शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॉवर उत्पादकांना दर घसरणीचा फटका

By admin | Updated: July 15, 2015 21:24 IST

मुंबईत मोठी आवक : शेतकरी सापडला उत्पादन खर्चाच्या आर्थिकचक्रात

घन:शाम कुंभार - यड्राव -नांदणी परिसरासह महाराष्ट्रातील नाशिक, मंचर भागातून मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात फ्लॉवरची आवक वाढल्याने चार दिवसांत दरात मोठी घसरण झाली आहे. याचा फटका फ्लॉवर उत्पादकांना बसत आहे. त्यांना उत्पादन खर्चाशी ताळमेळ घालणे अवघड बनले आहे. फ्लॉवरला मिळणारा दर कमी झाला तरीही मुंबई बाजारापर्यंत वाहतुकीचा खर्च मात्र तेवढाच सोसावा लागणार आहे. या उतरलेल्या दरामुळे फ्लॉवर उत्पादक आर्थिक चक्रात सापडला आहे.शिरोळ तालुक्यातील नांदणी, दानोळी, मजरेवाडी या भागातून फ्लॉवर मुंबई, वाशी येथील बाजारात मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येतो, परंतु येथे महाराष्ट्रातील नाशिक, मंचर, संगमनेर भागातूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॉवरची आवक होत असल्याने फ्लॉवरच्या दरात घसरण सुरू झाली आहे.चार दिवसांपूर्वी प्रती दहा किलो एकशे साठ रुपये दर असताना फ्लॉवरचा दर प्रती दहा किलो शंभर रुपयांपर्यंत खाली आला आहे. या दर घसरणीमुळे उत्पादन खर्चाचा ताळमेळही बसत नाही. बाजारापर्यंतचा वाहतूक खर्च उत्पादकांना सोसावा लागणार आहे.मे महिन्याच्या शेवटी फ्लॉवरची लागण केली जाते. लागण केल्यापासून सत्तर दिवसांनंतर फ्लॉवर काढण्यास तयार होतो. तेथून पुढे पंधरा दिवस काढणी होते. धूपकाली जातीचा फ्लॉवर मे ते जुलै यामध्ये येतो, तर कातकी जातीचे आॅगस्ट ते नोव्हेंबरमध्ये उत्पादन घेतात. गड्डे लहान असल्याने मुंबई बाजारात त्यास मोठी मागणी असते, तर व्हरायटी जातीच्या फ्लॉवरचे गड्डे मोठे असल्याने त्याची स्थानिक बाजारपेठेत नगावर विक्री होते.नांदणी परिसरात सुमारे चारशे एकर, दानोळी भागात दोनशे एकर, तर मजरेवाडी भागात ३० एकर क्षेत्रात फ्लॉवरचे उत्पादन घेण्यात येते. सरासरी प्रती एकर बारा टन उत्पादन होते. मान्सून पूर्व पाऊस झाल्यास फ्लॉवरची झपाट्याने वाढ होते व मोठ्या आकारात फुलते. अशा फ्लॉवरला दर कमी मिळतो. एक एकर फ्लॉवर लावण्यासाठी मशागतीचा खर्च सात हजार, बियाणे पाच हजार, मजुरी पंधरा हजार, औषध व खते पंचवीस हजार, पाणीपट्टी तीन हजार असा खर्च उत्पादन येईपर्यंत आहे, तर उत्पादन आल्यावर मुबंई-वाशी बाजारापर्यंत फ्लॉवर जाण्यासाठी प्रती किलो दोन रुपये, टोलसाठी पाच रुपये, हमाली २५ पैसे असा खर्च येतो. नांदणी येथील नोंदणीकृत असलेल्या नांदणी भाजीपाला व फळफळावळ उत्पादक सहकारी संघ, भैरवनाथ भाजीपाला संघ, जयकिसान व शेतकरी भाजीपाला संघाच्यावतीने येथील फ्लॉवर मुबंई, अहमदाबाद, नागपूरसह अन्य बाजारपेठेत पाठविण्यात येतो. संघाच्यावतीने उत्पादकाला पॅकिंग मटेरियल, औषधे, खते व बियाणे पुरवठा करण्यात येतो. याचबरोबर व्यापाऱ्याकडून मिळणाऱ्या बिलाची जबाबदारी संघ घेत आहे. हवामानाच्या बदलानुसार परिणाम करणारा भाजीपाला उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यामुळे दरातील चढ-उताराचा फटका उत्पादकांनाच सहन करावा लागतो. फ्लॉवर दराची घसरण, उत्पादन खर्चाचा ताळमेळ घालणे अवघड झाल्याने फ्लॉवर उत्पादक आर्थिक चक्रात सापडला आहे.उत्पादन खर्चाशी ताळमेळ घालणे बनले अवघड दर घसरला तरीही मुंबई बाजारापर्यंत वाहतुकीचा खर्च मात्र तेवढाच सोसावा लागणार दर प्रती दहा किलो शंभर रुपयेपर्यंत खाली