शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

‘प्राधिकरण’ विकासाची वाट बिकटच गेली पंधरा महिने आश्वासनेच : नागरिकांचा विश्वास संपादण्यात अधिकारी अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:16 IST

कोल्हापूर शहरानजीकच्या ४२ गावांना एकत्र करून राज्य शासनाने या गावांचा नियंत्रित विकास करण्यासाठी ‘कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन केले. निधीअभावी रिकाम्या असलेल्या या प्राधिकरणाची घोषणा

ठळक मुद्देगावांचा विश्वास संपादन करण्यास प्राधिकरण अद्याप यशस्वी झाले नसल्याने विकासाची नवी वाट निर्माण होण्याऐवजीइंचही खासगी जमीन घेणार नाही, ग्रामपंचायत किंवा महापालिकेला न झेपणारे प्रकल्प उभारले जातील, विकासशुल्क,

तानाजी पोवार ।कोल्हापूर शहरानजीकच्या ४२ गावांना एकत्र करून राज्य शासनाने या गावांचा नियंत्रित विकास करण्यासाठी ‘कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन केले. निधीअभावी रिकाम्या असलेल्या या प्राधिकरणाची घोषणा होऊन सुमारे १५ महिन्यांचा कालावधी उलटला तरीही हे ‘प्राधिकरण’ अद्याप आश्वासनांच्या गर्तेतच अडकले आहे. गावांचा विश्वास संपादन करण्यास प्राधिकरण अद्याप यशस्वी झाले नसल्याने विकासाची नवी वाट निर्माण होण्याऐवजी ती बिकटच होत आहे.

प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर नियमावली आणि कार्यक्षेत्राबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली, प्राधिकरण कसे फायद्याचे हे ग्रामीण जनतेला पटवून देण्यास अधिकाऱ्यांनी विलंब लावल्याने गैरसमज वाढले. ‘प्राधिकरणा’च्या माध्यमातून गावठाणाबाहेरचा विकास प्राधिकरण नियंत्रित होईल, गावठाणाबाहेरील घरफाळाही ग्रामपंचायतीकडेच जमा होईल, इंचही खासगी जमीन घेणार नाही, ग्रामपंचायत किंवा महापालिकेला न झेपणारे प्रकल्प उभारले जातील, विकासशुल्क, सरकारी जमिनीच्या माध्यमातून निधी उभारणी आणि शासन निधी या माध्यमातून निधी उभारला जाईल, आदी आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी प्राधिकरणातील गावांना दिली, पण ‘ग्रामपंचायतीचे अधिकार आणि गावातील जमिनीवरील आरक्षण’ या मुद्द्यावर गावांनी हे प्राधिकरण नकोच असा पावित्रा घेतला आहे.कर्मचारी भरतीचीही घोषणाचफक्त पाचच कर्मचाºयांवर हे ‘प्राधिकरणा’चे कामकाज सुरू आहे, पालकमंत्री पाटील यांनी आकृतीबंध कर्मचारी भरतीची घोषणा केली, पण प्रत्यक्षात कार्यवाही शून्यच आहे. 

प्राधिकरणात अनेकांच्या जमिनी जाणार आहेत, त्यामुळे तूर्त तरी या प्राधिकरणाला स्थगिती मिळावी, ‘प्राधिकरण’ची जनसुनावणी घ्यावी, मगच त्याबाबत निर्णय घ्यावा.- राजू सूर्यवंशी, सभापती, करवीर पंचायत समिती‘प्राधिकरण’ हे केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी पालकमंत्र्यांनी निर्माण केले आहे, त्यातून शेतकºयांचे नुकसानच आहे, त्यामुळे आमचा विरोध कायम आहे.- प्रा. बी. जी. मांगले, निमंत्रक, प्राधिकरण विरोधी कृती समितीगेल्या महिन्यात सरपंच, ग्रामसेवकांच्या बैठकीत ग्रामस्थांची मानसिकता बदलत असल्याचे दिसून आले, त्यामुळे पुढील आठवड्यात कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.- शिवराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर