शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
4
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
5
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
6
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
7
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
8
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
9
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
10
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
11
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
12
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
13
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
15
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
16
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
17
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
18
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
19
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
20
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 

खोट्या इतिहासाने माथी भडकविण्याचे काम

By admin | Updated: April 9, 2015 00:05 IST

जितेंद्र आव्हाड : दाभोळकर, पानसरेंच्या हत्येतून बोध घेण्याची गरज

कसबा तारळे : शाहू महाराजाच्या पुरोगामी कोल्हापुरात कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्या दुर्दैवी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंदराव पानसरे हत्येपासून बोध घेणे गरजेचे आहे. आज इतिहास बिघडविण्याचे कार्य सुरू असून, खोटा इतिहास जनतेसमोर आणला जात आहे. तो इतिहास माथी भडकाविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.कंथेवाडी (ता. राधानगरी) येथे जनता दलाचे दिवंगत माजी आमदार शंकरराव धोंडी पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.विद्यालयाच्या प्रांगणातील शंकरराव धोंडी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार के. पी. पाटील, संपतराव पवार-पाटील, श्रीपतराव शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य ए. वाय. पाटील यांनी अभिवादन केले. जनता दलाचे राज्य सचिव शिवाजीराव परुळेकर यांनी स्वागत केले. ‘भोगावती’चे संचालक वसंतराव पाटील यांनी (कै.) शंकरराव धोंडी पाटील यांच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकात घेताना, त्यांनी समाजातील दीन-दलित, उपेक्षित धरणग्रस्त यांच्यासाठी आमदारकी कशी पणाला लावली, त्यांचे संघर्षमय जीवन फक्त बहुजन समाजासाठी होते, असे सांगितले.तालुका संघाचे विठ्ठलराव खोराटे, ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण सोनाळकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन चौगुले, माजी सभापती संजयसिंह कलिकते, वंदना पाटील, शरद पाडळकर, श्रीकांत साळोखे, सरपंच रामचंद्र पाटील, जनता दलाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव मुसळे, संभाजीराव पाटील, माजी उपसभापती अजित पोवार, मानसिंग पाटील, सुरेश शिपूरकर, आदी उपस्थित होते. टी. एल किल्लेदार यांनी सूत्रसंचालन, तर बी. जी. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)