शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:30 IST

गगनबावडा : ऊस शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असूनसुद्धा ऊसाच्या सरीमध्ये पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था दिसून येते. त्यामुळे कित्येक ...

गगनबावडा : ऊस शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असूनसुद्धा ऊसाच्या सरीमध्ये पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था दिसून येते. त्यामुळे कित्येक ठिकाणी शेतकरी सर्रास पाचट जाळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान युगात ऊस शेती प्रगतीकडे वाटचाल करत आहे. तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी पाचट पेटवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सुरु असलेल्या शासनाच्या पाचट अभियानाला खो बसत आहे.

शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भागलनीची ५० टक्के बचत होते. जमिनीमध्ये गारवा निर्माण होऊन पीक वाढीसाठी वातावरण अनुकूल होते. तणासाठी मजुरीभरणी यामध्ये वेळ व पैसा या दोन्हीची बचत होते. तरीही शेतकऱ्यांमध्ये असणारे अज्ञान पाचट ठेवण्यास फाटा देत आहे. ऊसामध्ये पाचट ठेवल्यास उंदीर निर्माण होतात, पाला कुजत नाही, यासारख्या गैरसमजांमुळे शेतकऱ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण केला आहे तर उंदरांमुळे पाल्यामध्ये साप येतात, यासारखी कारणे शेतकऱ्यांमधून सांगितली जातात. त्यामुळे ऊस तोडल्याबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी खात्याने मार्गदर्शन व पाचट ठेवण्याचे फायदे सांगूनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. चार वर्षांपूर्वी दुष्काळाच्या खाईत महाराष्ट्र लोटला होता, त्यावेळी पाण्याचा जास्त वापर होणाऱ्या ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाबरोबरच पाचट ठेवण्याची आवश्यकता आहे. पाचट ठेवल्याने शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार होऊन जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. जमिनीमध्ये ओलावा राहिल्याने पिके हिरवीगार दिसतात. त्याचा परिणाम होऊन रासायनिक खतांचा वापर कमी होतो. शेतकऱ्याचे आर्थिक बजेट सुधारण्यास मदत होते.