शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

सोशल मीडियावरील फेक पोस्टने उमेदवारांना ‘फेस’! : निवडणूक आयोगही गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 8:44 PM

परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे.

ठळक मुद्दे विनाकारण मनस्ताप तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करण्याच्या सूचना; दक्षतेची गरज

कोल्हापूर : ‘सत्य सांगण्यासाठी एक गल्ली फिरेपर्यंत असत्य गावभर फिरून आलेले असते’ असे सांगितले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील याच प्रकारच्या खऱ्या-खोट्या पोस्टमुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पडलेली पोस्ट खरी आहे की खोटी याची शहानिशा करायची कधी आणि मग त्याचा खुलासा करायचा कधी, असा प्रश्न या सर्वांसमोरच उभा ठाकला आहे. मात्र, याबाबत निवडणूक आयोगानेही स्पष्ट सूचना दिल्या असून, खोट्या पोस्टबाबत आणि त्या शेअर केल्याबाबतही तक्रार केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण लोकसभेपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीमुळेही तापले आहे. हे वातावरण तापविण्यामध्ये सोशल मीडियाचाही मोठी भूमिका राहिली आहे. सुरुवातीच्या काळात उमेदवाराविषयी गैरसमज पसरविणाºया पोस्ट टाकणे, जुन्या भाषणांचे व्हिडीओ टाकून अमूक नेते तमूक नेत्याच्या व्यासपीठावर गेले, त्यांनी पाठिंबा दिला, अशा पोस्ट टाकून गोेंधळ निर्माण करण्याचाही प्रयत्न या माध्यमातून काहीजण करत असतात.

संबंधित उमेदवारांच्या सहकारी संस्था, त्यातील गैरकारभार, उसाची बिले दिली आहेत का बुडवली आहेत या सगळ्यांचा पंचनामा खºया-खोट्या आकडेवारीनुसार केला जात असल्याने यामध्ये विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जो-तो कार्यकर्ता आपला नेता कसा चांगला आहे आणि विरोधातील कसा वाईट आहे, हे सांगण्यासाठी मोडतोड केलेले व्हिडीओ वापरून, आवाज बदलून पोस्ट व्हायरल करतात. त्यामुळे याचा त्रास उमेदवार आणि त्यांच्या घरच्यांनाही सोसावा लागत आहे.

या निवडणुकीची बहुतांश सूत्रे युवकांच्या हातात असताना आणि त्यांच्याच हातामध्ये सोशल मीडियाचे प्रभावी अस्त्र असल्याने याची दखल सर्वांकडून घेतली जात आहे. अनेकदा आठ-दहा जणांचा गट एकत्र येऊन मजा म्हणूनही काही पोस्ट टाकतो; परंतु त्याचा नेमका सामाजिक परिणाम काय होणार आहे, याचा विचारही केला जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी जातीय तणावापासून ते राजकीय संघर्षापर्यंत वेळ येते. त्यामुळेच अशा पोस्ट टाकण्यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही केले जात आहे.

उमेदवाराला काही सांगायचेच नाहीअनेकदा खोट्या पोस्टमुळे उमेदवारच अस्वस्थ होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या नकारात्मक पोस्टची माहिती उमेदवारांपर्यंत पोहोचू द्यायची नाही, अशी दक्षता आता संबंधितांचे निकटवर्तीय घेत आहेत. ‘कुणीही उठावं आणि काहीही टाकावं’ असे हे माध्यम असल्याने काहींनी ही दक्षता घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूक