शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या पेंड आयातीच्या धोरणामुळेच सोयाबीनचा दर घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

कोल्हापूर : आपल्या देशात ज्या जीएम सोयाबीनच्या उत्पादनाला बंदी आहे, त्या सोयाबीनची पेंड आयात करण्याचे धोरण केंद्र सरकारने घेतले ...

कोल्हापूर : आपल्या देशात ज्या जीएम सोयाबीनच्या उत्पादनाला बंदी आहे, त्या सोयाबीनची पेंड आयात करण्याचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. या धोरणामुळेच आपल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दर घसरला आहे. एकीकडे तेलबियांचे उत्पादन वाढावा असे सांगत दुसरीकडे आयातीबाबतचे असे धोरण सरकारने घेतले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी रविवारी येथे सांगितले. साखर कारखान्यांनी ९५ टक्के एफआरपी दिली आहे. उर्वरित एफआरपीही लवकर देण्याबाबत कारखान्यांना सूचना केली आहे. पुढील हंगामात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य सरकारकडून एफआरपीबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी वसतिगृह इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री भुसे कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अतिवृष्टी, महापुरामुळे शेती, शेतकऱ्यांची घरे, आदी स्वरूपात नुकसान झाले आहे. त्याबाबतचे पंचनामे पूर्ण होत आले आहेत. दोन आठवड्यांत गटनिहाय माहिती संकलित होईल. नुकसानभरपाईसाठी किती निधी लागेल याचा अंदाज येईल. त्यानुसार मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पर्यावरणातील बदलांच्या अनुषंगाने आणि अतिवृष्टी, महापुरात टिकणारी कोणती पिके घेतली जातील यासंदर्भात चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. विद्यापीठांतील अभ्यासक्रम बदलाबाबत समिती नेमली असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. कोरोनाच्या कालावधीत राज्यात कुठेही अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध कमी पडले नाही. त्याचे सर्व श्रेय शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आहे. नावीन्यपूर्ण संशोधन, प्रयोग करणाऱ्या पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बँक’ आम्ही तयार केली असून, त्याद्वारे अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, महेश शिंदे उपस्थित होते.

कोल्हापुरातील ‘रामेती’साठी तीन कोटी

कोल्हापुरातील रामेती प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसह अन्य प्रलंबित कामांसाठी शासनाने तीन कोटींचा निधी वर्ग केला आहे. येथील कृषी विभागाशी संबंधित सर्व विभाग एकाच छताखाली आणण्यासाठी कृषी भवनच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.

मंत्री भुसे म्हणाले

१) काहीही न करता चंदगड येथील शिवमुद्रा शेती गटाने कृषी विभागाकडून ५० लाख रुपयांचे अनुदान घेतल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून त्यातील दोषींवर कारवाई केली जाईल.

२) प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल.

३) कृषी विद्यापीठाच्या विभाजनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.

४) कोल्हापूरसह राज्यातील सर्व कृषी महाविद्यालये, विद्यापीठांतील जमिनींचे संरक्षण आणि कॅम्पस सुरक्षित केले जातील.