शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
5
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
6
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
7
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
8
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
9
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
10
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
11
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
12
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
13
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
14
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
15
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
16
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
17
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
18
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
19
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
20
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 

खोट्या इतिहासाने माथी भडकविण्याचे काम

By admin | Updated: April 9, 2015 00:05 IST

जितेंद्र आव्हाड : दाभोळकर, पानसरेंच्या हत्येतून बोध घेण्याची गरज

कसबा तारळे : शाहू महाराजाच्या पुरोगामी कोल्हापुरात कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्या दुर्दैवी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंदराव पानसरे हत्येपासून बोध घेणे गरजेचे आहे. आज इतिहास बिघडविण्याचे कार्य सुरू असून, खोटा इतिहास जनतेसमोर आणला जात आहे. तो इतिहास माथी भडकाविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले.कंथेवाडी (ता. राधानगरी) येथे जनता दलाचे दिवंगत माजी आमदार शंकरराव धोंडी पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुखपाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.विद्यालयाच्या प्रांगणातील शंकरराव धोंडी पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार के. पी. पाटील, संपतराव पवार-पाटील, श्रीपतराव शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य ए. वाय. पाटील यांनी अभिवादन केले. जनता दलाचे राज्य सचिव शिवाजीराव परुळेकर यांनी स्वागत केले. ‘भोगावती’चे संचालक वसंतराव पाटील यांनी (कै.) शंकरराव धोंडी पाटील यांच्या कार्याचा आढावा प्रास्ताविकात घेताना, त्यांनी समाजातील दीन-दलित, उपेक्षित धरणग्रस्त यांच्यासाठी आमदारकी कशी पणाला लावली, त्यांचे संघर्षमय जीवन फक्त बहुजन समाजासाठी होते, असे सांगितले.तालुका संघाचे विठ्ठलराव खोराटे, ‘भोगावती’चे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण सोनाळकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष किसन चौगुले, माजी सभापती संजयसिंह कलिकते, वंदना पाटील, शरद पाडळकर, श्रीकांत साळोखे, सरपंच रामचंद्र पाटील, जनता दलाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव मुसळे, संभाजीराव पाटील, माजी उपसभापती अजित पोवार, मानसिंग पाटील, सुरेश शिपूरकर, आदी उपस्थित होते. टी. एल किल्लेदार यांनी सूत्रसंचालन, तर बी. जी. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)