शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

‘महारयत’ विरोधात गुन्हा दाखल करणार, ‘कडकनाथ’चे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:08 IST

इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

ठळक मुद्दे ‘महारयत’ विरोधात गुन्हा दाखल करणार, ‘कडकनाथ’चे शेतकरी आक्रमक५० हजार डिपॉझिट भरा मगच अंडी खरेदी, दुसऱ्या कंपन्यांचा पवित्रा

कोल्हापूर : इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.कडकनाथ पक्षी पालक शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दीड हजार शेतकरी यामध्ये अडकले असून, त्यांची सुमारे आठ ते १0 कोटींची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, सोमवारी जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये एकत्रित आले. संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. त्यानुसार शेतकरी करवीर पोलीस ठाण्यात गेले; पण कंपनी इस्लामपूरची असल्याने येथे गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलीस यंत्रणेने सांगितले.

येत्या दोन दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, तहसीलदार व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.दरम्यान, ‘महारयत’चे संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते यांनी शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे सोशल मीडियावरून आवाहन केले होते. शेतकऱ्यांकडील अंडी व पक्षी सांगली व बेळगाव येथील कंपनी खरेदी करेल. असेही त्यांनी सांगितले होते; पण संबंधित कंपन्यांनी अगोदर एक लाख रुपये डिपॉझिट भरा, मगच माल खरेदी केले जाईल.

आठ ते १0 रुपयांनी अंडी खरेदी करण्याची तयारी त्या कंपन्यांनी दाखविल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतकऱ्यांनी ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते भोगावती येथे कार्यक्रमानिमित्त असल्याने भेट होऊ शकली नाही.

फायदा नको, मुद्दल तेवढी द्याअनेक शेतकऱ्यांनी घरातील दागिने विकून प्लॅन्ट उभे केले आहेत. लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने ते हवालदिल झाले असून, आम्हाला फायदा नको; पण मुद्दल तेवढी द्या, अशी मागणी ते करू लागले आहेत.

गळ्यातील दागिने विकून अडीच लाखांचा पक्षी प्लॅन्ट उभा केला. कंपनी आता पक्षीही घेऊन जाईना, त्यात कोंबड्यांना औषधोपचार नसल्याने त्यांना मर लागल्याने दुहेरी संकट आमच्यासमोर आहे.- पद्मावती जयवंत भोसले, कसबा बावडा

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर