शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

महापुराने हैराण शेतकऱ्यांनी घेतला भाजीपाल्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST

बांबवडे : महापुराने ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्याने ...

बांबवडे : महापुराने ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्याने वाहून गेली आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचून राहिले, त्या ठिकाणची पिके कुजली आहेत. अशा शेतात वाडीचरण, सरूड येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेऊन नुकसान भरपाई शासन भरोसे न राहता स्वत:च भरून काढण्याचा प्रयोग केला आहे.

जुलै महिन्यात पावसाने हाहाकार माजवला होता. यामध्ये काही शेतातील पिके मातीसह वाहून गेली, तर काही पिके पाणी साचून राहिल्याने जागच्या जागी कुजून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास महापुराने हिरावून घेतला. झालेल्या नुकसानीचा मोबदला शासन किती देणार याची शाश्वती नाही. परंतु, निसर्गापुढे हार मानेल तो शेतकरी कसला. दरवर्षी महापूर, वादळ, रोग, दुष्काळ ही संकटे येतच राहणार. यासाठी शेतकऱ्यांना स्वतः पर्याय शोधावे लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी कमी कालावधीत उत्पादित होणारी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. कुजलेली भाताची, सोयाबीनची धसकटे काढून टाकली. दलदलीमुळे यंत्राचा वापर करता आला नाही. मनुष्यबळाचा वापर केला गेला. वांगी, टोमॅटो, पावटा, घेवडा पिके घेतली. त्यामध्ये आंतरपिके म्हणून पोकळा, मेथी ,कोथिंबीर, तांदळी यासारखी भाजीपाल्याची लागवड केली आणि त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे.

शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरणार असून, नुकसान भरपाई भरून येण्यासाठी शेतकऱ्यांना त्याची मदत होणार आहे. नदीकाठी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये पिके घ्यावी का नको याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कमी कालावधीत येणारी पिके शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत.

- रामभाऊ लाड, शेतकरी, वाडीचरण.