शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

गर्दी, डामडौलाशिवाय बाप्पांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोविड संसर्गामुळे आलेले निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याची सांगड घालत, कोल्हापुरातील तमाम गणेशभक्तांनी रविवारी भक्तिमय, तसेच ...

कोल्हापूर : कोविड संसर्गामुळे आलेले निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह याची सांगड घालत, कोल्हापुरातील तमाम गणेशभक्तांनी रविवारी भक्तिमय, तसेच शिस्तबद्ध रितीने आपल्या लाडक्या बाप्पांना ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी मनोभावे आळवणी करत निरोप दिला. मोजक्याच कार्यकर्त्यांना इराणी खणीवर गणेशमूर्ती विसर्जनासाठी परवानगी देण्यात आल्याने, सुलभ आणि जलद गतीने मूर्ती विसर्जन सोहळा पार पडला. रविवारी उत्तररात्री पाऊण वाजता विसर्जन सोहळा आटोपला, तेव्हा १,०७२ सार्वजनिक मूर्तींचे तर १,८२२ घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले होते.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोना संसर्गाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले होते. शासन आणि प्रशासनाने घालून दिलेल्या निकषात बसवून गणेशोत्सव साजरा करणे मंडळांच्या कार्यकर्त्यांना थोड जड गेले, परंतु गणेशावरील श्रद्धा व भक्ती कुठेही कमी पडून न देता, नियम पाळत नित्यपूजेसह संपूर्ण उत्सव साध्या पद्धतीने पार पाडला. अलोट गर्दी आणि अमर्याद उत्साहाचे प्रतीक बनून गेलेल्या विसर्जन सोहळ्यातही कार्यकर्त्यांनी साधेपणा दाखवून दिला.

या वर्षी मिरवणूक नसल्याने उद्घाटन सोहळा, तसेच मिरवणुकीतील सर्व प्रकारचा डामडौल टाळत सर्वच मंडळांनी आपापल्या सोयीने मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढल्या. काही मंडळांनी शनिवारी रात्रीच मूर्तींचे विसर्जन केले, तर काही मंडळांनी रविवारी सकाळी सातपासून विसर्जनाला सुरुवात केली. शहरातील, तसेच उपनगरातील शंभर टक्के मूर्ती या इराणी खणीत झाल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श पायंडा कार्यकर्त्यांनी घालून दिला. प्रत्येक वर्षी पंचगंगा नदीवरच आणि तेही महाद्वार रोडवरूनच जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांना सोडून द्यावा लागला. त्यामुळे मिरजकर तिकटी, महाद्वार, पापाची तिकटी, गंगावेश अलोट गर्दीने गजबजणारा परिसरात शुकशुकाट होता. ही एक नव्या सुधारणावादाची, तसेच पर्यावरण जपण्याची सुरवात म्हणावी लागेल.

महानगरपालिका प्रशासनाने विसर्जनाची उत्तम व्यवस्था केली होती, तर पोलीस प्रशासनाने नियोजनबद्ध बंदोबस्ताची आखणी करून विसर्जनाच्या निमित्ताने होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविले. मात्र, शासनाने निर्बंध आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यांची सांगड घालताना, काही वेळा वादावादी, रेटारेटी, तसेच दमछाकही झाली, परंतु परिस्थिती संयमाने हाताळली गेली.