणाऱ्या परिणामांबाबत गांभीर्याने विचार करणारे असून, शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील हवामानाची दररोज माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करीत त्यासाठी सध्या २५ संस्था संयुक्तपणे कार्यरत असल्याचे डेप्यु. डायरेक्टर डॉ. एन. चटोपाध्याय यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी प्राचार्य डॉ. एस.बी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. गीतांजली नेवसे यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी डोईफोडे, वसंतलाल शहा (पाचवडकर), राधाकृष्ण तेली, जे.एच. गरवालीया, मिस्त्री, हेमंत रानडे, भोजराज नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती दत्तात्रय गुंजवटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)कृषीविषयक मार्गदर्शनही हवेशेती उत्पादन वाढीसाठी दीर्घमुदतीचा हवामान विषयक अंदाज उपयुक्त ठरत नाही, त्यासाठी त्या-त्या परिसरातील हवामानविषयक दैनंदिन अंदाज व माहिती शेतकऱ्याला हवामानविषयक अंदाजाबरोबरच कृषी खात्याने कोणती पिके घ्यावीत, त्यासाठी घ्यावयाची विशेष दक्षता याबाबतही हवामान अंदाजाचा विचार करून योग्य मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.