शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

शेतकऱ्यांचे अडकले पावणे अकराशे कोटी

By admin | Updated: June 10, 2015 00:27 IST

प्रश्न ‘एफआरपी’चा : कर्जफेडीसह वाटपास मुदतवाढीची मागणी

राजाराम लोंढे - कोल्हापूर -साखर कारखान्यांचा हंगाम संपून साडेतीन महिने झाले तरी शेतकऱ्यांना गाळप झालेल्या उसाचे पैसे मिळालेले नाहीत. कोल्हापूर विभागातील कारखान्यांकडे ‘एफआरपी’प्रमाणे तब्बल १०७६ कोटी ९८ लाख रुपये अडकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ३० जूनपर्यंत कर्ज भरले नाही तर व्याज सवलत सोडाच; पण नवीन कर्जही मिळणार नाही. यासाठी कर्जफेडीबरोबर कर्जवाटपास जिल्हा बॅँकेने मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.यंदा साखर कारखानदारीवर कधी नव्हे इतके अभूतपूर्व संकट आले आहे. गेल्यावर्षीही फार काही चांगले दिवस होते, असे नाही. शेतकरी संघटनेने आंदोलन करून एफआरपीची रक्कम दोन टप्प्यांत देण्यास मान्यता दिली. त्याप्रमाणे कारखान्यांनी पैसे दिले. उपलब्ध होतील तसे पैसे दिल्याने कारखानदारांसमोर फारशा अडचणी आल्या नाहीत. यंदा परिस्थिती वेगळी झाली. शेतकरी संघटनेने आंदोलन न करता कारखानदारांनाच कोंडीत पकडले. एकरकमी ‘एफआरपी’द्या; न दिल्यास फौजदारी दाखल करण्याची मागणी सरकारकडे केली. याला कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांनी फारशी दाद दिली नाही. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद असल्याने येथील कारखानदारांनी ‘एफआरपी’प्रमाणे सरासरी २४६० रुपये दिली; पण साखरेचे दर घसरतच राहिल्याने कारखान्यांनी कशीतरी पहिल्या दोन-अडीच महिन्यांची बिले दिली. त्यानंतरची बिले थकल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ‘एफआरपी’प्रमाणे ७१८ कोटी ३२ लाख, तर सांगलीमधील ३५८ कोटी ६५ लाख रुपये कारखान्यांकडे अडकले. सांगलीतील कारखान्यांची एफआरपी सरासरी १९९९ रुपये आहे. त्यातही त्यांनी कमी उचल दिल्याने तिथे फारशी तणाताणी नाही. कोल्हापुरातील कारखान्यांबरोबर शेतकऱ्यांच्याही गळ्याला आले आहे. कारखान्यांकडून वसुली नसल्याने विकास संस्थांची वसुली ठप्प आहे. जूनअखेर शेतकऱ्यांची कर्ज खाती पूर्ण झाली नाहीत तर व्याजसवलत मिळणार नाहीच; पण त्याबरोबर नवीन कर्जही मिळणार नाही. आगामी हंगामाची अवस्था यापेक्षा भयंकर असणार आहे. ‘एफआरपी’ सोडाच; पण त्यापेक्षा निम्मे पैसेही देणे मुश्कील होणार आहे. आगामी हंगामाची उचल २५०० रुपये धरून विकास संस्थांनी कर्जाचे वाटप केल्याने चालू आर्थिक वर्षात संस्था आणखी तोट्यात जाणार आहेत. या संकटातून बाहेर काढण्यासाठी गेल्यावर्षीप्रमाणे आॅगस्टअखेर कर्जफेडीसह वाटपास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.कारखान्यानिहाय देय ‘एफआरपी’ रक्कम कोटींतकोल्हापूर :आजरा- २५.८६भोगावती- ३७.६२राजाराम- २४.०३शाहू- २४.६६दालमिया- १८.०७दत्त, शिरोळ- ५४.०४बिद्री- २९.९३नलवडे- ११.३६जवाहर- १०५.७७मंडलिक- ८.०२कुंभी- १४.९७पंचगंगा- ७९.९७शरद- २४.४१वारणा- १०३.२३डी. वाय. पाटील- २९.६४गुरुदत्त- ३५.७४नलवडे शुगर्स- २७.६१हेमरस- १९.६३महाडिक शुगर्स- ८.८३सरसेनापती- १९.५१सांगली :हुतात्मा- २५.०२राजारामबापू- ३८.१४महांकाली- ११.४६माणगंगा- ३०.६१राजारामबापू, वाटेगाव- १७.८९सोनहिरा- २२.९९वसंतदादा- ५६.३६विश्वास- २२.९७यशवंत- १०.०८क्रांती- २७.४८मोहनराव शिंदे- २१.३५राजारामबापू, कारंडवाडी- २१.२३डोंगराई- २२.०४उदगिरी- ९.४३सद्गुरू- २१.०८वसूल नसल्याने यंदा विकास संस्था अडचणीत आल्या आहेत. जूनअखेर वसूल झाला नाही, तर संस्थेबरोबर शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. यासाठी कर्ज परतफेडी व वाटपास जिल्हा बॅँकेने मुदतवाढ द्यावी. - संभाजीराव चाबूक, जिल्हाध्यक्ष, गटसचिव संघटनाबिनपैशाचा करार !प्रत्येक वर्षी जून महिन्यात साखर कारखाने तोडणी व वाहतूक ठेकेदारांकडून करार करून घेतात. आगाऊ रक्कम देऊन करार केला जातो. संपलेल्या हंगामातील तोडणी व वाहतूकदारांचे पैसे देताना दमछाक झाल्याने यंदा करार सुरू आहेत; पण ते बिनपैशाचे केले जात असल्याने तोडणी मजुरांना आगाऊ रक्कम द्यायची कोठून, असा प्रश्न वाहतूक व तोडणी ठेकेदारांसमोर आहे. गायकवाड कारखान्याचे जादा वाटपसोनवडे येथील उदयसिंगराव गायकवाड कारखान्याची देय एफआरपी २०९४ रुपये असताना त्यांनी प्रतिटन २४०० रुपयांप्रमाणे वाटप केल्याने त्यांचे ‘एफआरपी’पेक्षा २ कोटी ७८ लाख रुपये जादा वाटप झाले; तर ‘दौलत’ची २०११-१२ मधील १८ कोटी ११ लाख, ‘वसंतदादा’ची २०१३-१४ मधील २३ कोटी ७४ लाख रुपये एफआरपीची रक्कम देय आहे. आठशे विकास संस्था तोट्यातविकास सेवा संस्थांचा वसूल हा सर्वस्वी साखर कारखान्यांच्या ऊसबिलावरच अवलंबून असतो. यंदा फेबु्रवारीमध्ये तुटलेल्या उसाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने बहुतांश संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक वसूल थकला आहे. परिणामी मार्च २०१५ च्या ताळेबंदात कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे आठशे संस्था तोट्यात गेल्या आहेत.