शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

टक्का घसरूनही ‘कोल्हापूर विभाग’ राज्यात दुसऱ्या स्थानी; मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 18:18 IST

शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ८६.५८ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३० टक्क्यांनी निकाल घटला असला, तरी सलग सातव्या वर्षी या विभागाने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे. भाषा आणि सामाजिक शास्त्रासाठीचे बंद झालेले अंतर्गत गुण, प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे गुणांचा फुगवटा यंदा कमी झाला.

ठळक मुद्देप्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे गुणांचा फुगवटा यंदा कमी७.३० टक्क्यांनी निकाल घटला

कोल्हापूर : शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावी परीक्षाचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल ८६.५८ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.३० टक्क्यांनी निकाल घटला असला, तरी सलग सातव्या वर्षी या विभागाने राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम ठेवले आहे. भाषा आणि सामाजिक शास्त्रासाठीचे बंद झालेले अंतर्गत गुण, प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपामुळे गुणांचा फुगवटा यंदा कमी झाला.‘बेस्ट आॅफ फाईव्ह’ सूत्रानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शनिवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन निकाल जाहीर केला. त्यानंतर कोल्हापूर विभागाच्या निकालाची माहिती विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विभागीय शिक्षण मंडळाचे लेखाधिकारी एस. एल. रेणके, प्रभारी सहायक सचिव एन. बी. पवार, साताऱ्याच्या उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, आदी उपस्थित होते.

या विभागामध्ये ८८.८३ टक्क्यांसह कोल्हापूर जिल्ह्याने सलग पाचव्या वर्षी आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सातारा जिल्हा ८६.२३ टक्क्यांनी द्वितीय, तर सांगली जिल्हा ८३.८२ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर आहे. विभागात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ८.५८ टक्क्यांनी अधिक आहे.

या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण २२६७ शाळांतील १,३९,७२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १,२०,९७६ जण उत्तीर्ण झाले. त्यामध्ये ५८१०६ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे प्रमाण ९१.२५ टक्के आहे. ६२,८७० मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्यांचे प्रमाण ८२.६७ टक्के आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ५००६९ विद्यार्थी, साताऱ्यामधील ३६७६१ आणि सांगलीतील ३४१४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुनर्प्रविष्ट विद्यार्थ्यांचा निकाल २८.९३ टक्के लागला असल्याची माहिती सचिव आवारी यांनी दिली. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांवर शिक्षक, कुटुंबीय, नातेवाईक, सुहृद, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

निकालाची राज्यभरातील टक्केवारी कमी झाली आहे. टक्केवारीचे प्रमाण घटले असले, तरी कोल्हापूर विभागाचे राज्यातील द्वितीय क्रमांकावरील स्थान यावर्षी कायम राहिले आहे. गेल्या वर्षीपर्यंत भाषा, सामाजिकशास्त्रे या विषयांना अंतर्गत २० गुण दिले जात होते. यावर्षी ते बंद करण्यात आले. केवळ गणित आणि विज्ञान-तंत्रज्ञान विषयांसाठी हे गुण देण्यात आले. बंद झालेले अंतर्गत गुण आणि प्रश्नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपांमुळे गुणांची टक्केवारी कमी झाल्याची शक्यता आहे.- सुरेश आवारी, सचिव, कोल्हापूर विभाग

२६ हजार विद्यार्थ्यांना सवलतीचे गुणया विभागातील एकूण २३,६०९ विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त २० इतके सवलतीचे वाढीव गुण देण्यात आले. त्यात चित्रकला (२३,६०९), स्काउट-गाईड (१५), खेळाडू (२१६३) आणि दिव्यांग विद्यार्थी (५०७) यांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय निकाल

  1. कोल्हापूर : ८८.८३ टक्के
  2. सातारा : ८६.२३ टक्के
  3. सांगली : ८३.८२ टक्के

 

 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkolhapurकोल्हापूर