शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

गर्दी, डामडौलाशिवाय बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोविड संसर्गामुळे आलेले निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याची सांगड घालत, कोल्हापुरातील तमाम गणेशभक्तांनी रविवारी भक्तिमय, तसेच ...

कोल्हापूर : कोविड संसर्गामुळे आलेले निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याची सांगड घालत, कोल्हापुरातील तमाम गणेशभक्तांनी रविवारी भक्तिमय, तसेच शिस्तबद्ध रितीने आपल्या लाडक्या बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी मनोभावे आळवणी करत निरोप दिला. मोजक्याच कार्यकर्त्यांना इराणी खणीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यात आल्याने, सुलभ आणि जलद गतीने मूर्ती विसर्जन सोहळा पार पडला. रविवारी उत्तररात्री पाऊण वाजता विसर्जन सोहळा आटोपला, तेव्हा १,०७२ सार्वजनिक मूर्तींचे तर १,८२२ घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले होते.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते. शासन आणि प्रशासनाने घालून दिलेल्या निकषात बसवून गणेशोत्सव साजरा करणे मंडळांच्या कार्यकर्त्यांना थोड जड गेले, परंतु गणेशावरील श्रद्धा व भक्ती कुठेही कमी पडून न देता, नियम पाळत नित्यपूजेसह संपूर्ण उत्सव साध्या पद्धतीने पार पाडला. अलोट गर्दी आणि अमर्याद उत्साहाचे प्रतीक बनून गेलेल्या विसर्जन सोहळ्यातही कार्यकर्त्यांनी साधेपणा दाखवून दिला.

या वर्षी मिरवणूक नसल्याने उद्घाटन सोहळा, तसेच मिरवणुकीतील सर्व प्रकारचा डामडौल टाळत सर्वच मंडळांनी आपापल्या सोयीने मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. काही मंडळांनी शनिवारी रात्रीच मूर्तींचे विसर्जन केले, तर काही मंडळांनी रविवारी सकाळी सातपासून विसर्जनाला सुरुवात केली. शहरातील, तसेच उपनगरातील शंभर टक्के मूर्ती या इराणी खणीत झाल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श पायंडा कार्यकर्त्यांनी घालून दिला. प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीवरच आणि तेही महाद्वार रोडवरूनच जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांना सोडून द्यावा लागला. त्यामुळे मिरजकर तिकटी, महाद्वार, पापाची तिकटी, गंगावेश अलोट गर्दीने गजबजणारा परिसरात शुकशुकाट होता. ही एक नव्या सुधारणावादाची, तसेच पर्यावरण जपण्याची सुरवात म्हणावी लागेल.

महानगरपालिका प्रशासनाने विसर्जनाची उत्तम व्यवस्था केली होती, तर पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध बंदोबस्ताची आखणी करून विसर्जनाच्या निमित्ताने होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. मात्र, शासनाने निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यांची सांगड घालताना, काही वेळा वादावादी, रेटारेटी, तसेच दमछाकही झाली, परंतु परिस्थिती संयमाने हाताळली गेली.