शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

गर्दी, डामडौलाशिवाय बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोविड संसर्गामुळे आलेले निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याची सांगड घालत, कोल्हापुरातील तमाम गणेशभक्तांनी रविवारी भक्तिमय, तसेच ...

कोल्हापूर : कोविड संसर्गामुळे आलेले निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याची सांगड घालत, कोल्हापुरातील तमाम गणेशभक्तांनी रविवारी भक्तिमय, तसेच शिस्तबद्ध रितीने आपल्या लाडक्या बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी मनोभावे आळवणी करत निरोप दिला. मोजक्याच कार्यकर्त्यांना इराणी खणीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यात आल्याने, सुलभ आणि जलद गतीने मूर्ती विसर्जन सोहळा पार पडला. रविवारी उत्तररात्री पाऊण वाजता विसर्जन सोहळा आटोपला, तेव्हा १,०७२ सार्वजनिक मूर्तींचे तर १,८२२ घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले होते.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते. शासन आणि प्रशासनाने घालून दिलेल्या निकषात बसवून गणेशोत्सव साजरा करणे मंडळांच्या कार्यकर्त्यांना थोड जड गेले, परंतु गणेशावरील श्रद्धा व भक्ती कुठेही कमी पडून न देता, नियम पाळत नित्यपूजेसह संपूर्ण उत्सव साध्या पद्धतीने पार पाडला. अलोट गर्दी आणि अमर्याद उत्साहाचे प्रतीक बनून गेलेल्या विसर्जन सोहळ्यातही कार्यकर्त्यांनी साधेपणा दाखवून दिला.

या वर्षी मिरवणूक नसल्याने उद्घाटन सोहळा, तसेच मिरवणुकीतील सर्व प्रकारचा डामडौल टाळत सर्वच मंडळांनी आपापल्या सोयीने मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. काही मंडळांनी शनिवारी रात्रीच मूर्तींचे विसर्जन केले, तर काही मंडळांनी रविवारी सकाळी सातपासून विसर्जनाला सुरुवात केली. शहरातील, तसेच उपनगरातील शंभर टक्के मूर्ती या इराणी खणीत झाल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श पायंडा कार्यकर्त्यांनी घालून दिला. प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीवरच आणि तेही महाद्वार रोडवरूनच जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांना सोडून द्यावा लागला. त्यामुळे मिरजकर तिकटी, महाद्वार, पापाची तिकटी, गंगावेश अलोट गर्दीने गजबजणारा परिसरात शुकशुकाट होता. ही एक नव्या सुधारणावादाची, तसेच पर्यावरण जपण्याची सुरवात म्हणावी लागेल.

महानगरपालिका प्रशासनाने विसर्जनाची उत्तम व्यवस्था केली होती, तर पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध बंदोबस्ताची आखणी करून विसर्जनाच्या निमित्ताने होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. मात्र, शासनाने निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यांची सांगड घालताना, काही वेळा वादावादी, रेटारेटी, तसेच दमछाकही झाली, परंतु परिस्थिती संयमाने हाताळली गेली.