शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

आनंदाची विलक्षण कथा ‘जंगल खजिन्याचा शोध’ ; कोल्हापूरचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:25 IST

‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, एका बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनंदाची ही विलक्षण कथा

ठळक मुद्दे सलीम मुल्ला : साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ. प्रकाश मुंज ।कोल्हापूर : ‘जंगल खजिन्याचा शोध’ ही बालकादंबरी असून, एका बालचमूने जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणारी ही एक उत्कंठावर्धक कथा आहे. या कादंबरीत छोट्या मित्रांचे निव्वळ साहसच नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात मिळणाºया मनमुराद आनंदाची ही विलक्षण कथा असल्याची प्रतिक्रिया बालसाहित्यकार सलीम सरदार मुल्ला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

साहित्य अकादमीच्यावतीने २०१९ चा ‘बाल साहित्य पुरस्कार’ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. यात मराठी भाषेतील ‘बाल साहित्य पुरस्कार’ तळंदगे (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील सलीम सरदार मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बालकादंबरीस जाहीर करण्यात आला. पुण्यातील दर्या प्रकाशनच्यावतीने २०१४ मध्ये ही कादंबरी प्रकाशित करण्यात आली आहे.

यानिमित्ताने सलीम मुल्ला यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या पुरस्कारबद्दल आनंद व्यक्त करून बालसाहित्याप्रती आपली आणखी जबाबदारी वाढली असल्याची भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. पुरस्कारप्राप्त पुस्तकाविषयी ते म्हणाले की, जेबू आणि त्याचे छोटे मित्र डोंगर-कपारीतून मनसोक्त भटकतात.

पशुपक्ष्यांचे आवाज, त्यांच्या पावलांचे ठसे, जलचर , कीटक, झाडे-वनस्पती, पाना-फुलांचा गंध, त्यांचे औषधी उपयोग, दगड-मातीचे रंग व आकार अशा अनेक वैविध्यपूर्ण गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करतात. त्यामुळे जंगलच्या आगळ्यावेगळ्या खजिन्याची छोट्यांना ओळख होत जाते आणि यातून मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाºया टोळीचा पर्दाफाश होतो. यामुळेच लहान मुलांच्या दृष्टीने ही कादंबरी उत्कंठावर्धक आणि वाचनीय ठरली आहे.लेखकाविषयी.... सलीम सरदार मुल्लामूळ गाव : तळंदगे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. सध्या आजरा येथे राहतात.शिक्षण : अभियंता पदविका आणि इंटेरियल डिजाइन कोर्स, दळवीज् आटर्स (कोल्हापूर) येथे इंटेरियल डिजाइन शिक्षक म्हणून शिकविले.

वनविभागात वनरक्षक या पदावर २००६ पासून कडगाव (ता. भुदरगड) येथे कार्यरत, १९८८ पासून सातत्याने वन्यप्राणी, वन्यपक्षी, निसर्गविषयक विविध पत्रिकांमधून लेखन. ‘लोकमत’मध्येही लेखन पर्यावरण जागृती व प्रबोधनविषयक अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये व्याख्याने.बालसाहित्यविश्व१. अवलिया : ललित संग्रह, २००० मध्ये प्रकाशितमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशित.२ . जंगल खजिन्याचा शोध : बालकादंबरी २०१४ मध्ये पुण्यातील दर्या प्रकाशनद्वारा प्रकाशित३. ऋतूफेरा - ललित लेख संग्रह २०१८ मध्ये प्रकाशित४. पेणा आणि चिकोटी : बालकादंबरी, पॉप्युलर प्रकाशनकडून प्रकाशनाच्या मार्गावर आहे.५. अजबाईतून उतराई : बालकादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. 

 

मुलांवर निसर्ग संस्कार होण्यासाठी निसर्ग सान्निध्यात राहिले पाहिजे. निसर्गाच्या प्रत्येक अप्रूपातून हरेक ऋतूच्या नवलाईची जादू शोधता येते. पाखरांच्या कलकलाटाची लडिवाळ बोली समजून घ्यायला हवी. किडे, फुलपाखरे, पशु-पक्षी या साऱ्यांच्या हरेक हरकतींचा मागमूस घेता आला पाहिजे. तर निसर्गाच्या निर्मितीमागे ईश्वराचे नेमके प्रयोजन काय आहे, हे हळूहळू कळून येते.- सलीम मुल्ला, साहित्य अकादमीचे पुरस्कार विजेते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभाग