शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

भूसंपादनाविरोधात कोगनोळी परिसरातील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

कोगनोळी : महामार्गाच्या सहापदरीकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी जमीन संपादित करू देणार नाही या मागणीवर कोगनोळी व परिसरातील शेतकरी आक्रमक ...

कोगनोळी : महामार्गाच्या सहापदरीकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी जमीन संपादित करू देणार नाही या मागणीवर कोगनोळी व परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. महामार्ग व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींसाठी सुपीक जमिनी ऐवजी रिकाम्या जागांचाच वापर करावा, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू पवार केले.

यावेळी महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक एस. एम. नाईक यांनी कोगनोळीतून बाहेर जाण्यासाठी होणाऱ्या उड्डाणपुलासाठी जवळपास वीस एकर, तर सहापदरीकरणासाठी सात एकर इतकी जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले निवेदन आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचेही सांगितले.

शासनाने राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी जमिनी संपादित करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील नोटिसाही शेतकऱ्यांच्या हातात पडू लागल्या आहेत. परंतु, या रुंदीकरणाबरोबरच शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून या ठिकाणी खासगी तत्त्वावर आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील असे प्रकल्पही राबविले जाणार आहेत. छोट्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या सुपीक जमिनी संपादित करून मोठमोठ्या कंपन्यांच्या मार्फत उभारल्या जाणाऱ्या खासगी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी शेतकरीवर्ग आक्रमक बनला आहे. यापूर्वीच चौपदरी महामार्गासाठी कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. आता शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी थोड्या फारच जमिनी शिल्लक आहेत त्याही शासनाने संपादित केल्यास अन्नदात्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. या ठिकाणी होत असलेल्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती शेतकऱ्यांना दिली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची हमी दिली पाहिजे. आजपर्यंत महामार्ग प्राधिकरण, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच प्रकल्पाचे पुढील कार्य करू दिले जाईल, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.यावेळी राजू पवार, बाळासाहेब हदीकर, संदीप चौगुले, पुंडलिक माळी यांच्यासह अनेक शेतकरी वर्ग तसेच महामार्ग प्राधिकरणाचे विठ्ठल मोरे, कमलेश आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

महामार्ग रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी शेतकरी व प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली.

( छाया : बाबासो हळिज्वाळे)