शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

‘महारयत’ विरोधात गुन्हा दाखल करणार, ‘कडकनाथ’चे शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:08 IST

इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

ठळक मुद्दे ‘महारयत’ विरोधात गुन्हा दाखल करणार, ‘कडकनाथ’चे शेतकरी आक्रमक५० हजार डिपॉझिट भरा मगच अंडी खरेदी, दुसऱ्या कंपन्यांचा पवित्रा

कोल्हापूर : इस्लामपूर येथील महारयत अ‍ॅग्रो कंपनीच्या संचालकांनी ‘कडकनाथ’ पक्षी पालकांना गंडा घातल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. दोन दिवसांत इस्लामपूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.कडकनाथ पक्षी पालक शेतकऱ्याची मोठी फसवणूक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे दीड हजार शेतकरी यामध्ये अडकले असून, त्यांची सुमारे आठ ते १0 कोटींची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून, सोमवारी जिल्ह्यातील शेतकरी कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये एकत्रित आले. संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. त्यानुसार शेतकरी करवीर पोलीस ठाण्यात गेले; पण कंपनी इस्लामपूरची असल्याने येथे गुन्हा दाखल करता येणार नसल्याचे पोलीस यंत्रणेने सांगितले.

येत्या दोन दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या वतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, तहसीलदार व सांगली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.दरम्यान, ‘महारयत’चे संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते यांनी शेतकऱ्यांनी घाबरू नये, असे सोशल मीडियावरून आवाहन केले होते. शेतकऱ्यांकडील अंडी व पक्षी सांगली व बेळगाव येथील कंपनी खरेदी करेल. असेही त्यांनी सांगितले होते; पण संबंधित कंपन्यांनी अगोदर एक लाख रुपये डिपॉझिट भरा, मगच माल खरेदी केले जाईल.

आठ ते १0 रुपयांनी अंडी खरेदी करण्याची तयारी त्या कंपन्यांनी दाखविल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या शेतकऱ्यांनी ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण ते भोगावती येथे कार्यक्रमानिमित्त असल्याने भेट होऊ शकली नाही.

फायदा नको, मुद्दल तेवढी द्याअनेक शेतकऱ्यांनी घरातील दागिने विकून प्लॅन्ट उभे केले आहेत. लाखो रुपयांची फसवणूक झाल्याने ते हवालदिल झाले असून, आम्हाला फायदा नको; पण मुद्दल तेवढी द्या, अशी मागणी ते करू लागले आहेत.

गळ्यातील दागिने विकून अडीच लाखांचा पक्षी प्लॅन्ट उभा केला. कंपनी आता पक्षीही घेऊन जाईना, त्यात कोंबड्यांना औषधोपचार नसल्याने त्यांना मर लागल्याने दुहेरी संकट आमच्यासमोर आहे.- पद्मावती जयवंत भोसले, कसबा बावडा

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर