शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारला धडकी भरेल--शेट्टी यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 22:52 IST

\पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही,

ठळक मुद्दे कर्नाटकातील सभेला प्रचंड प्रतिसादअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय

पांडवपुरा (कर्नाटक) : येत्या २० नोव्हेंबरला देशाच्या कानाकोपºयांतून आलेले शेतकरी दिल्लीच्या तख्ताला धडक देतील तेव्हा मोदी सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे दिला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेला शेतकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले,‘नंजूम गौडा, नारायण स्वामी, शरद जोशी, महेंद्रसिंग टिकैत यांच्या उंचीचे देशात शेतकरी नेते आता राहिले नाहीत; परंतु शेतकºयांचे प्रश्न मात्र बिकट झाले आहेत. शेतकºयांबरोबरच शेतकºयांची मुलं-बाळेही आत्महत्या करू लागले आहेत. अशा परिस्थितीत देशातील शेतकºयांनी आणि शेतकरी नेत्यांनी एक होणे ही काळाची गरज आहे. मोदींच्या विश्वासघाताने शेतकरी पेटून उठला आहे तर शिवराजसिंह चौहान सरकारने सहा शेतकºयांचा बळी घेतला आहे. त्यामुळे देशातील शेतकरी नेते एक झाले आहेत आणि त्यातूनच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीची स्थापना झाली व सामुदायिक नेतृत्वाचा माध्यमातून शेतकरी चळवळ पुढे नेण्याचा निर्णय झाला. देशाच्या कानाकोपºयातील शेतकºयांनी एकत्र येऊन हा लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे.’

या देशातला शेतकºयांमध्ये भिकाºयाला राजा करण्याची जशी ताकत आहे तशीच राजाला भिकारी करण्याचीही ताकत आहे हे कोणी विसरू नये. आपली लढाई ही कौरवांच्या विरोधातली आहे म्हणूनच येत्या २० नोव्हेंबरला कुरूक्षेत्राला म्हणजेच दिल्लीला देशाच्या कानाकोपºयांतून शेतकरी निर्णायक लढ्यासाठी जमणार आहेत. कर्नाटकला शेतकरी चळवळीचा मोठा इतिहास आहे तेव्हा कर्नाटकातूनही मोठ्या संख्येने आपली ताकद दिल्लीत दाखवा, असेही आवाहन खा. शेट्टी यांनी केले.कर्नाटकातील पांडवपुरा येथील किसान सभेत हजारो शेतकºयांसमोर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी.