शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

पुलाअभावी १५ कि.मी.चा फेरा

By admin | Updated: November 27, 2015 01:03 IST

गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी : भोगावती नदीवरील नवीन पुलाचा प्रस्ताव ६० वर्षे लालफितीत

सडोली खालसा : करवीर तालुक्यातील गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी दरम्यान भोगावती नदीपात्रात नवीन पुलाचा प्रस्ताव तब्बल ६० वर्षे अडगळीत पडला आहे. यामुळे करवीर पश्चिम भागासह राधानगरी तालुक्यातील जनतेला १५ किलोमीटर लांब पल्ल्याने प्रवास करावा लागत आहे. पूल झाला नसल्यामुळे दोन्ही तालुक्यांतील गावांचा दळण-वळणाचा प्रश्न स्वातंत्र्यकाळापासून रेंगाळला आहे. करवीर तालुक्याचा पूर्व भाग व पश्चिम भाग असे दोन भाग पडले आहे. तालुक्याचा पूर्व भाग हा कोल्हापूर शहराच्या जवळ असल्यामुळे या भागात रस्ते व सुखसोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, परंतु पश्चिम भागातील गावांना कोल्हापूर शहरात जाण्यासाठी हळदीमार्गे ३५ ते ४० किलोमीटर, तर बीडमार्गे ४० ते ४५ किलोमीटर अंतर आहे. जादा अंतर होत असल्यामुळे करवीर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गावे शहरापासून दुरावत आहेत. यासाठी गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथे भोगावती नदीवर पूल व बंधारा शासनाने मंजूर केल्यास हेच अंतर १५ ते २० किलोमीटर होईल. त्यामुळे या अतिदुर्गम भागाचा निश्चितच विकास व्हायला वेळ लागणार नाही. गोवा-राधानगरी-करवीर या पश्चिम भागातील प्रवासाचे १५ ते २० किलोमीटर अंतर कमी होणार असून वेळ, इंधन, पैसा यांची बचत होणार आहे.करवीरच्या पश्चिम भागातील व राधानगरीच्या मुख्य वाहतुकीच्या सोयीचा असणारा आरे-पिरळ हा रस्ता गाडेगोंडवाडी गावामधून गेला आहे. या रस्त्यावरून राधानगरीकडे जाण्यासाठी गगनबावडा, रत्नागिरीहून येणारी वाहतूक कोल्हापूरकडे न जाता कुडित्रे-सावरवाडी-आरे मार्गे राधानगरीकडे बायपास मार्गाने होते. गाडेगोंडवाडी परिसरातील नदीपात्र खोल असल्यामुळे येथे पुराचे पाणी जास्त पसरत नाही. पूर आला तरी कोल्हापूर-राधानगरी-गोवा वाहतूक सुरू राहून कोल्हापूर शहराचा संपर्क तुटणार नाही. या पुलाची गरज ओळखून आरे ग्रामपंचायतीने करवीर व राधानगरी तालुक्यांतील प्रवाशांच्या मागणीनुसार गाडेगोंडवाडी येथे पूल व्हावा, या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे, परंतु आमदार व खासदारांची इच्छाशक्ती नसल्यामुळे हा प्रस्ताव गेल्या ६० वर्षांपासून शासनाकडे धूळ खात पडला आहे. नेत्यांचे आश्वासन हवेतचजुन्या पिढीतील १९३० ते १९७५ पर्यंत गाडेगोंडवाडी येथून होडीतून व दगडी बंधाऱ्यावरून राधानगरी व करवीर तालुक्यांतील नागरिक तांदूळ, शेणी, गूळ विक्री करण्यासाठी कोल्हापूर शहराकडे जात होते. त्यावेळीपासून भोगावती नदीवर पूल बांधावा, अशी मागणी प्रवाशांतून होत होती; परंतु निवडणुकीपुरतीच नेतेमंडळी आश्वासन देऊन या परिसरातील जनतेची दिशाभूल करतात. निवडणुकीनंतर ही आश्वासने हवेत विरतात. स्वातंत्र्यापासून गाडेगोंडवाडी ते शेळकेवाडी हा पूल व्हावा अशी मागणी सातत्याने होत आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करून, गाडेगोंडवाडी पश्चिम भागाचा रोजगार, उद्योग आणि शहर जवळ यावे यासाठी प्रयत्न करणार आहे. - निवृत्ती मेटील, सरपंच, ग्रामपंचायत, गाडेगोंडवाडी