शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

वळीवाच्या पावसाने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवसांपासून रोज वळीवाच्या पावसाची हजेरी आहे. त्यामुळे परिपक्व झालेले सूर्यफूल व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवसांपासून रोज वळीवाच्या पावसाची हजेरी आहे. त्यामुळे परिपक्व झालेले सूर्यफूल व भुईमुगाची काढणी खोळंबली आहे. हा पाऊस उसाला पोषक असला तरी भाजीपाल्यासह इतर पिकांना मारक ठरत आहे.

यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाळी पिके काढून खरिपासाठी जमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल काढणीस आले आहे. या पिकांची वेळेत काढणी झाली तर ते वाळवून ठेवणे अधिक सोपे जाते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज वळीव पाऊस हजेरी लावत आहे. पडेल तिथे पडेल असा पाऊस असला तरी जिथे पडेल तिथे पाणी पाणी करत आहे. त्यामुळे शिवारात पाणीच पाणी तुंबले आहे. हाताताेंडाला आलेली पिके काढायची कशी? या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोथंबीर, मेथी, पोकळा यासह फळभाज्यांचे पावसाने मोठे नुकसान केले आहे. पाऊस त्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीट व्यावसायिकांचे तर पावसाने कंबरडे मोडले आहे.

दरम्यान, रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. तापमानात घट झाली असून किमान २४ तर कमाल ३५ डिग्रीपर्यंत राहिले आहे. आज, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

असे राहील तापमान, डिग्रीमध्ये-

वार किमान कमाल वातावरण

सोमवार २५ ३४ ढगाळ, पाऊस

मंगळवार २३ ३४ ढगाळ नंतर स्वच्छ

बुधवार २२ ३६ स्वच्छ

गुरुवार २२ ३५ स्वच्छ