शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कारखाना एका विचाराने चालविणार : जयवंतराव शिंपी

By admin | Updated: May 20, 2016 00:29 IST

आमने-सामने --सर्वांना सोबत घेऊन कारखाना चालविणार : विष्णुपंत केसरकर

ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा -आजरा कारखान्याचा ‘दौलत’ कारखाना होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. नेत्यांची दिशाभूल करणारी मंडळी वाढल्यामुळे कारखान्यात हुकुमशाही वाढीस लागली आहे. त्यामुळे अनेकांचे संसार फुलविणारा कारखाना टिकविण्यासाठी सर्वांना सोबत आणि विश्वासात घेऊन कारखाना चालवू, अशी ग्वाही महाआघाडीचे नेते व माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी दिली.केसरकर म्हणाले, कारखाना हा तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. काटकसर व आर्थिक परिस्थिती विचारात न घेता निर्णय होऊ लागले, तर ते भविष्यात मारक ठरू शकते. गेल्या २० वर्षांत कारखान्याच्या वाटचालीचे आपण साक्षीदार आहोत. एक वर्ष अध्यक्षपदाची संधी मिळाली. आपल्या कारकिर्दीत गाळप चार लाखांवर केले. साखर उतारा १२.८० टक्के मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात २६०० रुपये इतकी रक्कम पडली. साखरेचे दर कमी असतानासुद्धा सर्व संकटांमधून कारखाना सावरला. चांगली दृष्टी ठेवून काम केले, तर काय होऊ शकते याचा अनुभव सभासदांनी घेतला. अनेक कर्मचारी कारखान्यात कायम नव्हते. त्यांना कायम करण्यात आले. एकीकडे असे असताना प्रत्येक गोष्टीत वरिष्ठांना विचारून त्यांच्या नावाचा वापर करून काही मंडळी कारखान्यात कारभारी बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. याच मंडळींनी सात वर्षे केवळ अध्यक्षपद अडवून बसलेल्यांना पुन्हा अध्यक्षपदाचे गाजर दाखवून जवळ केले आहे, अशा आघाड्यांवर शेतकरी सभासद विश्वास कसा ठेवणार? अध्यक्ष होण्याची घाई असणारी मंडळी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना कारखान्याच्या हिताशी काही देणे-घेणे नाही. आमच्या महाआघाडीने सामान्य शेतकऱ्यांपासून ते उच्चशिक्षित व उद्योजकांना उमेदवारी दिली आहे. भविष्यात शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करणे, ऊसाच्या चांगल्या बेण्यांचा वापर करण्यास प्रवृत्त करणे, डिस्टिलरी प्रकल्प सुरू करणे, असे उपक्रम राबविले जाणार आहेत.गाळप प्रारंभ होऊन पाच वर्षांच्या आतच स्व. वसंतराव देसाई यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणे, मल्टिस्टेटसारखे प्रकार अवलंबिणे, तसेच अभ्यासू सभासदांना सभासदत्वापासून दूर लोटण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्ती कारखान्यात पुन्हा प्रवेश करू पाहत आहेत.आजरा कारखाना ही सभासदांची मालमत्ता आहे. त्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी विश्वस्त म्हणून संचालकांवर आहे. एकीकडे सहकारातील ज्येष्ठ अनुभवी मंडळी आपल्या आघाडीत असताना दुसरीकडे मात्र नीतिमूल्ये नसणारी मंडळी आहेत. एका विचाराने कारखाना चालविण्यासाठी सक्षम आघाडीद्वारे मतदारांसमोर जात असल्याने या निवडणुकीत श्री रवळनाथ स्व. वसंतराव देसाई विकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास आघाडीचे नेते जयवंतराव शिंपी यांनी व्यक्त केला.शिंपी म्हणाले, संस्था वाढविणे व संस्था टिकविणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांना कारखाना चालविण्याचा मोठा अनुभव आहे. केवळ राजकारणातून आर्थिक अडवणूक झाल्याने आपणाला पाच वर्षांपूर्वी सभासदांच्या हिताच्यादृष्टीने अनेक निर्णय घ्यावे लागले. संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे, जागेचा सातबारा काढणे याकरिता काम केलेल्यांपैकी आपण एक साक्षीदार आहोत. त्यामुळे कारखान्याचे धुराडे सतत पेटते राहण्यामागे ेआपला प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.कारखाना उभारणीत योगदान असणारे कृष्णराव देसाई, मुकुंद आपटे, बापूसाहेब धुरे या संस्थापक व श्रीमती प्रभावती पोवार, राजारामबापू देसाई यांच्या मुलांना व समाजातील सुशिक्षित शेतकरी व उच्चशिक्षित मंडळींना सोबत घेऊन आघाडीची रचना केली आहे.कारखान्यात सहवीज प्रकल्प, डिस्टिलरी उपपदार्थ निर्मितीलाही प्राधान्य देण्याची गरज आहे. त्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न राहतील. ऊस विकास कार्यक्रम अधिक तत्परतेने राबविणे, तसेच उपलब्ध कर्मचाऱ्यांचा सक्षमपणे वापर करण्यास प्राधान्य राहील. येत्या सहा महिन्यांत किरकोळ अडचणींमुळे पूर्णत्वाकडे जात असलेले; परंतु अपूर्ण असलेल्या प्रकल्पांचा पाठपुरावा केला जाईल, यामुळे ऊस क्षेत्रात निश्चितच वाढ होईल. रात्रीत उगवलेले उद्योगपती आज वाटण्यासाठी आणि लुटण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहेत. सभासदांनी अनेक गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. आता त्यांना काहीतरी सांगून दिशाभूल व सोयीचे राजकारण करणाऱ्या मंडळींना सभासद बाजूला करून आपल्या आघाडीच्या बाजूने कौल देतील, असा विश्वासही शिंपी यांनी व्यक्तकेला.स्वत:च्या मर्जीप्रमाणे उमेद्वाऱ्या देऊन सहकारी कारखाना खासगी कारखान्याप्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आता सभासदच अद्दल घडवतील.