शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाची विलक्षण कथा ‘जंगल खजिन्याचा शोध’ ; कोल्हापूरचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:25 IST

‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, एका बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनंदाची ही विलक्षण कथा

ठळक मुद्दे सलीम मुल्ला : साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ. प्रकाश मुंज ।कोल्हापूर : ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, एका बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनंदाची ही विलक्षण कथा असल्याची प्रतिक्रिया बालसाहित्यकार सलीम सरदार मुल्ला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

साहित्य अकादमीच्यावतीने २०१९ चा ‘बाल साहित्य पुरस्कार’ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात मराठी भाषेतील ‘बाल साहित्य पुरस्कार’ तळंदगे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बालकादंबरीस जाहीर करण्यात आला. पुण्यातील दर्या प्रकाशनच्यावतीने २०१४ मध्ये ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे.

यानिमित्ताने सलीम मुल्ला यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करून बालसाहित्याप्रती आपली आणखी जबाबदारी वाढली असल्याची भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. पुरस्कारप्राप्त पुस्तकाविषयी ते म्हणाले की, जेबू आणि त्याचे छोटे मित्र डोंगर-कपारीतून मनसोक्त भटकतात.

पशुपक्ष्यांचे आवाज, त्यांच्या पावलांचे ठसे, जलचर , कीटक, झाडे-वनस्पती, पाना-फुलांचा गंध, त्यांचे औषधी उपयोग, दगड-मातीचे रंग व आकार अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे जंगलच्या आगळ्यावेगळ्या खजिन्याची छोट्यांना ओळख होत जाते आणि यातून मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाºया टोळीचा पर्दाफाश होतो. यामुळेच लहान मुलांच्या दृष्टीने ही कादंबरी उत्कंठावर्धक आणि वाचनीय ठरली आहे.लेखकाविषयी.... सलीम सरदार मुल्लामूळ गाव : तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. सध्या आजरा येथे राहतात.शिक्षण : अभियंता पदविका आणि इंटेरियल डिजाइन कोर्स, दळवीज् आटर्स (कोल्हापूर) येथे इंटेरियल डिजाइन शिक्षक म्हणून शिकविले.

वनविभागात वनरक्षक या पदावर २००६ पासून कडगाव (ता. भुदरगड) येथे कार्यरत, १९८८ पासून सातत्याने वन्यप्राणी, वन्यपक्षी, निसर्गविषयक विविध पत्रिकांमधून लेखन. ‘लोकमत’मध्येही लेखन पर्यावरण जागृती व प्रबोधनविषयक अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने.बालसाहित्यविश्व१. अवलिया : ललित संग्रह, २००० मध्ये प्रकाशितमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित.२ . जंगल खजिन्याचा शोध : बालकादंबरी २०१४ मध्ये पुण्यातील दर्या प्रकाशनद्वारा प्रकाशित३. ऋतूफेरा - ललित लेख संग्रह २०१८ मध्ये प्रकाशित४. पेणा आणि चिकोटी : बालकादंबरी, पॉप्युलर प्रकाशनकडून प्रकाशनाच्या मार्गावर आहे.५. अजबाईतून उतराई : बालकादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. 

 

मुलांवर निसर्ग संस्कार होण्यासाठी निसर्ग सान्निध्यात राहिले पाहिजे. निसर्गाच्या प्रत्येक अप्रूपातून हरेक ऋतूच्या नवलाईची जादू शोधता येते. पाखरांच्या कलकलाटाची लडिवाळ बोली समजून घ्यायला हवी. किडे, फुलपाखरे, पशु-पक्षी या साऱ्यांच्या हरेक हरकतींचा मागमूस घेता आला पाहिजे. तर निसर्गाच्या निर्मितीमागे ईश्वराचे नेमके प्रयोजन काय आहे, हे हळूहळू कळून येते.- सलीम मुल्ला, साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग