शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईनची सक्ती केल्यास कुटूंब सर्वेचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 18:46 IST

माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत सुरु असलेल्या कुटूंब रुग्ण सर्वेक्षणाची ऑनलाईन माहिती भरणे हे आमचे काम नाही. तरीदेखील आमच्यावर सक्ती केलीं जात आहे, प्रशासनाकडून धमकी दिली जात आहे. हे काम आम्ही करणार नाही, सक्ती केल्यास सर्वेचे काम कोणत्याही क्षणी बंद करु, असा इशारा आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी दिला आहे.

ठळक मुद्देऑनलाईनची सक्ती केल्यास कुटूंब सर्वेचे काम बंदआशा कर्मचारी आक्रमक : मुख्यमंत्र्याच्या विनंतीमुळे राज्यव्यापी संप मागे

कोल्हापूर : माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत सुरु असलेल्या कुटूंब रुग्ण सर्वेक्षणाची ऑनलाईन माहिती भरणे हे आमचे काम नाही. तरीदेखील आमच्यावर सक्ती केलीं जात आहे, प्रशासनाकडून धमकी दिली जात आहे. हे काम आम्ही करणार नाही, सक्ती केल्यास सर्वेचे काम कोणत्याही क्षणी बंद करु, असा इशारा आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नेत्रदीपा पाटील यांनी दिला आहे.मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीस मान देऊन २८ ते ३० सप्टेबरला होणारे राज्यस्तरीय कामबंद आंदोलन मागे घेत आहोत, पण मानधनाच्या मागणीसाठी १३ ऑक्टोबरची डेडलाईन दिली आहे, तोवर निर्णय झाली नाही तर १४ पासून कोणतीही पुर्वसुचना न देता कामबंद केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. शनिवारी कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन ही भूमिका जाहीर करण्यात आली. चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, सीमा पाटील, ज्योती तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.आशांना तीन हजाराचे वाढीव मानधन देण्यासाठी पुरवणी मागण्यामध्ये तरतूद करु असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे. कोवीडच्या या काळात कामबंद आंदोलन करणे राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीने बरे नाही. मी वैयक्तीक लक्ष घालतो, असे आश्वासन आशा कर्मचारी कृती समितीला दिल्यानंतरच संपाचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी मानवतेच्या दृष्टीने आशा कर्मचाऱ्यांकडे पाहावेमाझे कुटूूंब माझी जबाबदारी या मोहिमेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक होत आहे, हे ठीक आहे, पण ज्यांच्या जिवावर हे सर्वेक्षण करुन घेतले जात आहे, त्या आशांवर मात्र प्रशासनाकडून वाईट वागणूक दिली जात असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई हे संवेदनशिल अधिकारी आहेत, त्यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून याकडे पाहावे अशी अपेक्षा चंद्रकांत यादव यांनी व्यक्त केली.आशावरील उपचाराबाबत दुजाभाव काघोडावत कोवीड केअर सेंटरमध्ये सर्व शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कोरोनाचे उपचार होत आहेत, पण आशांना मात्र तेथे उपचारास घेतले जात नाही. इचलकरंजी शिरोळमधील तीन आशांना उपचार नाकारल्याने आयजीएममध्ये उपचार घ्यावे लागले. शासकीय सेवेत असल्यासारखे आशांकडून सर्व कामे करवून घेता, मग सुविधा देताना दुजाभाव का असा सवाल नेत्रदीपा पाटील यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर