शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
4
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
7
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
8
"संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान
9
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
10
Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
11
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
12
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
13
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
14
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
15
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
16
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
17
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
18
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
19
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
20
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?

वळीवाच्या पावसाने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवसांपासून रोज वळीवाच्या पावसाची हजेरी आहे. त्यामुळे परिपक्व झालेले सूर्यफूल व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात गेली तीन-चार दिवसांपासून रोज वळीवाच्या पावसाची हजेरी आहे. त्यामुळे परिपक्व झालेले सूर्यफूल व भुईमुगाची काढणी खोळंबली आहे. हा पाऊस उसाला पोषक असला तरी भाजीपाल्यासह इतर पिकांना मारक ठरत आहे.

यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाळी पिके काढून खरिपासाठी जमीन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल काढणीस आले आहे. या पिकांची वेळेत काढणी झाली तर ते वाळवून ठेवणे अधिक सोपे जाते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज वळीव पाऊस हजेरी लावत आहे. पडेल तिथे पडेल असा पाऊस असला तरी जिथे पडेल तिथे पाणी पाणी करत आहे. त्यामुळे शिवारात पाणीच पाणी तुंबले आहे. हाताताेंडाला आलेली पिके काढायची कशी? या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे. कोथंबीर, मेथी, पोकळा यासह फळभाज्यांचे पावसाने मोठे नुकसान केले आहे. पाऊस त्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाल्यावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. वीट व्यावसायिकांचे तर पावसाने कंबरडे मोडले आहे.

दरम्यान, रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. तापमानात घट झाली असून किमान २४ तर कमाल ३५ डिग्रीपर्यंत राहिले आहे. आज, सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

असे राहील तापमान, डिग्रीमध्ये-

वार किमान कमाल वातावरण

सोमवार २५ ३४ ढगाळ, पाऊस

मंगळवार २३ ३४ ढगाळ नंतर स्वच्छ

बुधवार २२ ३६ स्वच्छ

गुरुवार २२ ३५ स्वच्छ