शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

निवडणूक कार्यक्रमात ठरतोय अपुऱ्या कर्मचाऱ्यांचा अडसर

By admin | Updated: December 11, 2014 00:01 IST

‘सहकार’च्या कर्मचाऱ्यांची दमछाक : जानेवारीअखेर ‘प्रलंबित’ निवडणुका पार पाडण्याचे आवाहन

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा तालुक्याकरिता असणाऱ्या तालुका सहायक निबंधक कार्यालयात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात आलेल्या सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम राबविताना खात्याची दमछाक होत असून, निवडणुकाच नव्हे, तर इतर कामे पूर्णत्वास नेतानाही अडचणी येत आहेत.आजरा तालुक्यात एकूण २९७ सहकारी संस्थांची नोंद आहे. सहायक निबंधकाकडे येणाऱ्या या संस्थांमध्ये गृहनिर्माण संस्था, मजूर संस्था, पाणी वापर संस्था, पतसंस्था, विकास सेवा संस्था, सेवक पतसंस्था, आदी संस्थांचा समावेश आहे. यामध्ये पतसंस्था व सेवा संस्थांचा कारभार डोकेदुखी ठरणारा आहे. ३१ मार्च अखेर १०१ पतसंस्था अधिकृतरीत्या रेकॉर्डवर आहेत.७९/१ (अ) कायद्यातील तरतुदीनुसार पतसंस्थांनी ३१ मार्च २०१४ अखेरची वार्षिक माहिती, ताळेबंदपत्रके, नफा-तोटा पत्रके, वार्षिक सर्वसाधारण सभेतील उपविधी दुरुस्ती, वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, लेखा परीक्षक नेमणुकीबाबतची माहिती सहकार खात्याकडे देण्याबरोबरच महाराष्ट्र शासनाकडे आॅनलाईन संक्षिप्त टिपणी देणे ३० सप्टेंबर २०१४ अखेर आवश्यक होते. बहुतांशी पतसंस्थांनी सदर माहिती न दिल्याने अशा संस्थांवर प्रथम दंडात्मक कारवाई त्यानंतर नोंदणी रद्द अशा पायऱ्या उचलण्यात येणार आहेत.सदर कारवाई करण्याकरिता पुरेसा कर्मचारी वर्गच नाही. भरीस भर म्हणून विविध कारणांनी गेले वर्षभर काही सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्या होत्या. या सर्वच संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जानेवारी २०१५ अखेरपर्यंत पार पाडण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाचे आदेश आहेत.निवडणुकांबाबत आवश्यक ती कामे पूर्ण करण्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा पडत आहे. त्यातच काही संस्थांची अचूक माहिती नाही, काही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यात की नाही? तर काही संस्थांचा कारभार सुरू आहे की नाही? हे समजताना बऱ्याच अडचणी येत आहेत.एकंदर प्रकार पाहता सहायक निबंधक कार्यालयात पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची गरज आहे.दोन कर्मचारी..एक शिपाईसध्या या कार्यालयाकडे सहकारी अधिकारी श्रेणी-२, कनिष्ठ लिपिक-१ व शिपाई-१ असे सहायक निबंधक वगळता तीनच कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहायक सहकारी अधिकारी-१, मुख्य लिपिक-१ अशी तीन पदे कित्येक वर्षांपासून रिक्तच आहेत.शासनाला चुनाडबघाईला आलेल्या तालुक्यातील पाच पतसंस्थांना शासनाकडून पुनरुज्जीवनासाठी ६५ लाखांची बिनव्याजी मदत परतीच्या बोलीवर देण्यात आली होती. २००९ सालानंतर आजतागायत यापैकी केवळ चार लाख रुपयांची वसुली झाली आहे. उर्वरित रकमांच्या वसुलीकरिता कागदी घोडे नाचविण्याचे कामही उपलब्ध कर्मचाऱ्यांवर येऊन पडले आहे. सर्वच संस्थांनी शासनाला चुना लावला आहे.