शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

शेतकऱ्यांची लूट होतेय; कृषी विभाग झोपलाय काय ?

By admin | Updated: July 22, 2014 00:41 IST

संजय पवार यांचा सवाल- : बनावट कीटकनाशक विक्रेत्याचा परवाना रद्द करण्यासाठी केले आंदोलन

कोल्हापूर : दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत माती टाकून लुटले जात असताना कृषी विभाग झोपा काढतोय काय? असा सवाल करत शाहूपुरी येथील बनावट कीटकनाशक विक्रेत्याचा परवाना कायमचा रद्द करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली. परवाना रद्द करून सर्वच दुकानांतील स्टॉकची तपासणी करा, अन्यथा कृषी अधीक्षक कार्यालय रस्त्यावर येईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी शाहूपुरी येथील शेती बीज भांडार दुकानात बनावट कंपनीचे कीटकनाशक सापडले. याच दुकानदाराने बनावट सूर्यफुल विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. त्यावेळीच परवाना रद्द केला असता तर पुन्हा शेतकऱ्यांना फसवले नसते, असे सांगत संजय पवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी नंदकुमार कदम यांना धारेवर धरले. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली. मात्र, कृषी विभागाने काय केले ते सांगा, अशी विचारणा पवार यांनी केली. परवाना रद्द करण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचे कदम यांनी सांगितले. यावर संतप्त होत, मग नेमके तुम्हाला अधिकार काय आहेत? बाहेरची कंपनी येते आणि बनावट औषध शोधते, कृषी विभाग झोपा काढतोय काय? अशी विचारणा पवार यांनी केली. यामध्ये हस्तक्षेप करत कारवाई करणार नसाल, तर कार्यालयाला कुलपे ठोकू, असा इशारा तानाजी आंग्रे व संभाजी जाधव यांनी दिला. त्यानंतर परवाना रद्द करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू करून सर्व विक्री केंद्रांची तपासणी आठ दिवसांत करण्याचे आश्वासन कदम यांनी दिले. यावेळी जि. प. सदस्य बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, विनोद खोत, संजय जाधव, सुनील पोवार, शशी बिडकर, दिलीप जाधव, विक्रम चौगुले, किरण माने, डॉ. अनिल पाटील, विराज पाटील, भगवान कदम उपस्थित होते. ‘आटोळे नव्हे, वाटोळेसाहेब’वारंवार फसवणूक होऊन शेतकऱ्यांचा हंगाम वाया जात असताना, हा विभाग अजिबातच जागरूक नाही. ‘दोघे मिळून खाऊ आणि शेतकऱ्यांना लुटू’ अशी प्रवृत्ती अधिकारी व दुकानदारांची असल्याचा आरोप करत कृषी अधीक्षक ‘आटोळे नव्हेत, ते वाटोळेसाहेब’ असल्याची टीका दिलीप पाटील-कावणेकर यांनी केली. अन् पवार यांचा राग अनावरफसवणूक केलेल्या शेतकऱ्यांची कैफियत मांडत, संबंधित दुकानदार तुमचा जावई आहे काय? अशी विचारणा संजय पवार यांनी केल्यानंतर तंत्र अधिकारी कदम हसू लागले. त्यामुळे पवार चांगलेच संतापले, विषयाचे गांभीर्य तुम्हाला नाही, हसण्यावर नेऊ नका, अन्यथा खुर्ची जाग्यावर राहणार नाही, असा दम पवार यांनी दिल्याने कार्यालयात वातावरण चांगले गरम झाले.