शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

महापुराने हैराण शेतकऱ्यांनी घेतला भाजीपाल्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST

बांबवडे : महापुराने ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्याने ...

बांबवडे : महापुराने ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्याने वाहून गेली आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचून राहिले, त्या ठिकाणची पिके कुजली आहेत. अशा शेतात वाडीचरण, सरूड येथील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके घेऊन नुकसान भरपाई शासन भरोसे न राहता स्वत:च भरून काढण्याचा प्रयोग केला आहे.

जुलै महिन्यात पावसाने हाहाकार माजवला होता. यामध्ये काही शेतातील पिके मातीसह वाहून गेली, तर काही पिके पाणी साचून राहिल्याने जागच्या जागी कुजून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास महापुराने हिरावून घेतला. झालेल्या नुकसानीचा मोबदला शासन किती देणार याची शाश्वती नाही. परंतु, निसर्गापुढे हार मानेल तो शेतकरी कसला. दरवर्षी महापूर, वादळ, रोग, दुष्काळ ही संकटे येतच राहणार. यासाठी शेतकऱ्यांना स्वतः पर्याय शोधावे लागणार आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी कमी कालावधीत उत्पादित होणारी भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. कुजलेली भाताची, सोयाबीनची धसकटे काढून टाकली. दलदलीमुळे यंत्राचा वापर करता आला नाही. मनुष्यबळाचा वापर केला गेला. वांगी, टोमॅटो, पावटा, घेवडा पिके घेतली. त्यामध्ये आंतरपिके म्हणून पोकळा, मेथी ,कोथिंबीर, तांदळी यासारखी भाजीपाल्याची लागवड केली आणि त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे.

शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग यशस्वी ठरणार असून, नुकसान भरपाई भरून येण्यासाठी शेतकऱ्यांना त्याची मदत होणार आहे. नदीकाठी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये पिके घ्यावी का नको याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कमी कालावधीत येणारी पिके शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत.

- रामभाऊ लाड, शेतकरी, वाडीचरण.