शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:30 IST

गगनबावडा : ऊस शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असूनसुद्धा ऊसाच्या सरीमध्ये पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था दिसून येते. त्यामुळे कित्येक ...

गगनबावडा : ऊस शेती आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत असूनसुद्धा ऊसाच्या सरीमध्ये पाचट ठेवण्यास शेतकऱ्यांची अजूनही अनास्था दिसून येते. त्यामुळे कित्येक ठिकाणी शेतकरी सर्रास पाचट जाळत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान युगात ऊस शेती प्रगतीकडे वाटचाल करत आहे. तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकरी पाचट पेटवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सुरु असलेल्या शासनाच्या पाचट अभियानाला खो बसत आहे.

शेतीसाठी एक-आड सरी पाचट ठेवल्याने शेतीसाठी दोन-तीन टन एकरी सेंद्रिय खत प्राप्त होते. त्याचबरोबर पाण्याची व भागलनीची ५० टक्के बचत होते. जमिनीमध्ये गारवा निर्माण होऊन पीक वाढीसाठी वातावरण अनुकूल होते. तणासाठी मजुरीभरणी यामध्ये वेळ व पैसा या दोन्हीची बचत होते. तरीही शेतकऱ्यांमध्ये असणारे अज्ञान पाचट ठेवण्यास फाटा देत आहे. ऊसामध्ये पाचट ठेवल्यास उंदीर निर्माण होतात, पाला कुजत नाही, यासारख्या गैरसमजांमुळे शेतकऱ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण केला आहे तर उंदरांमुळे पाल्यामध्ये साप येतात, यासारखी कारणे शेतकऱ्यांमधून सांगितली जातात. त्यामुळे ऊस तोडल्याबरोबर शेतकऱ्यांमध्ये कृषी खात्याने मार्गदर्शन व पाचट ठेवण्याचे फायदे सांगूनही शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. चार वर्षांपूर्वी दुष्काळाच्या खाईत महाराष्ट्र लोटला होता, त्यावेळी पाण्याचा जास्त वापर होणाऱ्या ऊस पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाबरोबरच पाचट ठेवण्याची आवश्यकता आहे. पाचट ठेवल्याने शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार होऊन जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते. जमिनीमध्ये ओलावा राहिल्याने पिके हिरवीगार दिसतात. त्याचा परिणाम होऊन रासायनिक खतांचा वापर कमी होतो. शेतकऱ्याचे आर्थिक बजेट सुधारण्यास मदत होते.