शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

टक्का घसरूनही ‘कोल्हापूर विभाग’ राज्यात दुसऱ्या स्थानी; मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 6:12 PM

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ८६.५८ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३० टक्क्यांनी निकाल घटला असला, तरी सलग सातव्या वर्षी या विभागाने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे. भाषा आणि सामाजिक शास्त्रासाठीचे बंद झालेले अंतर्गत गुण, प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे गुणांचा फुगवटा यंदा कमी झाला.

ठळक मुद्देप्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे गुणांचा फुगवटा यंदा कमी७.३० टक्क्यांनी निकाल घटला

कोल्हापूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावी परीक्षाचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ८६.५८ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३० टक्क्यांनी निकाल घटला असला, तरी सलग सातव्या वर्षी या विभागाने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे. भाषा आणि सामाजिक शास्त्रासाठीचे बंद झालेले अंतर्गत गुण, प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे गुणांचा फुगवटा यंदा कमी झाला.‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ सूत्रानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल जाहीर केला. त्यानंतर कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विभागीय शिक्षण मंडळाचे लेखाधिकारी एस. एल. रेणके, प्रभारी सहायक सचिव एन. बी. पवार, साताऱ्याच्या उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, आदी उपस्थित होते.

या विभागामध्ये ८८.८३ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्ह्याने सलग पाचव्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सातारा जिल्हा ८६.२३ टक्क्यांनी द्वितीय, तर सांगली जिल्हा ८३.८२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ८.५८ टक्क्यांनी अधिक आहे.

या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण २२६७ शाळांतील १,३९,७२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १,२०,९७६ जण उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ५८१०६ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे प्रमाण ९१.२५ टक्के आहे. ६२,८७० मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यांचे प्रमाण ८२.६७ टक्के आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ५००६९ विद्यार्थी, साताऱ्यामधील ३६७६१ आणि सांगलीतील ३४१४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्प्रविष्ट विद्यार्थ्यांचा निकाल २८.९३ टक्के लागला असल्याची माहिती सचिव आवारी यांनी दिली. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांवर शिक्षक, कुटुंबीय, नातेवाईक, सुहृद, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

निकालाची राज्यभरातील टक्केवारी कमी झाली आहे. टक्केवारीचे प्रमाण घटले असले, तरी कोल्हापूर विभागाचे राज्यातील द्वितीय क्रमांकावरील स्थान यावर्षी कायम राहिले आहे. गेल्या वर्षीपर्यंत भाषा, सामाजिकशास्त्रे या विषयांना अंतर्गत २० गुण दिले जात होते. यावर्षी ते बंद करण्यात आले. केवळ गणित आणि विज्ञान-तंत्रज्ञान विषयांसाठी हे गुण देण्यात आले. बंद झालेले अंतर्गत गुण आणि प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपांमुळे गुणांची टक्केवारी कमी झाल्याची शक्यता आहे.- सुरेश आवारी, सचिव, कोल्हापूर विभाग

२६ हजार विद्यार्थ्यांना सवलतीचे गुणया विभागातील एकूण २३,६०९ विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त २० इतके सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले. त्यात चित्रकला (२३,६०९), स्काउट-गाईड (१५), खेळाडू (२१६३) आणि दिव्यांग विद्यार्थी (५०७) यांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय निकाल

  1. कोल्हापूर : ८८.८३ टक्के
  2. सातारा : ८६.२३ टक्के
  3. सांगली : ८३.८२ टक्के

 

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkolhapurकोल्हापूर